शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

ठाण्यात मनाई आदेश: अत्यावश्यक कामांसाठीच घराबाहेर पडण्याची परवानगी

By जितेंद्र कालेकर | Updated: June 1, 2020 22:04 IST

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हयात मनाई आदेश लागू करण्यात आल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम तसेच चारपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्याला बंदी करण्यात आली आहे. आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवासाला पोलिसांच्या ई पास शिवाय परवानगी नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे ठाणे जिल्हयात कलम १४४ लागू सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी कायम

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: राज्यात येत्या ५ आणि ८ जूनपासून कंटेनमेंट झोन वगळता अनेक ठिकाणी संचारबंदीमध्ये शिथिलता करण्यात आली आहे. मात्र, ठाणे जिल्हयात मनाई आदेश लागू करण्यात आल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम तसेच चारपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्याला बंदी करण्यात आली आहे. याशिवाय, आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवासाला पोलिसांच्या ई पास शिवाय परवानगी देण्यात येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.केंद्र शासनाने येत्या ८ जून पासून अनेक व्यवहारांमध्ये शिथिलता आणली आहे. तसेच १ जूनपासून परराज्यात आणि आंतरजिल्हा प्रवासाला परवानगीची गरज नसल्याचे म्हटले आहे. शिवाय, संपूर्ण दिवसभर संचारबंदीतही शिथिलता करुन रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. असे असले तरी ठाणे जिल्हयातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या तसेच सद्य परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाच्या आदेशाने ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात आणि ठाणे ग्रामीण भागात संचारबंदी शिथिल केलेली नाही. मात्र, अत्यावश्यक कामांसाठी किराणा, दूध, वैद्यकीय तसेच या सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी संचारबंदी लागू राहणार नाही. याशिवाय, अत्यावश्यक कामांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत परवानगी राहणार आहे. मुख्य बाजारपेठ येत्या ५ जूननंतर सुरु होणार असून ती सम विषम तारखेनुसार एक दिवसाआड रस्त्याच्या एकाच बाजूने सुरु राहणार आहेत. १ ते ३० जून या कालावधीत हा मनाई आदेश लागू असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम, सण, उत्सव, स्पर्धा, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रम आदींना बंदी राहणार असल्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.याशिवाय, खासगी आणि सार्वजनिक वाहतूक सेवाही बंद राहणार असल्यामुळे आंतरराज्य, राज्यांतर्गत, जिल्हांतर्गत प्रवासी बस वाहतूकीस मनाई राहणार आहे. सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्थाही बंद राहणार आहेत.अर्थात ३ जून पासून सार्वजनिक उद्यानात व्यायाम, फिरणे, सायकलींगला सकाळी ५ ते सायंकाळी ७ पर्यंत मुभा राहणार आहे. अत्यावश्यक सेवांसाठी टॅक्सी चालक अधिक दोन, रिक्षामध्ये चालक अधिक दोन प्रवासी, चार चाकी वाहनांतूनही चालकासह तिघे, दुचाकीवर फक्त चालक अशी परवानगी देण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.* अंत्यविधीसाठी कमाल २० तर लग्न समारंभाला ५० व्यक्तींना परवानगी दिली आहे. किराणा सामान, दुध, फळे, भाजीपाला, औषधे तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यासाठी परवानगी आहे.* बँक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, टेलिकॉम, टपाल, केबल आणि रुग्णालय, पेट्रोलपंप आदी कर्मचाऱ्यांनाही यातून वगळण्यात आले आहे.

‘‘ केवळ अत्यावश्यक कामांसाठी १ ते ३० जून या काळात घराबाहेर पडण्यासाठी परवानगी राहणार आहे. ५ जून नंतर सम विषम तारखेनुसार दुकाने बाजारपेठांमध्ये सुरु करता येतील. आंतरराज्य आणि जिल्हा प्रवासाला मात्र अजूनही ई पास शिवाय परनवानगी दिलेली नाही.’’बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर पोलीस आयुक्तालय

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस