शहरं
Join us  
Trending Stories
1
थिएटर मध्ये जाऊन "मनाचे श्लोक" चित्रपट बंद पाडणे उज्वला गौड यांना भोवले; गुन्हा दाखल
2
“वेळ पडल्यास लढायची तयारी, आम्ही घाबरत नाही”; १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनचे चोख प्रत्युत्तर
3
कॅनरा बँकेच्या FD मध्ये २ लाख रुपये गुंतवा; ३ वर्षांत मिळवा ४५ हजार रुपयांचे निश्चित व्याज!
4
कमालच झाली राव! WhatsApp वर खाच फीचर; प्रोफाइलवर क्लिक करताच सुरू होणार Facebook
5
कबुतरांमुळे महायुतीचे सरकार पडेल, जैन मुनींच्या इशाऱ्यावर CM फडवीसांचे थेट भाष्य; म्हणाले...
6
जम्मू-कटरा एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; काँग्रेस नेत्याच्या मुलासह ४ जणांचा मृत्यू
7
IND vs AUS Women’s World Cup 2025 Live Streaming : टीम इंडियासमोर तगडे आव्हान; इथं पाहा दोन्ही संघातील रेकॉर्ड
8
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
9
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
10
₹५,००० वाचवा, लखपती व्हा! 'या' सरकारी योजनेत दरमहा गुंतवणूक करुन जमा होईल २७ लाखांचा निधी
11
अतूट नातं! मृत्यूशी झुंज देणाऱ्या नवऱ्याचा वाचवला जीव, बायकोने दिली किडनी, म्हणाली...
12
मृण्मयी देशपांडेची 'मनाचे श्लोक' चित्रपटाबद्दल मोठी घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाली-"अतिशय दु:खद..."
13
नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
14
मोठी दुर्घटना! टेकऑफनंतर गोल गोल फिरलं, झाडावर आदळलं; हेलिकॉप्टर क्रॅशचा भयंकर Video
15
भारीच! "सणाच्या दिवशी काम नाही, फक्त आराम करा", 'या' कंपनीने दिवाळीला दिली ९ दिवस सुटी
16
गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पट्टेदार वाघ, ३ तास चालली रेस्क्यू मोहीम
17
घरात घुसून कुटुंबावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा, पिस्तुलासह रॉडने हल्ला 
18
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
19
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
20
दुर्गापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन तरुणांना अटक; सुवेंदू अधिकारी यांनी केली एन्काउंटरची मागणी

'मीरा भाईंदर'मध्ये ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यावरून राजकीय कुरघोड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 19:45 IST

मुंबई महापालिकेत ५०० फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ केल्यानंतर मीरा भाईंदरमध्ये तशी मागणी झाली आहे. परंतु एकमेकांना शह-काटशह देत कुरघोड्या करण्याचा प्रयत्न भाजपा व शिवसेने चालविल्याने कर माफीवरून राजकारण तापले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मुंबई महापालिकेत ५०० फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ केल्यानंतर मीरा भाईंदरमध्ये तशी मागणी झाली आहे. परंतु एकमेकांना शह-काटशह देत कुरघोड्या करण्याचा प्रयत्न भाजपा व शिवसेने चालविल्याने कर माफीवरून राजकारण तापले आहे.  

शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने शासनास दिलेल्या प्रस्तावा नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५०० फुटा पर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्यास मंजुरी दिली. ठाणे, नवी मुंबई महापालिकेने सुद्धा तसा ठराव केला आहे. मीरा भाईंदरमधील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन सह पालिका विरोधीपक्ष नेते धनेश पाटील यांनी नागरिकांना कर माफ करण्यासाठी महासभेत ठराव करण्याची लेखी मागणी महापौर ज्योत्सना हसनाळे याना केली. त्यामुळे कोंडी झालेल्या सत्ताधारी भाजपाला येणाऱ्या २५ जानेवारी रोजीच्या महासभेत ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा प्रस्ताव आणावा लागला आहे. 

माजी आमदार नरेंद्र मेहतांनी ह्या प्रकरणी पालिकेत पत्रकार परिषद घेऊन, महाविकास आघाडी सरकार सह शिवसेना व दोन्ही आमदारांवर टीका केली. सरनाईक व जैन यांनी राजकारण करायचे म्हणून महापौरांना पत्र दिले असा आरोप केला. परंतु मेहतांनी एकीकडे मुंबईला मंजुरी दिली त्याचवेळी मीरा भाईंदर व अन्य कोणत्याही पालिकेचे नाव टाकून कर माफीचा आदेश मुख्यमंत्र्यांना काढता आला असता असे सांगताना दुसरीकडे मुंबई पालिकेने ठराव करून पाठवला मग मुख्यमंत्र्यांनी तो मंजूर केला व तसा आदेश काढून मालमत्ता कर माफ केला असे म्हटले . सरकार कडून काही नको महापालिका सक्षम आहे सांगताना दुसरीकडे  महासभेने मंजुरी दिली तरी आयुक्त दिलीप ढोले यांनी गोषवारा दिला नसल्याने ते मंजूर का विखंडित करायला पाठवतात? असा प्रश्न केला. सरनाईकानी स्वतःचा दंड माफ करून आणला तसाच ते नागरिकांच्या करमाफीला शासना कडून मंजुरी मिळवतील असा टोला मेहतांनी लगावला. 

मेहतांच्या शह नंतर सरनाईकांनी काटशह दिला आहे. त्यांनी ठाणे महापालिकेच्या महासभेत करमाफीसाठी झालेला राजकीय ठरावची प्रतच महापौरांना दिली आहे. ठाण्यात जसा प्रशासनाला विश्वासात घेऊन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकमताने ठराव केला व प्रशासनाच्या सहमतीने तो शासनाकडे पाठवला असल्याने मीरा भाईंदरमध्ये सत्ताधारी भाजपाने त्यांच्या पालिका प्रशासना कडून सकारात्मक अहवाल व प्रस्ताव घ्यावा सांगून ती मेहता व भाजपाची जबाबदारी असल्या कडे बोट केले आहे . शहरातील कष्टकरी लोकांना करमाफी मिळाली पाहिजे ही शिवसेनेची स्पष्ट भूमिका आहे.  परंतु आमच्या भूमिकेवर पालिकेतील भाजपच्या  सत्ताधारी नेत्यांनी, महापौर आदींनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी राजकारण करून नागरिकांची फसवणूक करू नये असा टोला सरनाईकानी लगावला आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर