शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

राहुल गांधी यांची १६ मार्चला ठाण्यात सभा, न्याय यात्रेचा चैत्यभूमीवर समारोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 10:45 IST

१७ मार्चला दादर चैत्यभूमी येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. याच दिवशी महाविकास आघाडीची मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.

ठाणे : काँग्रेस खा. राहुल गांधी यांची न्याय यात्रा १२ मार्च रोजी गुजरातमधून नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल. त्यानंतर धुळे, मालेगाव, नाशिक आणि वाडा मार्गाने त्यांचे ठाणे शहरात आगमन होणार आहे. ठाण्यात १६ मार्चला जांभळी नाका येथे राहुल गांधी यांची सभा होईल. सभेसाठी व्यासपीठ उभारले जाणार नाही. १७ मार्चला दादर चैत्यभूमी येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. याच दिवशी महाविकास आघाडीची मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली भारत जोडो न्याय यात्रा ही १६ मार्च  रोजी ठाण्यातून पुढे जाणार आहे. त्याची पूर्वतयारी करण्याकरिता शनिवारी सकाळी बाळासाहेब थोरात हे ठाण्यातील शहर काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयात आले होते. त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत यात्रेच्या मार्गाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

भिवंडीची जागा काँग्रेसचीभिवंडी लोकसभेच्या जागेची मागणी शरद पवार यांनीदेखील केली आहे. मात्र काँग्रेसने भिवंडीची मागणी केली आहे. ही जागा काँग्रेसची होती. ती  काँग्रेसलाच मिळाली पाहिजे. जागावाटपात नवीन चेहऱ्याला संधी मिळणार असल्याची माहिती थोरात यांनी दिली.

महायुतीतील तिघांमध्ये संघर्ष राज्यात खोके सरकार असून त्यांची आपापसात भांडणे सुरू आहेत, एक आमदार पोलिस ठाण्यात गोळीबार करतो. , आमदारांमध्ये  विधानसभा पटांगणात धक्काबुक्की झाली, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. संयम सुटलेले सर्व लोक त्यांच्याकडे आहेत, असे थोरात म्हणाले. शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपला लगावलेल्या टोल्यावर थोरात म्हणाले की, तिघांमधील संघर्ष आता दिसून येत आहे.  हा तर ट्रेलर असून जसजशी निवडणूक जवळ येईल तसा सिनेमा पाहायला मिळणार असल्याचेही ते म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण