शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

ठाणे जिल्ह्यात रक्षाबंधनला पावसाची विश्रांती; बारवीत ८९ टक्के साठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 20:04 IST

जिल्ह्यात काही दिवसांपासून संतत धार सुरु पडणाऱ्या पावसाने नारळी पौर्णिमेच्या रक्षाबंधनाला रविवारी मात्र काही अंशी विश्रांती घेतली. यामुळे या सणासुदीला बाजार पेठेत ही गर्दी पहायला मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यात काही दिवसांपासून संतत धार सुरु पडणाऱ्या पावसाने नारळी पौर्णिमेच्या रक्षाबंधनाला रविवारी मात्र काही अंशी विश्रांती घेतली. यामुळे या सणासुदीला बाजार पेठेत ही गर्दी पहायला मिळाली. गेल्या २४ तासात सरासरी ९.४ मिमी. पाऊस जिल्ह्यात पडला. धरण क्षेत्रातही पावसाने आज काही अंशी विश्रांती घेतली. बारवी धरणात आजपर्यंत ८८.९५ टक्के तर भातसा धरणात ८८.१० टक्के पाणी साठा आज तयार झाला असून दोन दरवाजे २५ सेंटीमीटर उघडण्यात आले आहेत.

आज ठाणे शहर परिसरात ११ मिमी. पाऊस पडला आहे. याप्रमाणेच कल्याण ११ मिमी पावसासह मुरबाडला ३ मिमी, भिवंडीत १० मिमी, शहापूरला ८, उल्हासनगरमध्ये १४ मिमी आणि अंबरनाला ९ मिमी. पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. शहरांसह मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोटात उत्तम पाऊस झाल्याने धरणांमध्ये पाणी साठा वाढला आहे. बारवी धरणात गेल्या वर्षी अवघा ८६.८ टक्के पाणी साठा होता. तो आजच्या दिवशी ८८.९५ टक्के झाला आहे.

जिल्ह्यातील सर्व महानगरांना व एमआयडीसीला पाणी पुरवठा करणाऱ्या बारावीच्या खानिवरे या पाणलोटात आज ३४ मिमी, कान्होळला २८ मिमी, पाटगांवला ३८ मिमी आणि ठाकूरवाडी या पाणलोटात ३२ मिमी, तर बारवी धरणात आज सरासरी २५ मिमी पाऊस पडला आहे. यामुळे धरणांतील पाणी साठा ८४.२० टक्केने वाढला आहे. याप्रमाणेच भातसा धरणात ८८.१० टक्के साठा असून दोन दरवाजे उघडून शनिवारी जलपूजन झाले. आंध्रात ६८ टक्के पाणी साठा आजपर्यंत झाला आहे. 

टॅग्स :RainपाऊसthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र