शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

म्हसा यात्रेपुढे आव्हान मूलभूत सुविधा पुरवण्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 3:36 AM

मुरबाड : दोनशे वर्षाची परपंरा असलेल्या आणि पौष पौर्णिमेपासून सुरू होणा-या म्हसा यात्रेपुढे यंदाही मूलभूत सुविधांचे आव्हान आहे.

मुरबाड : दोनशे वर्षाची परपंरा असलेल्या आणि पौष पौर्णिमेपासून सुरू होणा-या म्हसा यात्रेपुढे यंदाही मूलभूत सुविधांचे आव्हान आहे. म्हसा रस्त्याचे अपूर्ण काम, पार्किंगवर अद्याप न निघालेला तोडगा आणि पाणीपुरवठ्याबाबत ठोस निर्णय न झाल्याने लाखोंच्या संख्येने येणा-या भाविकांची गैरसोय टाळण्याचे काम प्रशासनाला युद्धपातळीवर करावे लागणार आहे.मुरबाड-कर्जत रस्त्यावरील म्हसा गावातील ही यात्रा यंदा २ जानेवारीला सुरु होत आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू या राज्यात ही यात्रा प्रसिद्ध आहे. खांबलिंगेश्वर म्हसोबा हे शंकराचे देवस्थान असलेल्या या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गुरांचा बाजार. तो शेकडो एकर माळरानावर भरतो आणि ५० हजारांच्या आसपास देखण्या, आकर्षक जनावरांची खरेदी-विक्र ी या यात्रेत होते. मागली वर्षी बैलजोडी दोन लाखापर्यंत विकली गेली होती. गोवंश हत्याबंदीनंतर या बाजारात गेल्यावर्षी तुलनेने कमी जनावरे आल्याचे निरीक्षण नोंदवले गेले.यात्रेकरूंच्या मनोरंजनासाठी येथे महाराष्ट्रातील तमाशा फड येतात. त्यातील गण-गवळण आणि वगनाट्य पाहण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील लोक यात्रेत हजेरी लावतात. यात्रेत नवस फेडणाºयांची गर्दी असते.घोंगडी बाजार हे या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य. जरी मऊ रजया मिळत असल्या, तरी पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या घोंगड्या, सतरंज्या येथे भरपूर खरेदी केल्या जातात. हातोलीसारखे मिठाईचे पदार्थ खास जत्रेसाठी बनवले जात असल्याने त्यासाठी तसेच एरव्ही जत्रेत खरेदी केल्या जाणाºया गोडी शेवेसारख्या पदार्थांसाठी खवय्यांची गर्दी होते. पारंपरिक पद्धतीची-जुन्या घाटाची भांडी-लोखंडाचे तवे आणि अन्य गृहोपयोगी वस्तुही मिळत असल्यामुळे म्हसा यात्रेत बैल बाजार, घोगंडी बाजार, भांडी बाजार, मिठाई गल्ली यांच्या पेठा पाहायला मिळतात.जत्रा असल्याने चक्री पाळणे, मुलांसाठीची मनोरंजनाची साधने, खेळणी, मौत का कुआँ, डान्स पार्टी, जादुचे खेळ पाहायला गर्दी होते. हल्ली बैलबाजार अवघे दोन ते तीन दिवस चालतो. पण मनोरंजनाच्या इतर साधनांमुळे यात्रेत दोन आठवडे गर्दी असते.>पार्किंगचे आव्हान : वेगवेगळ््या दिवशी मिळून लाखो भाविक यात्रेत हजेरी लावतात. यात्रेसाठी एसटीच्या जादा बसेस असतात. पण खाजगी वाहनांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे पार्किंगची समस्या दरवर्षी भेडसावते. त्यासाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात. त्यावर प्रशासनाचे नियंत्रण नसते. शिवाय वाहने बाहेर काढण्यातही शिस्त नसल्याने कोंडी होते आणि किलोमीटरभर लांब रांगा लागतात. त्यावर प्रशासनाने काय उपाय योजले आहेत, ते अजून जाहीर केलेले नाहीत. रहदारीच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम, तसेच मुरबाड-म्हसा रस्त्याचे काम अजून सुरू आहे. शिवाय कर्जतच्या दिशेचा रस्ताही खराब आहे. अनेक ठिकाणी पुलांचे कठडेही तुटलेले आहेत.>पाण्याचा प्रश्न कायमचयात्रेतील भाविकांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून परिसरातील विहिरींचे निर्जंतुकीकरण केले जाते. त्याऐवजी तात्पुरत्या नळजोडण्या देण्याची मागणी दरवर्षी केली जाते. पण यंदाही ती पूर्ण होण्याची शक्यता नाही. यात्रेच्या काळात तात्पुरत्या वीजजोडण्या दिल्या जातात. पण अवघे २० ते २५ मीटर पुरवले जात असल्याने वीजचोरीची तक्रार होते. मागणी करूनही दुकानांच्या संख्येच्या प्रमाणात ही सोय उपलब्ध करून दिली जात नाही. या काळात रस्त्यावर दिव्यांची सुविधा मात्र उपलब्ध होते.>मंदिर परिसरातील गर्दी : यात्रेला आलेली प्रत्येक व्यक्ती खांबलिंगेश्वराचे दर्शन घेऊनच पुढे जाते. पण मंदिराच्या आवारात गर्दी कमी करण्याच्या उपाययोजना फार नसतात. तेथे फेरीवाल्यांची गर्दी असते. ती कमी केल्यास मंदिराच्या आवारात भाविकांना मोकळेपणाने दर्शन घेता येऊ शकते.