एकात्मिक पाणलोट अभियानाच्या भरतीत परप्रातींयांना प्राधान्य का?
By Admin | Updated: June 1, 2016 02:18 IST2016-06-01T02:18:22+5:302016-06-01T02:18:22+5:30
जिल्ह्यात एकात्मिक पाणलोट अभियाना अंतर्गत झालेल्या कृषि आरटीके, उपजीविका आरटीके, समुदाय संघटक ह्या जागांसाठी करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावरील भरती

एकात्मिक पाणलोट अभियानाच्या भरतीत परप्रातींयांना प्राधान्य का?
पालघर : जिल्ह्यात एकात्मिक पाणलोट अभियाना अंतर्गत झालेल्या कृषि आरटीके, उपजीविका आरटीके, समुदाय संघटक ह्या जागांसाठी करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावरील भरती स्थानिकांना डावलून परप्रांतीयांची (जिल्हा) भरती करण्यात आली असून ती रद्द व्हावी व त्या जागी स्थानिकांची भरती केली जावी असे निवेदन पत्रकारांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.
त्याचप्रमाणे नवीन प्रकल्पात झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नेमणूकांमध्ये जे स्थानिक कंत्राटी कर्मचारी गेल्या तीन वर्षापासून काम करत होते मात्र त्यांना वगळून पर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या नेमणुका झाल्याचे निदर्शनात आले आहे. तसेच काही जुन्या स्थानिक कर्मचाऱ्यांना दूसरा जिल्हा देऊन त्यांची मुद्दाम गैरसोय करण्यात आली आले आहे. यामुळे गेल्या तीन वर्षापासून जुन्या प्रकल्पात काम करत असलेल्या स्थानिक कंत्राटी कर्मचाऱ्यांवरही मोठा अन्याय झाला आसून यात परजिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करतांना मोठा आर्थिकव्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिक्षित बेरोजगार तरुण असून त्यांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला असताना पर जिल्ह्यातील तरुणांना स्थान दिल्यान जिल्ह्यातील बेरोजगारांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याती तरुणवर्गात मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. याची दखल घेऊन जास्तीत जास्त स्थानिक तरुणांना यामधे संधी उपलब्ध करुन द्यावी. तसेच गेल्या तीन वर्षापासून काम करत असलेल्या पालघर जिल्ह्यातील स्थानिक कंत्राटी कर्मचाऱ्यांना पालघर जिल्ह्यातच जुन्या व नव्या प्रकल्पात नेमण्यात यावे. त्याचबरोबर स्थानिक बेरोजगारांवर झालेल्या अन्यायाची योग्य चौकशी करुन जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगार तरुणांना योग्य न्याय द्यावा. अशी मागणी समाज सेविका कविता पाडवी, कोंकण विभाग पत्रकारसंघ जिल्हा अध्यक्ष जयेश शेलार, विभाग पत्रकार संघ पालघर जिल्हा सरचिटणीस -सिद्धार्थ सांबरे, कोंकण विभाग पत्रकार संघ पालघर जिल्हा संघटक- सचिन भोईर, कोंकण विभाग पत्रकारसंघ विक्र मगड तालुका अध्यक्ष-अमोलसांबरे, राहुल पाटिल यानी निवेदनाद्वारे कृषी अधिकारी पालघर व आमदार अमीत घोडा यांच्याकडे केली आहे. (प्रतिनिधी)