शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

देसार्इंच्या संकल्पनेतून राजमहालाची प्रतिकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:30 AM

बदलापूर, पाटीलपाडा भागात ५० वर्षे माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने भव्य देखावा उभारण्याची तयारी केली आहे

बदलापूर : बदलापूर, पाटीलपाडा भागात ५० वर्षे माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने भव्य देखावा उभारण्याची तयारी केली आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून महाल उभारण्यात येत आहे. १५ दिवसांपासून या ठिकाणी महाल उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे यंदा भाविकांची गर्दी वाढणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष उल्हास आंबवणे यांनी सांगितले.बदलापुरातील माघी गणेशोत्सव आणि त्यानिमित्त भरणारी १० दिवसांची जत्रा ही सर्वांच्या आकर्षणाचा विषय असतो. शहर वाढत असले, तरी या जत्रेचे महत्त्व मात्र कमी झालेले नाही. स्टेशन परिसरात मोकळी जागा नसली, तरी बदलापूरकर या जत्रेसाठी सर्व अडचणी बाजूला ठेवून काम करत आहेत. बदलापुरातील ही जत्रा आणि माघी गणेशोत्सव पाहण्यासाठी ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून भाविक येतात. भाविकांचा ओघ हा दरवर्षी वाढत असून या गणेशाला नारळ वाहणाºया भाविकांची संख्या ही सर्वाधिक आहे.यंदा या माघी गणेशोत्सवाचे पन्नासावे वर्ष असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्र म मंडळाच्या वतीने होणार आहे. मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष दिमाखदार व्हावे, यासाठी १२ वर्षांपासून मंडळाची तयारी सुरू होती. तसेच या महोत्सवासाठी मंडळाने निधीची तरतूदही केली होती. वर्षभर सामाजिक कार्य करून मंडळाचे विविध उपक्रम सतत सुरूच असतात.भव्य महाल उभारण्याची तयारी करण्यात आली आहे. देसाई यांना हे महाल उभारण्याचे काम दिले आहे. दोन दिवसांत ते कामही पूर्ण करून गणेशाच्या स्वागतासाठी महाल सज्ज होणार आहे. या संपूर्ण महालात जाऊन गणेशाचे दर्शन घेण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. त्यामुळे यंदाचा महोत्सव हा मंडळासोबत भाविकांसाठीही महत्त्वाचा आहे.देखाव्यासाठी महाल उभारला जात असला, तरी सामाजिक बांधीलकी जपत दरवर्षीप्रमाणे यंदादेखील अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहे. बदलापूरमधील सर्वात मोठे रक्तदान शिबिर यावेळी घेण्यात येणार आहे. बदलापूर परिसरातील गतिमंद मुलांच्या संस्थेला भरीव मदतीचा हात मंडळाच्या वतीने देण्यात येणार आहे. सोबत, महाआरोग्य शिबिर, चष्मेवाटप कार्यक्रमही घेण्यात येणार असल्याचे अविनाश खिल्लारे म्हणाले.१०१ ढोल पथकांची मानवंदनादरवर्षीची वाहतूककोंडी टाळण्यासाठी यंदा वेगळी व्यवस्था केली जाणार असून वाहतुकीवर परिणाम होऊ न देता उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न असल्याचे कार्याध्यक्ष वीरेश धोत्रे यांनी सांगितले. उद्या गणेशाचे आगमन होणार असून २१ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यात १०१ ढोल पथकांची मानवंदना देण्यात येणार असून पारंपरिक पद्धतीने ही मिरवणूक निघणार आहे.