शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

ठाणे स्थानकातील शुद्ध पाण्याबाबत रेल्वे प्रवाशांच्या तक्रारी; पाण्याचे नमुने तपासणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:23 IST

रेल्वे स्थानकावर मिळणाऱ्या आरोग्यदायी आणि आरोयुक्त शुद्ध पाण्याबाबत ठाणे रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी येण्यास सुरूवात झाल्याची बाब पुढे आली आहे.

ठाणे :रेल्वे स्थानकावर मिळणाऱ्या आरोग्यदायी आणि आरोयुक्त शुद्ध पाण्याबाबत ठाणेरेल्वे प्रशासनाकडे तक्रारी येण्यास सुरूवात झाल्याची बाब पुढे आली आहे. या तक्रारीत त्या पाण्याच्या शुद्धतेवर प्रवाशांनी बोट ठेवल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या तक्रारींची दखल घेत रेल्वे प्रशासनाने पाण्याचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी धाडल्याचे सांगितले जात आहे.

कल्याण स्थानकापाठोपाठ ठाणे रेल्वे स्थानकात आरो प्रणालीच्या चार आॅटोमॅटिक वॉटर व्हेंडिंग मशिन्स २०१७ मध्ये बसविण्यात आल्या आहेत. फलाट क्रमांक एक, दोन, सात आणि नऊ नंबर त्या बसवल्या आहेत. या मशिनसाठी लागणारे पाणी रेल्वेकडून अल्प किंमतीत उपलब्ध करून दिले जाते. त्यानंतर मशीनद्वारे ते पाणी ७ वेळा फिल्टर होते. या शुद्ध पाण्यामुळे डोकेदुखीचा त्रास कमी होतो, शरीराचे तापमान नियंत्रित होते, सांधे आणि स्नायुसाठी आवश्यक, पचनक्रि येसाठी उपायकारक, वजन घटविण्यास ते उपयुक्त ठरते. त्याचबरोबर शरीरामध्ये द्रव पदार्थाचे प्रमाण कायम राखते, त्वचेला उजाळा येतो. शरीरामध्ये उर्जा वाढविण्यासाठीही या पाण्याचा वापर होतो. या मशिनद्वारे अवघ्या पाच रु पयात एक लिटर पाणी प्रवाशांच्या बाटलीत भरून दिले जाते. बाटली उपलब्ध नसल्यास आठ रुपये आकारले जातात. या मोबदल्यात स्वच्छ आणि थंडगार पाणी मिळत असल्याचा असा दावा संबंधित कंपनीने त्यावेळी केला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मशिन्सद्वारे मिळणाºया पाण्याचा दर्जा घसरल्याने त्याबाबत ठाणे रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी येण्यास सुरूवात झाली आहे. बाटली नसलेल्या प्रवाशांना देण्यात येणाºया बाटल्या ठेवण्याबाबतही संबंधितांकडून कोणतीही काळजी घेण्यात येत नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

अशाप्रकारे मध्य रेल्वेच्या प्रत्येक स्थानकांवर एक -दोन किंवा त्यापेक्षाही जास्त मशिन्सद्वारे प्रवाशांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे, यासाठी रेल्वे प्रशासनाने मशिन्स बसविण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. ठाण्यात बसवलेल्या मशिन्सद्वारे मिळणाºया पाण्याप्रमाणेच इतर रेल्वेस्थानकातही मिळत असल्याची भिती प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. त्यानुसार सर्व रेल्वे स्थानकावर मशिन्सद्वारे मिळणाºया पाण्याचे नमूने तपासणीसाठी पाठवावे, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.

 

मशिन्सद्वारे अल्प किंमतीत मिळणाऱ्या शुद्ध पाण्याबाबत प्रवाशांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठाणे रेल्वे स्थानकातील चारही मशिन्सचे पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.

- सुरेश नायर, संचालक, ठाणे रेल्वे स्थानक

टॅग्स :thaneठाणेrailwayरेल्वे