शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरूच; मागील आठ तासात 120 मिमी पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 18:48 IST

सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने देण्यात आली.

ठाणे: मागील काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवार पासून दमदार हजेरी लावली आहे. शनिवारी देखील सकाळपासून पावसाने आपली संततधार सुरूच ठेवली होती. शनिवारी सकाळपासून कोसणाऱ्या पावसामुळे ठाणे शहरात मगील आठ तासात 120 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या कोसळणाऱ्या पावसामुळे शहरात भिंत पडणे, झाड व झाडांच्या फांद्या पडणे यांसह ठिकठिकाणी पाणी साठण्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने देण्यात आली. तर, या पावसाचा परिणाम रेल्वे सेवेवर देखील झाल्याने रेल्वे नियमित वेळेपेक्षा उशिराने धावत होती. ठाणे शहरात शुक्रवार पासून सुरु झालेल्या पावसाने शिनिवारी देखील आपले बरसणे सुरूच ठेवले होते. त्यामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला होता. शनिवारी कोसळणाऱ्या पावसामुळे वागळे इस्टेट येथील खेतले गार्डन येथे 10 ते 12 फुट उंचीची भिंत पडल्याची घटना घडली.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाली नाही. तर, चरई, खारकर आळी आणि कोपरी मीठ बंदर रोड येथे झाडे पडण्याच्या घटना घडल्या. तसेच नौपाडा, ब्रम्हांड, वसंत विहार आदी ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्या आहे. तर, गोकुळ नगर, माजिवडा, वंदना सिनेमागृह, अशोक सिनेमा, कोपरीतील ठाणेकरवाडी, वागळे इस्टेट, तीन पेट्रोल पंप, पाचपाखाडी, तसेच शहरातील मुख्य बाजार पेठ आदी 12 ठिकाणी पाणी तुंबल्याचे पहायला मिळाले. या मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांना यातून मार्ग काढताना चांगलीच कसरत करावी लागत होती. 

दरम्यान, शनिवारी दिवसभर कोसळणाऱ्या पावसाचा रेल्वे सेवेवर देखील त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले.त्यात पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारे नाल्यांची सफाई पूर्ण झाली नसल्याने ठाणे आणि कळवा स्थानक येथील रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याचे दिसून आले. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होवून लोकल ट्रेन नियमित वेळेपेक्षा उशिराने धावत होती.

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणे