शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात मनाई आदेश: अत्यावश्यक कामांसाठीच घराबाहेर पडण्याची परवानगी

By जितेंद्र कालेकर | Updated: June 1, 2020 22:04 IST

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हयात मनाई आदेश लागू करण्यात आल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम तसेच चारपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्याला बंदी करण्यात आली आहे. आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवासाला पोलिसांच्या ई पास शिवाय परवानगी नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे ठाणे जिल्हयात कलम १४४ लागू सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी कायम

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: राज्यात येत्या ५ आणि ८ जूनपासून कंटेनमेंट झोन वगळता अनेक ठिकाणी संचारबंदीमध्ये शिथिलता करण्यात आली आहे. मात्र, ठाणे जिल्हयात मनाई आदेश लागू करण्यात आल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम तसेच चारपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्याला बंदी करण्यात आली आहे. याशिवाय, आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवासाला पोलिसांच्या ई पास शिवाय परवानगी देण्यात येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.केंद्र शासनाने येत्या ८ जून पासून अनेक व्यवहारांमध्ये शिथिलता आणली आहे. तसेच १ जूनपासून परराज्यात आणि आंतरजिल्हा प्रवासाला परवानगीची गरज नसल्याचे म्हटले आहे. शिवाय, संपूर्ण दिवसभर संचारबंदीतही शिथिलता करुन रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. असे असले तरी ठाणे जिल्हयातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या तसेच सद्य परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाच्या आदेशाने ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात आणि ठाणे ग्रामीण भागात संचारबंदी शिथिल केलेली नाही. मात्र, अत्यावश्यक कामांसाठी किराणा, दूध, वैद्यकीय तसेच या सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी संचारबंदी लागू राहणार नाही. याशिवाय, अत्यावश्यक कामांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत परवानगी राहणार आहे. मुख्य बाजारपेठ येत्या ५ जूननंतर सुरु होणार असून ती सम विषम तारखेनुसार एक दिवसाआड रस्त्याच्या एकाच बाजूने सुरु राहणार आहेत. १ ते ३० जून या कालावधीत हा मनाई आदेश लागू असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम, सण, उत्सव, स्पर्धा, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रम आदींना बंदी राहणार असल्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.याशिवाय, खासगी आणि सार्वजनिक वाहतूक सेवाही बंद राहणार असल्यामुळे आंतरराज्य, राज्यांतर्गत, जिल्हांतर्गत प्रवासी बस वाहतूकीस मनाई राहणार आहे. सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्थाही बंद राहणार आहेत.अर्थात ३ जून पासून सार्वजनिक उद्यानात व्यायाम, फिरणे, सायकलींगला सकाळी ५ ते सायंकाळी ७ पर्यंत मुभा राहणार आहे. अत्यावश्यक सेवांसाठी टॅक्सी चालक अधिक दोन, रिक्षामध्ये चालक अधिक दोन प्रवासी, चार चाकी वाहनांतूनही चालकासह तिघे, दुचाकीवर फक्त चालक अशी परवानगी देण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.* अंत्यविधीसाठी कमाल २० तर लग्न समारंभाला ५० व्यक्तींना परवानगी दिली आहे. किराणा सामान, दुध, फळे, भाजीपाला, औषधे तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यासाठी परवानगी आहे.* बँक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, टेलिकॉम, टपाल, केबल आणि रुग्णालय, पेट्रोलपंप आदी कर्मचाऱ्यांनाही यातून वगळण्यात आले आहे.

‘‘ केवळ अत्यावश्यक कामांसाठी १ ते ३० जून या काळात घराबाहेर पडण्यासाठी परवानगी राहणार आहे. ५ जून नंतर सम विषम तारखेनुसार दुकाने बाजारपेठांमध्ये सुरु करता येतील. आंतरराज्य आणि जिल्हा प्रवासाला मात्र अजूनही ई पास शिवाय परनवानगी दिलेली नाही.’’बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर पोलीस आयुक्तालय

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस