शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

भाजपा विरोधातून राजकीय उलथापालथीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 01:00 IST

ठाणे जिल्हा परिषदेच्या राजकारणात भाजपाला बाजूला ठेवत शिवसेना-राष्ट्रवादीची स्थापन झालेली सत्ता आणि निवडणुकीत त्यांना काँग्रेसने दिलेली साथ यामुळे केवळ जिल्हा परिषदेचेच राजकारण बदलले असे

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या राजकारणात भाजपाला बाजूला ठेवत शिवसेना-राष्ट्रवादीची स्थापन झालेली सत्ता आणि निवडणुकीत त्यांना काँग्रेसने दिलेली साथ यामुळे केवळ जिल्हा परिषदेचेच राजकारण बदलले असे नव्हे, तर येत्या काळातील लोकसभा-विधानसभा निवडणुकीतील राजकीय उलथापालथीची ही नांदी मानली जाते. यामुळे नजिकच्या काळात उमेदवारांचे पक्षांतर, लोकसभेचे उमेदवार विधानसभेला; तर विधानसभेतील काही चेहरे लोकसभेला पाहायला मिळतील. त्यासाठी ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यातील मतदारांचा कल या निवडणुकीतून समोर आला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे या चार पक्षांच्या एकत्रिकरणाचा नवा ठाणे पॅटर्न अस्तित्त्वात आल्याने भाजपाला आपल्या राजकारणाचा पॅटर्न बदलावा लागणार आहे.लोकसभा, विधानसभा निवडणूक असो की स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी... निवडून येण्याच्या क्षमतेचे उमेदवार भाजपाने फोडायचे आणि कोणत्याही परिस्थितीत आपली सत्ता स्थापन करायची हा पायंडा ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने मोडून काढला. ते करताना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, रिपब्लिकन पक्षाचा सेक्यूलर गट यांची महायुती केली. परस्परांशी कोणतीच वैचारिक किंवा तात्त्विक बांधिलकी नसतानाही केवळ ‘भाजपा विरोध’ या एककलमी कार्यक्रमाखाली हे पक्ष एकत्र आल्याने नवे राजकारण प्रत्यक्षात आले.भाजपाच्या आक्रमकपणाला वेसण घालण्यासाठी भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीपासून सुरू झालेला हा सिलसिला अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रत्यक्षात आला. राज्यात कुठेही रोखला न गेलेला भाजपाच्या सत्तेचा वारू ठाणे जिल्हा परिषदेत चार पक्षांनी एकत्र येत रोखला आणि ‘भाजपालाही तुम्ही हरवू शकता’ ही घोषणा प्रत्यक्षात आणली. भाजपाने मुरबाड पंचायतीत सत्ता स्थापन केली, पण तो पक्षापेक्षा आमदार किसन कथोरे यांच्या राजकारणाचा करिष्मा होता. कल्याण पंचायतीतील भाजपाची सत्ता ही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्त्वाची महत्त्वाकांक्षा होती. भिवंडी पंचायतीत काँग्रेसचे उमेदवार फुटल्याने भाजपाला लॉटरी लागली असली, तरी त्यात भाजपाचे कसब कमी आणि नव्या राजकारणाची फेरजुळणीच अधिक आहे.वेगवेगळ््या प्रकल्पांमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असलेली खदखद, शेतकरी- कामगारांचा विरोध, नोकरदारांत वाढलेली असुरक्षिततेची भावना या साºयांचे कमी-अधिक प्रतिबिंब या निवडणुकीत पडले. भिवंडी महापालिका निवडणुकीवेळी मुस्लिमविरोध समोर आला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कुणबी समाज एकवटला. दलित-आदिवासी समाजाची मते फिरली. त्यामुळे अपेक्षेपेक्षा वेगळे निकाल लागले. ग्रामीण मतदारांतील शिवसेनेचा पाया विस्तृत झाला. मागील निकालांशी तुलना करता भाजपाला चांगले यश मिळाले असले तरी तो पक्षाचा नव्हे, तर बाहेरून पक्षात आलेल्या नेत्यांचा करिष्मा असल्याचे दिसून आले. चार पक्ष आणि अन्य काही गटा-तटांची मोट आपल्याविरोधात बांधली जाऊ शकते, याचा गांभीर्याने विचार करून भाजपाला आपल्या राजकारणाची दिशा बदलावी लागेल.संघ परिवाराचे काम महत्त्वाचेनवभाजपावाद्यांनी संघाशी आणि परिवारातील अनेक संघटनांशी गेल्या तीन वर्षांत फटकून राहण्याचा, अंतर राखण्याचा प्रयत्न केला. त्याचा फटका त्यांना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत भोगावा लागला. त्यामुळे हिंदू चेतना दिवसापासून त्यांनीही परिवाराच्या उपक्रमात सहभागी होत या संघटनांशी मिळतेजुळते घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजपा उमेदवारांना पाठिंब्याचे जे धोरण ठरेल ते ठरेल, तोवर किमान परिवारवाद्यांची नाराजी नको, या भावनेतून अनेकांनी स्वयंसेवक होण्यास सुरूवात केली आहे.आणखी एक मंत्रीपद?जिल्ह्यात शिवसेनेकडे कॅबिनेट मंत्रिपद आहे, तर भाजपाकडे राज्यमंत्रीपद आहे. लवकरच होणाºया मंत्रीमंडळ विस्तारात पक्षाला आणखी एक मंत्रीपद मिळावे, असा प्रयत्न सुरू आहे. तसे झाले तर त्याचा पक्षाला उपयोग होईल, असे म्हणणे मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यात आले आहे. मागील विस्तारावेळी संजय केळकर आणि किसन कथोरे यांची नावे चर्चेत होती. पण फक्त रवींद्र चव्हाण यांना संधी मिळाली.श्रमजीवीचेचुकलेले पाऊलआयत्यावेळी भाजपाला पाठिंबा देऊन श्रमजीवी संघटनेला फार फायदा झाला नाही. त्यांच्या उमेदवारांना भाजपाच्या चिन्हावर लढावे लागले. त्यात अवघी एक जागा पदरात पडली, भाजपाचा फायदा झाल्याने संघटनेतील धुसफूस बाहेर पडली. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी शिवसेनेला साथ दिली. त्यामुळे हे चुकलेले गणित श्रमजीवीला सुधारावे लागेल.

टॅग्स :BJPभाजपा