शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

म्हसा यात्रेपुढे आव्हान मूलभूत सुविधा पुरवण्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 03:36 IST

मुरबाड : दोनशे वर्षाची परपंरा असलेल्या आणि पौष पौर्णिमेपासून सुरू होणा-या म्हसा यात्रेपुढे यंदाही मूलभूत सुविधांचे आव्हान आहे.

मुरबाड : दोनशे वर्षाची परपंरा असलेल्या आणि पौष पौर्णिमेपासून सुरू होणा-या म्हसा यात्रेपुढे यंदाही मूलभूत सुविधांचे आव्हान आहे. म्हसा रस्त्याचे अपूर्ण काम, पार्किंगवर अद्याप न निघालेला तोडगा आणि पाणीपुरवठ्याबाबत ठोस निर्णय न झाल्याने लाखोंच्या संख्येने येणा-या भाविकांची गैरसोय टाळण्याचे काम प्रशासनाला युद्धपातळीवर करावे लागणार आहे.मुरबाड-कर्जत रस्त्यावरील म्हसा गावातील ही यात्रा यंदा २ जानेवारीला सुरु होत आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू या राज्यात ही यात्रा प्रसिद्ध आहे. खांबलिंगेश्वर म्हसोबा हे शंकराचे देवस्थान असलेल्या या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गुरांचा बाजार. तो शेकडो एकर माळरानावर भरतो आणि ५० हजारांच्या आसपास देखण्या, आकर्षक जनावरांची खरेदी-विक्र ी या यात्रेत होते. मागली वर्षी बैलजोडी दोन लाखापर्यंत विकली गेली होती. गोवंश हत्याबंदीनंतर या बाजारात गेल्यावर्षी तुलनेने कमी जनावरे आल्याचे निरीक्षण नोंदवले गेले.यात्रेकरूंच्या मनोरंजनासाठी येथे महाराष्ट्रातील तमाशा फड येतात. त्यातील गण-गवळण आणि वगनाट्य पाहण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील लोक यात्रेत हजेरी लावतात. यात्रेत नवस फेडणाºयांची गर्दी असते.घोंगडी बाजार हे या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य. जरी मऊ रजया मिळत असल्या, तरी पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या घोंगड्या, सतरंज्या येथे भरपूर खरेदी केल्या जातात. हातोलीसारखे मिठाईचे पदार्थ खास जत्रेसाठी बनवले जात असल्याने त्यासाठी तसेच एरव्ही जत्रेत खरेदी केल्या जाणाºया गोडी शेवेसारख्या पदार्थांसाठी खवय्यांची गर्दी होते. पारंपरिक पद्धतीची-जुन्या घाटाची भांडी-लोखंडाचे तवे आणि अन्य गृहोपयोगी वस्तुही मिळत असल्यामुळे म्हसा यात्रेत बैल बाजार, घोगंडी बाजार, भांडी बाजार, मिठाई गल्ली यांच्या पेठा पाहायला मिळतात.जत्रा असल्याने चक्री पाळणे, मुलांसाठीची मनोरंजनाची साधने, खेळणी, मौत का कुआँ, डान्स पार्टी, जादुचे खेळ पाहायला गर्दी होते. हल्ली बैलबाजार अवघे दोन ते तीन दिवस चालतो. पण मनोरंजनाच्या इतर साधनांमुळे यात्रेत दोन आठवडे गर्दी असते.>पार्किंगचे आव्हान : वेगवेगळ््या दिवशी मिळून लाखो भाविक यात्रेत हजेरी लावतात. यात्रेसाठी एसटीच्या जादा बसेस असतात. पण खाजगी वाहनांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे पार्किंगची समस्या दरवर्षी भेडसावते. त्यासाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात. त्यावर प्रशासनाचे नियंत्रण नसते. शिवाय वाहने बाहेर काढण्यातही शिस्त नसल्याने कोंडी होते आणि किलोमीटरभर लांब रांगा लागतात. त्यावर प्रशासनाने काय उपाय योजले आहेत, ते अजून जाहीर केलेले नाहीत. रहदारीच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम, तसेच मुरबाड-म्हसा रस्त्याचे काम अजून सुरू आहे. शिवाय कर्जतच्या दिशेचा रस्ताही खराब आहे. अनेक ठिकाणी पुलांचे कठडेही तुटलेले आहेत.>पाण्याचा प्रश्न कायमचयात्रेतील भाविकांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून परिसरातील विहिरींचे निर्जंतुकीकरण केले जाते. त्याऐवजी तात्पुरत्या नळजोडण्या देण्याची मागणी दरवर्षी केली जाते. पण यंदाही ती पूर्ण होण्याची शक्यता नाही. यात्रेच्या काळात तात्पुरत्या वीजजोडण्या दिल्या जातात. पण अवघे २० ते २५ मीटर पुरवले जात असल्याने वीजचोरीची तक्रार होते. मागणी करूनही दुकानांच्या संख्येच्या प्रमाणात ही सोय उपलब्ध करून दिली जात नाही. या काळात रस्त्यावर दिव्यांची सुविधा मात्र उपलब्ध होते.>मंदिर परिसरातील गर्दी : यात्रेला आलेली प्रत्येक व्यक्ती खांबलिंगेश्वराचे दर्शन घेऊनच पुढे जाते. पण मंदिराच्या आवारात गर्दी कमी करण्याच्या उपाययोजना फार नसतात. तेथे फेरीवाल्यांची गर्दी असते. ती कमी केल्यास मंदिराच्या आवारात भाविकांना मोकळेपणाने दर्शन घेता येऊ शकते.