शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

ठाणे जिल्ह्यात रक्षाबंधनला पावसाची विश्रांती; बारवीत ८९ टक्के साठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 20:04 IST

जिल्ह्यात काही दिवसांपासून संतत धार सुरु पडणाऱ्या पावसाने नारळी पौर्णिमेच्या रक्षाबंधनाला रविवारी मात्र काही अंशी विश्रांती घेतली. यामुळे या सणासुदीला बाजार पेठेत ही गर्दी पहायला मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यात काही दिवसांपासून संतत धार सुरु पडणाऱ्या पावसाने नारळी पौर्णिमेच्या रक्षाबंधनाला रविवारी मात्र काही अंशी विश्रांती घेतली. यामुळे या सणासुदीला बाजार पेठेत ही गर्दी पहायला मिळाली. गेल्या २४ तासात सरासरी ९.४ मिमी. पाऊस जिल्ह्यात पडला. धरण क्षेत्रातही पावसाने आज काही अंशी विश्रांती घेतली. बारवी धरणात आजपर्यंत ८८.९५ टक्के तर भातसा धरणात ८८.१० टक्के पाणी साठा आज तयार झाला असून दोन दरवाजे २५ सेंटीमीटर उघडण्यात आले आहेत.

आज ठाणे शहर परिसरात ११ मिमी. पाऊस पडला आहे. याप्रमाणेच कल्याण ११ मिमी पावसासह मुरबाडला ३ मिमी, भिवंडीत १० मिमी, शहापूरला ८, उल्हासनगरमध्ये १४ मिमी आणि अंबरनाला ९ मिमी. पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. शहरांसह मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोटात उत्तम पाऊस झाल्याने धरणांमध्ये पाणी साठा वाढला आहे. बारवी धरणात गेल्या वर्षी अवघा ८६.८ टक्के पाणी साठा होता. तो आजच्या दिवशी ८८.९५ टक्के झाला आहे.

जिल्ह्यातील सर्व महानगरांना व एमआयडीसीला पाणी पुरवठा करणाऱ्या बारावीच्या खानिवरे या पाणलोटात आज ३४ मिमी, कान्होळला २८ मिमी, पाटगांवला ३८ मिमी आणि ठाकूरवाडी या पाणलोटात ३२ मिमी, तर बारवी धरणात आज सरासरी २५ मिमी पाऊस पडला आहे. यामुळे धरणांतील पाणी साठा ८४.२० टक्केने वाढला आहे. याप्रमाणेच भातसा धरणात ८८.१० टक्के साठा असून दोन दरवाजे उघडून शनिवारी जलपूजन झाले. आंध्रात ६८ टक्के पाणी साठा आजपर्यंत झाला आहे. 

टॅग्स :RainपाऊसthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र