शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

राजकारण्यांचा ४00 कोटींच्या स्टेम प्राधिकरणावर डोळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 01:53 IST

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, केडीएमसी आणि मीरा भाईंदर या महापालिकांसह भिवंडी तालुक्यातील ३४ गावांना पाणीपुरवठा करणारे स्टेम प्राधिकरण पाच वर्षांपूर्वी आर्थिक संंकटात सापडले होते.

- सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, केडीएमसी आणि मीरा भार्इंदर या महापालिकांसह भिवंडी तालुक्यातील ३४ गावांना पाणीपुरवठा करणारे स्टेम प्राधिकरण पाच वर्षांपूर्वी आर्थिक संंकटात सापडले होते. मात्र, आता या प्राधिकरणाची ४०० कोटी रुपयांच्या जवळपास मालमत्ता आहे. तीवर डोळा ठेवून या कंपनीवर आपल्या निकटवर्तींची वर्णी लावण्यासाठी राजकारण्यांनी प्रयत्न सुरू केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.स्टेमघर प्राधिकरण ही पाणीपुरवठा करणारी देशातील पहिली व एकमेव कंपनी आहे. २०१४ पर्यंत या कंपनीच्या अभियंत्याचे वेतन करण्याचीदेखील ऐपत नव्हती. आर्थिक डबघाईला आलेल्या या कंपनीला सावरण्यासाठी सेवानिवृत्त विवेकानंद चौधरी यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आणि त्यांनी महापालिकांकडे थकलेली पाणीपट्टी कायदेशीर बाजूने वसूल केली. आता कंपनीला गेल्या पाच वर्षांत २८० कोटी रूपये नफा प्राप्त होऊन कंपनीची मालमत्ता ४०० कोटी रुपयांची झाली आहे. या कंपनीच्या मालमत्तेवर डोळा ठेवून महापालिकांमधील काही वरिष्ठ राजकारण्यांनी या प्राधिकरणावर आपल्या निकटवर्तींची वर्णी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी वेगवगेळ्या कुरापती सुरू केल्याचे ऐकायला मिळत आहे.उल्हास नदीवरून पाणी उचलणारे स्टेम प्राधिकरण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या काही भागासह भिवंडी, मीरा भार्इंदर आणि ठाणे महापालिका आदींमधील ४० लाख नागरिकांना पाणीपुरवठा करते. भिवंडी महापालिकेकडे १५ वर्षांपासूनची पाणीपट्टी रखडली होती. या महापालिकेसह मीरा भार्इंदर महापालिकेकडे रखडलेल्या कोट्यवधी रुपयांचे बिल लवादाच्या कायद्यानुसार वसूल करण्यात यश मिळाले आहे. आता स्टेमची ४०० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तीवर डोळा ठेवून या कंपनीच्या व्यवस्थापकपदी निकटवर्तीय अभियंत्याची वर्णी लावण्याच्या काही राजकारण्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी कुरापती करून या प्राधिकरणाच्या व्यवस्थापनावर आप्तस्वकीय अभियंत्यांची वर्णी लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.नवीन यंत्रणाही उभारलीठेकेदारीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीने कायम केले आहे. याशिवाय कंपनी व्यवस्थापनाने दोन किलोमीटरची नवीन पाईपलाईन टाकली आहे. एक नवा पंपहाऊस उभा केला असून वाया जाणारे पाणी प्रक्रिया करून पुन्हा वापरण्यास योग्य करण्यासाठी प्रकल्पही उभारला आहे.जिल्ह्यात सुरळीत पाणीपुरवठा करणारी कंपनी म्हणून आता महापालिकांचा या प्राधिकरणावर विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्याकडून थकीत बिलासह दर महिन्याची पाणीपट्टीदेखील वेळेवर मिळत आहे.कंपनीचे आर्थिक उत्पन्न वाढत असल्यामुळे या सोन्याची अंडी देणाºया कंपनीवर आपला निकटवर्ती व्यवस्थापक घुसवण्यासाठी राजकारण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यामुळे सध्याच्या व्यवस्थापनाविरोधात यानात्या कारणाने कुरापती काढण्यास सुरुवात केली आहे.२८० कोटी रुपयांचा नफादैनंदिन पाणीपुरवठा करणाºया या कंपनीकडे जिल्ह्यातील अन्यही गावांच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. स्टेम प्राधिकरणाची स्थापना २०११ ला झाली असता, त्यावेळी प्राधिकरणाकडे १७० कोटी रुपयांची मालमत्ता होती. पण अवघ्या तीन वर्षांत, म्हणजे २०१४ पर्यंत कंपनी डबघाईला येऊन ३० कोटींवर तग धरून उभी होती. आता कंपनी २८० कोटी रुपयांच्या नफ्यात आहे. भिवंडी महापालिका दरमहा एक कोटी रुपयांच्या पाणीबिलासह थकीत रक्कम महिन्याकाठी देत आहे. पुढील वर्षभरात कंपनीची ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता होणार आहे.

टॅग्स :thaneठाणे