शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

राहुल गांधी यांची १६ मार्चला ठाण्यात सभा, न्याय यात्रेचा चैत्यभूमीवर समारोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 10:45 IST

१७ मार्चला दादर चैत्यभूमी येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. याच दिवशी महाविकास आघाडीची मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.

ठाणे : काँग्रेस खा. राहुल गांधी यांची न्याय यात्रा १२ मार्च रोजी गुजरातमधून नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल. त्यानंतर धुळे, मालेगाव, नाशिक आणि वाडा मार्गाने त्यांचे ठाणे शहरात आगमन होणार आहे. ठाण्यात १६ मार्चला जांभळी नाका येथे राहुल गांधी यांची सभा होईल. सभेसाठी व्यासपीठ उभारले जाणार नाही. १७ मार्चला दादर चैत्यभूमी येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. याच दिवशी महाविकास आघाडीची मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली भारत जोडो न्याय यात्रा ही १६ मार्च  रोजी ठाण्यातून पुढे जाणार आहे. त्याची पूर्वतयारी करण्याकरिता शनिवारी सकाळी बाळासाहेब थोरात हे ठाण्यातील शहर काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयात आले होते. त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत यात्रेच्या मार्गाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

भिवंडीची जागा काँग्रेसचीभिवंडी लोकसभेच्या जागेची मागणी शरद पवार यांनीदेखील केली आहे. मात्र काँग्रेसने भिवंडीची मागणी केली आहे. ही जागा काँग्रेसची होती. ती  काँग्रेसलाच मिळाली पाहिजे. जागावाटपात नवीन चेहऱ्याला संधी मिळणार असल्याची माहिती थोरात यांनी दिली.

महायुतीतील तिघांमध्ये संघर्ष राज्यात खोके सरकार असून त्यांची आपापसात भांडणे सुरू आहेत, एक आमदार पोलिस ठाण्यात गोळीबार करतो. , आमदारांमध्ये  विधानसभा पटांगणात धक्काबुक्की झाली, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. संयम सुटलेले सर्व लोक त्यांच्याकडे आहेत, असे थोरात म्हणाले. शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपला लगावलेल्या टोल्यावर थोरात म्हणाले की, तिघांमधील संघर्ष आता दिसून येत आहे.  हा तर ट्रेलर असून जसजशी निवडणूक जवळ येईल तसा सिनेमा पाहायला मिळणार असल्याचेही ते म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण