शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

कूपनलिकांवर रांगाच रांगा, नळपाणीयोजनेत भ्रष्टाचार, नेत्यांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:58 IST

राज्य सरकारच्या विविध योजनांतून शहापूर तालुक्यात मंजूर झालेल्या नळपाणीपुरवठा योजनांपैकी आजही अनेक योजना अपूर्णच असून अनेक विहिरींचा व नळपाणीपुरवठा योजनांचा घोळ जैसे थे आहे.

शेणवा : राज्य सरकारच्या विविध योजनांतून शहापूर तालुक्यात मंजूर झालेल्या नळपाणीपुरवठा योजनांपैकी आजही अनेक योजना अपूर्णच असून अनेक विहिरींचा व नळपाणीपुरवठा योजनांचा घोळ जैसे थे आहे. याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.

शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या डोळखांब आदिवासी ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाईने डोके वर काढले असून तळवाडा ग्रामपंचायत हद्दीत असणाºया रोडवहाल या आदिवासी गावात टंचाई निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ६०० च्या आसपास लोकसंख्या असून ९८ घरांची वस्ती असणाºया या गावात पाणीच मिळत नाही. एक महिन्यापूर्वी पाण्यासाठी साली पिल्लू झुगरे या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. परंतु, लोकप्रतिनिधी या गावाकडे लक्षच देत नसल्याने हे भयानक प्रकरण उजेडात आले नाही.

२००४ मध्ये या ठिकाणी पाणीयोजना मंजूर झाली होती. एक कोटीची असणारी ही योजना एकच दिवस पाणी देऊन कायमची बंद झाली. या ठिकाणी दोन कूपनलिका आहेत. एक खाजगी मालकीची आणि एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गावासाठी दिली आहे. परंतु, सध्या या ठिकाणची भूजल पातळी इतकी खालावली आहे की, एक तास हपासल्यानंतर या कूपनलिकेला पाणी सुरू होते. पहाटे ३ वाजता महिलांना पाण्यासाठी नंबर लावावा लागतो. पहाटे गेलेली महिला सकाळी ८ वाजता दोन हंडे पाण्याचे घेऊन येते. तेवढेच पाणी संपूर्ण दिवस पिण्यासाठी वापरतात.

अंघोळ आणि कपडे धुण्यासाठी पाच किलोमीटरवर असणाºया डोळखांब येथील चोर नदीवर जावे लागते. दोन वर्षांपासून या ठिकाणी टँकरच आला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. कूपनलिका आहेत तरीही त्यासाठी दोन हंडे पाण्यासाठी पाच तास रांग लावावी लागते. चार महिला कूपनलिका हपसायला लागतात. तर, अजून १० दिवसांनी आम्हाला सात किलोमीटरवर पाणी आणण्यासाठी जावे लागणार असल्याचे ज्योती खाकर यांनी सांगितले.

पेंढरघोळ येथील विहिरीला मिळाला जलस्रोतगेल्या वर्षी लवकर गेलेल्या पावसामुळे जमिनीतील पाण्याचे स्रोत शोधणे, हे मोठे आव्हान आहे. तरीही, सध्या पेंढरघोळ येथे बांधण्यात येणाऱ्या विहिरीला अनेक जलस्रोत मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान आहे. पाणीटंचाईच्या या गंभीर विषयाबाबत ‘लोकमत’ने ‘दुष्काळदाह’च्या माध्यमातून आवाज उठवला होता. त्याची गंभीर दखल लघुपाटबंधारे विभागाने घेतली आहे.

पाऊस गेल्याने पाण्याची पातळी खालावली आणि तालुक्यातील विहिरीदेखील आटल्या. यामुळे पाण्याची समस्या निर्माण झाली. पेंढरघोळ येथे निर्माण झालेली ही पाणीसमस्या कायमची सुटावी, म्हणून गेल्या वर्षी मंजूर झालेल्या जलकुंभाचे काम दोन दिवसांपूर्वीच लघुपाटबंधारे विभागाकडून हाती घेण्यात आले. दिवसरात्र हे खोदकाम सुरू असून ३० फुटांवरच पाण्याचे अनेक झरे लागल्याने नागरिकांसह अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आजच्या कडक उन्हातही लागलेले हे झरे मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध करून देतील, असे जाणकार सांगतात. ३३ फूट खोल आणि साडेतेरा मीटर रुंदीचा हा जलकुंभ १७ लाख रुपये खर्चून बांधण्यात येत आहेत. या जलकुंभाच्या पाण्यामुळे येथे असलेल्या आश्रमशाळेबरोबरच इतर दोन पाड्यांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या जलकुंभाचे खोदकाम सुरू असतानाच पाण्याचे झरे लागल्याने आम्ही नक्कीच समाधानी आहोत. हे पाणी गावपाडे यांना टंचाईच्या काळात नक्कीच उपयोगी ठरेल असे लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता पी.आर. तडवी यांनी सांगितले.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईshahapurशहापूर