शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

वनकर्मचारी चौकशीच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 22:53 IST

शहरातील एका दास्तान डेपोवर विनापरवाना लाकडाचा मोठा साठा काही दिवसांपूर्वी पकडला होता

वाडा : शहरातील एका दास्तान डेपोवर विनापरवाना लाकडाचा मोठा साठा काही दिवसांपूर्वी पकडला होता. सुमारे ५० ते ६० ट्रक लाकडाचा साठा पकडला असून हा माल नेमकी कुठून आला हे वनविभाग अद्याप निश्चित करू शकलेले नाही. तालुक्यातील भुदान पाडा (तुसे) येथील मालकी तोडून सुमारे १२ ते १५ ट्रक लाकडाचा माल याच दास्तान डेपोवर टाकण्यात आला असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. विशेष म्हणजे तुसे येथे वन तपासणी नाका असताना हा माल येथून दास्तान डेपोवर गेला कसा असा सवाल आता उपस्थित होऊ लागला असून या प्रकरणात अनेक वनकर्मचारी संशयाच्या गर्तेत आहेत.वाडा मनोर महामार्गावरील ठाणगेपाडा येथे एका दास्तान डेपोवर विनापरवाना लाकडाचा साठा असल्याची खबर वनविभागाला मिळताच त्यावर धाड टाकून या डेपोत विनापरवाना ५० ते ६० ट्रक साग, खैर व इंजाली असा १०१२ घनमीटर लाकडाचा माल जप्त करण्यात आला होता. जप्त केलेल्या लाकडांची किमंत ४० लाखांहून अधिक असल्याचे वनअधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. यातील काही लाकडाचा माल आलमान गावातील काही शेतकºयांच्या खाजगी मालकीतील झाडे तोडून त्याचा साठा त्या दास्तान डेपोवर करण्यात आला होता, हे उघड झाले असले तरी आणखी माल कुठून आला हे वनविभाग अद्याप जाहीर करू शकलेले नाही.मात्र, वनकर्मचारी व जंगल ठेकेदार यांच्यात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे की, यातील काही माल भुदान पाडा (तुसे) येथून तर काही माल विक्र मगड तालुक्यातील येथून आणल्याची चर्चा आहे.भुदान पाडा (तुसे) येथील ३५ सेक्शन लागलेल्या खाजगी मालकीतून सुमारे १२ ते १५ ट्रक लाकडाचा माल या दास्तान डेपोवर आणला असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे तुसे येथे वनोपजाची तपासणी केंद्रे असल्याने तपासणी नाका ओलांडून लाकडाचा माल दास्तान डेपोवर आलाच कसा असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. हा माल आणताना ट्रकवर ताडपत्रीचे झाकण देऊन हा माल आणला गेल्याची चर्चा सुरू आहे. याशिवाय विक्र मगड तालुक्यातील झडपोली येथूनही लाकडाचा काही माल आणल्याची चर्चा आहे.दरम्यान, लाकडाचा माल हा अनेक ठिकाणाहून आलेला असल्याने त्या त्या विभागातले वनकर्मचारी हे या प्रकरणात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभागी असल्याने संशयाची सुई त्यांच्यापर्यत जाते. यात अनेक वनकर्मचारी गुंतले असल्याने या प्रकरणाची जिल्ह्याबाहेरील वनअधिकाºयाकडून चौकशी केल्यास सत्य उघडकीस येईल अन्यथा हे प्रकरण दाबून येथेच संपवण्याच्या प्रयत्नात वनअधिकारी असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, या प्रकणाला छापा मारणारे अधिकारी व स्थानिक अधिकारी यांच्यातील मतभेदाची किनार असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळेच एवढे मोठे प्रकरण उघड झाले असून या भागातील असे अनेक दस्तानामध्ये तस्कीची लाकडे असण्याचा संशय आहे.

टॅग्स :palgharपालघरCrimeगुन्हा