शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ठाणे जिल्ह्यात रक्षाबंधनला पावसाची विश्रांती; बारवीत ८९ टक्के साठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 20:04 IST

जिल्ह्यात काही दिवसांपासून संतत धार सुरु पडणाऱ्या पावसाने नारळी पौर्णिमेच्या रक्षाबंधनाला रविवारी मात्र काही अंशी विश्रांती घेतली. यामुळे या सणासुदीला बाजार पेठेत ही गर्दी पहायला मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यात काही दिवसांपासून संतत धार सुरु पडणाऱ्या पावसाने नारळी पौर्णिमेच्या रक्षाबंधनाला रविवारी मात्र काही अंशी विश्रांती घेतली. यामुळे या सणासुदीला बाजार पेठेत ही गर्दी पहायला मिळाली. गेल्या २४ तासात सरासरी ९.४ मिमी. पाऊस जिल्ह्यात पडला. धरण क्षेत्रातही पावसाने आज काही अंशी विश्रांती घेतली. बारवी धरणात आजपर्यंत ८८.९५ टक्के तर भातसा धरणात ८८.१० टक्के पाणी साठा आज तयार झाला असून दोन दरवाजे २५ सेंटीमीटर उघडण्यात आले आहेत.

आज ठाणे शहर परिसरात ११ मिमी. पाऊस पडला आहे. याप्रमाणेच कल्याण ११ मिमी पावसासह मुरबाडला ३ मिमी, भिवंडीत १० मिमी, शहापूरला ८, उल्हासनगरमध्ये १४ मिमी आणि अंबरनाला ९ मिमी. पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. शहरांसह मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोटात उत्तम पाऊस झाल्याने धरणांमध्ये पाणी साठा वाढला आहे. बारवी धरणात गेल्या वर्षी अवघा ८६.८ टक्के पाणी साठा होता. तो आजच्या दिवशी ८८.९५ टक्के झाला आहे.

जिल्ह्यातील सर्व महानगरांना व एमआयडीसीला पाणी पुरवठा करणाऱ्या बारावीच्या खानिवरे या पाणलोटात आज ३४ मिमी, कान्होळला २८ मिमी, पाटगांवला ३८ मिमी आणि ठाकूरवाडी या पाणलोटात ३२ मिमी, तर बारवी धरणात आज सरासरी २५ मिमी पाऊस पडला आहे. यामुळे धरणांतील पाणी साठा ८४.२० टक्केने वाढला आहे. याप्रमाणेच भातसा धरणात ८८.१० टक्के साठा असून दोन दरवाजे उघडून शनिवारी जलपूजन झाले. आंध्रात ६८ टक्के पाणी साठा आजपर्यंत झाला आहे. 

टॅग्स :RainपाऊसthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र