शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
6
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
7
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
8
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
9
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
10
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
11
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
12
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
13
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
14
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
15
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
16
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
18
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
19
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
20
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
Daily Top 2Weekly Top 5

कमी किमतीत केली वैद्यकीय साहित्याची खरेदी, ठाणे महापालिकेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 01:26 IST

Thane TMC News : ठाणे मनपाने राज्य शासनाने काढलेल्या नव्या अध्यादेशामध्ये ज्या किमतींना साहित्यखरेदी सांगितली आहे, त्यापेक्षा कमी किमतीत खरेदी केली असल्याची माहिती पुढे आली आहे.

ठाणे - मागील काही महिन्यांपासून महापालिकेकडून कोरोनाकाळात वैद्यकीय साहित्य महागड्या दरात विकत घेतल्याची टीका केली जात आहे. परंतु, मनपाने राज्य शासनाने काढलेल्या नव्या अध्यादेशामध्ये ज्या किमतींना साहित्यखरेदी सांगितली आहे, त्यापेक्षा कमी किमतीत खरेदी केली असल्याची माहिती पुढे आली आहे. आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तीन महिन्यांपूर्वी पालिकेने हे साहित्य कमी किमतीत खरेदी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये एन-९५ मास्क असतील किंवा थ्री-लेअरचे मास्क असतील किंवा पीपीई किट असेल, या सर्वच वस्तू कमी किमतीत खरेदी केल्या असल्याचा दावा केला आहे.कोरोनाकाळात वैद्यकीय अत्यावश्यक साहित्यखरेदी करण्यावरूनही पालिका अडचणीत आली होती. भाजपने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. परंतु, आता शासनाच्या दरापेक्षाही कमी किमतीत साहित्यखरेदी केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.विशेष म्हणजे राज्य शासनाचा अध्यादेश २० ऑक्टोबरच्या अध्यादेशापूर्वी तीन महिने आधीच या साहित्याची खरेदी कमी किमतीत केली आहे. शासनाने एन-९५ मास्कची किंमत २८ रुपये निश्चित केली आहे. ठामपाने ते २७.६० रुपयांना, तर थ्री-लेअर मास्कची किंमत चार रुपये असताना ते मास्क २.१८ रुपयांना खरेदी केले आहेत. पीपीई किटची खरेदीही २८२.५० रुपयांना केली आहे. बाजारात याची किंमत ३५० रुपयांंपासून पुढे आहे. तर, बाजारात थर्मल गन १२०० ते २००० रुपयांंपर्यंत मिळत असताना पालिकेने ती ७८८.४० रुपये आणि ऑक्सिमीटरची बाजारात ८०० ते १२०० रुपये किंंमत असताना ते ४४६.८८ रुपयांना खरेदी केले आहे.शासनाने आता किमती निश्चित केल्या आहेत. परंतु, ठाणे महापालिकेने तीन महिन्यांंपूर्वीच त्या साहित्याची कमी किमतीत खरेदी केली आहे. तसेच आतादेखील निविदा काढली आहे. ती खरेदी आणखी कमी किमतीत आम्ही करू, असा आमचा प्रयत्न आहे. - गणेश देशमुख,अतिरिक्त आयुक्त, ठामपा 

जेवणावळीचे बिल नियमानुसारच - ठामपा आयुक्त  ठाणे : कोरोनाच्या आपत्तीत एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यात केवळ १०० ते ३१० रुग्णसंख्या असताना दररोज ८०० माणसांच्या जेवणावळीचे बिल काढल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी केला होता. परंतु, पालिकेने जी बिले काढली आहेत, ती नियमानुसारच असल्याचा दावा मनपा आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केला आहे. आयसीएमआरच्या निर्देशानुसारच प्रत्येक रुग्णामागे किती स्टाफ गरजेचा असतो, त्याची माहिती आरोप करणाऱ्या नगरसेवकांना माहीत नसावी, असेही त्यांनी सांगितले. शहरात मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून क्वारंटाइन सेंटर उभारण्यास सुरुवात झाली होती. या केंद्रांतील रुग्ण व कर्मचाऱ्यांना चहा, नाश्ता, दोन्ही वेळचे जेवण पुरविण्यासाठी २८० रुपयांचे पॅकेज मंजूर केले होते. मनपा हद्दीत १५ एप्रिलला रुग्णांची संख्या ११० होती, तर ३० एप्रिलला ती ३१० पर्यंत पोहोचली होती. मात्र, १५ ते ३० एप्रिल या काळात क्वारंटाइन केंद्रांतील रुग्ण, वैद्यकीय व मनपातील कर्मचारी आदी सुमारे ८०० जणांना जेवण दिल्याचे बिल आकारले आहे. यापोटी मनपाने ३३ लाख ६५ हजारांचे बिल मंजूर केले असल्याचा आरोप पवार यांनी केला होता. परंतु, नगरसेवकांनी आरोप करताना केवळ रुग्णच धरले आहेत. परंतु, त्यांची सेवा करण्यासाठी प्रत्येक रुग्णामागे स्टाफची संख्या किती असावी लागते, त्याचाच हा खर्च लावल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  

दुधाचाही समावेशठाणे महापालिकेकडून एका जेवणाच्या ताटामागे २८० रुपये आकारले जात आहेत. हा दर कमी असून यामध्ये तर रुग्णांना दूध आणि अंडी यांचाही समावेश आहे. इतर महापालिका ३०० ते ४५० रुपये दराने जेवण देत असल्याचा दावा आयुक्तांनी केला.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे