शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सफाई कामगारांचे प्रश्न ३० वर्षांपासून प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 03:03 IST

भार्इंदर : राज्यातील स्थायी सफाई कामगारांच्या अतिरिक्त रोजगारासह पुनर्वसनाचे प्रश्न सोडवण्यासाठी नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने ३० वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही, अशी खंत महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार यांनी व्यक्त केली.

भार्इंदर : राज्यातील स्थायी सफाई कामगारांच्या अतिरिक्त रोजगारासह पुनर्वसनाचे प्रश्न सोडवण्यासाठी नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने ३० वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही, अशी खंत महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार यांनी व्यक्त केली. बुधवारी ते मीरा-भार्इंदर महापालिकेतील स्थायी सफाई कामगारांच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी आले होते.या बैठकीचा अहवाल राज्य सरकारला देण्यात येणार असून तत्पूर्वी राज्यातील सर्व स्थानिक प्रशासनांसह रुग्णालयाचा दौरा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कामगारांसाठी स्थापन केलेला आयोग आघाडी सरकारच्या काळात गुंडाळून ठेवला होता. मात्र, या सरकारने त्याचे कार्य पुन्हा सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. त्याच सरकारच्या काळात स्थायी सफाई कामगारांच्या नियुक्तीला बगल देत कंत्राटी पद्धत सुरू करण्यात आल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे स्थायी व कंत्राटी सफाई कामगारांच्या सुविधांमधील दरी वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.स्थायी कामगारांनाच सरकारी योजनांपासून वंचित ठेवले जात असताना कंत्राटी सफाई कामगारांबाबत स्थानिक प्रशासनाची उदासीनता मात्र वाढत असल्याचा दावा त्यांनी केला. मीरा-भार्इंदर पालिकेत स्थायी कामगारांची एकूण १ हजार १८० पदे मंजूर असताना त्यातील ४५४ पदे अद्याप रिक्त असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यातच, कंत्राटी कामगारांची संख्या मात्र एक हजार ५९९ इतकी असल्याचेही त्यांनी सांगितले. पालिकेतील कालबाह्य पदोन्नतीचा लाभ सफाई कामगारांना दिला जात असला, तरी अद्याप अनेक कामगार शिक्षणाच्या तांत्रिक अडचणींमुळे त्यापासून वंचित असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. पत्रकार परिषदेपूर्वी त्यांनी आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्याशी चर्चा करून स्थायी कामगारांना नियमानुसार सुविधांपासून वंचित न ठेवण्याचे निर्देश दिले. त्यावर आयुक्तांनीही ग्वाही दिली. कधी अंमलबजावणी होणार याकडे लक्ष लागले आहे.पवार यांनी मीरा-भार्इंदर कामगार सेना, श्रमिक जनरल कामगार संघटनेच्या पदाधिकाºयांसोबत चर्चा केली.>सहा महिन्यांच्या समस्या सोडवणारकामगार सेनेचे सरचिटणीस सुल्तान पटेल यांनी पालिकेतील स्थायी सफाई कामगारांच्या प्रलंबित समस्यांचे निवेदन अध्यक्षांना दिले. त्यावर, त्यांनी एक प्रश्नावली तयार करून पालिकेला लेखी उत्तर देण्याचे निर्देश दिले. पालिकेने दिलेल्या उत्तरात किमान सहा महिन्यांच्या कालावधीत स्थायी सफाई कामगारांच्या प्रलंबित समस्या मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक