शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
5
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
6
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
7
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
8
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
9
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
10
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
11
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
12
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
13
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
14
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
15
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
16
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
17
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
18
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
19
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
20
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता

क्वारंटाइन केलेल्यांचे हाल संपता संपेनात, क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 01:54 IST

मात्र अवघ्या एक लीटर पाण्याच्या बाटलीवर दोन दिवस काढावे लागत असून जेवणीचही आबाळ सुरूआहे. रुग्णांची तपासणीदेखील वेळेवर होत नसल्याचे आरोपही होऊ लागले आहेत.

ठाणे : ठाण्यात एखाद्या भागात रुग्ण आढळला की त्याच्या संपर्कात येणाऱ्यांना घोडबंदर भागातील कासारवडली आणि भार्इंदरपाडा येथे क्वॉरन्टाइन केले जात आहे. परंतु, आता या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्तीचे नागरिक क्वॉरन्टाइन केले असल्याचा धक्कादायक आरोप नगरसेवकांनी केला आहे. शिवाय त्या ठिकाणी पाण्याचे बाटले भरून ठेवले आहेत, त्यामुळे दुसऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जास्तीतजास्त पाणी पिण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले असले तरी येथे मात्र अवघ्या एक लीटर पाण्याच्या बाटलीवर दोन दिवस काढावे लागत असून जेवणीचही आबाळ सुरूआहे. रुग्णांची तपासणीदेखील वेळेवर होत नसल्याचे आरोपही होऊ लागले आहेत.ठाण्यात कोरोनाबाधीतांच्या संख्येला आळा घालण्यात महापालिका प्रशासन आणि सिव्हील रुग्णालय प्रशासन कमी पडत असल्याचे चित्र आहे. शहरात आजघडीला २३० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना महापालिका कासारवडली आणि भार्इंदरपाडा येथे क्वॉरंटाइन करीत आहे. त्यामुळे येथील संशयितांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. याठिकाणी कोणत्याही स्वरूपाची पूर्तता वेळच्यावेळी होत नसल्यामुळे रुग्णांचे हाल सुरू आहेत. एकीकडे उन्हामुळे सारखी तहान लागत असताना एक जणाला दोन दिवसांसाठी केवळ एकच पाण्याची बॉटल पुरविली जात आहे. त्यामुळे पाण्याविना संशयितांचे हाल होत आहेत. शिवाय काही ठिकाणी पाच पाच लीटरचा बाटली ठेवले असून त्यातूनच येथील सर्वांना पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे यातून कोरोना वाढणार की कमी होणार असा सवालही केला जात आहे. जेवण वेळेवर मिळत नाही. तेही आम्ही मान्य करू. परंतु, एखाद्याला जास्तीचा त्रास सुरूझाला तरीदेखील त्याची तातडीने तपासणी केली जात नसून संशयितांनादेखील उपचारासाठी ताटकळत राहावे लागत असल्याची माहिती येथील क्वॉरंटाइन झालेल्या संशयितांनी दिली आहे. तपासणी वेळवर होत नसल्याने आजाराचे निदान वेळेत नाही, त्यामुळे एखादा कोरोनाची लक्षणे दिसणारा नागरिक इतरांच्याही संपर्कात येऊन रुग्णांच्या संख्येत एकप्रकारे भरच पडत आहे.>खासगी रुग्णालयांकडूनरुग्णांची लूटदुसरीकडे क्षमतेपेक्षा जास्तीचे नागरिक येथे ठेवल्याचा आरोप राष्टÑवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांना सोयीसुविधाही वेळेत मिळत नसल्याचे चित्र आहे. यासंदर्भात जगदाळे यांनी थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्रव्यवहार केला असून याची दखल घेण्याची मागणी केली आहे.अन्यथा, कोरोनाच्या रुग्णसंख्येत आणखी वाढ होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनीदेखील शासनाला व्हिडीओद्वारे विनंती केली असून शक्यतोवर शासकीय रुग्णालयात रुग्णांवर उपचार करावेत, अशी मागणी केली आहे. खाजगी रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी गेल्यास त्याचे बिल हे दीड ते दोन लाख जात आहे. ते भरणेही लॉकडाउनमुळे शक्य होत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. कमाईचे साधन नसल्याने एखाद्या रुग्णाने एवढे महागडे बिल कसे भरायचे, असा सवाल त्यांनी केला असून आता ही एकप्रकारची लूट असून यातही भ्रष्टाचार सुरूझाला की काय, अशी शक्यताही निर्माण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.