शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
4
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
5
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
6
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
7
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
8
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
10
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
11
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
12
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
13
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
14
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
15
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
16
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
17
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
18
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
19
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
20
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील

राजकीय वैमनस्यातून ठाण्यात दोघांवर चाकू हल्ला, शिवसेना भाजपा कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 22:46 IST

पूर्व राजकीय वैमनस्यातून सोनू पाल आणि त्याच्या सात ते आठ साथीदारांनी वागळे इस्टेट विभागाचे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सागर मेटकरी आणि धनंजय कावळे यांच्यावर चाकू, बांबू आणि दगडाने हल्ला केल्याची तक्रार वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

ठाणे, दि. २५ - पूर्व राजकीय वैमनस्यातून सोनू पाल आणि त्याच्या सात ते आठ साथीदारांनी वागळे इस्टेट विभागाचे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सागर मेटकरी आणि धनंजय कावळे यांच्यावर चाकू, बांबू आणि दगडाने हल्ला केल्याची तक्रार वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या हल्ल्याचे शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे हे सूत्रधार असल्याचा आरोप करीत त्यांच्या अटकेची मागणी भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे केली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (२४ सप्टेंबर) रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास रघुनाथनगर येथील कशिश पार्क सोसायटीतील सागर मेटकरी आणि धनंजय कावळे या दोघांना सोनू पाल आणि त्याच्या साथीदारांनी जबर मारहाण केली. त्यानंतर बांबू, दगड आणि चाकूनेही त्यांच्यावर हल्ला केला. यात मेटकरीच्या हातावर चाकूचा वार झाला असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.यासंदर्भात भाजप युवा मोर्चा ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश आंग्रे यांच्यासह २० ते २५ कार्यकर्त्यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांची सोमवारी दुपारी भेट घेतली. याप्रकरणी रेपाळे हे सूत्रधार असून त्यांनाही अटक झालीच पाहिजे, अशी जोरदार मागणी या कार्यकर्त्यांनी यावेळी केली. यासाठी त्यांनी मालेकर यांना काही काळ घेरावही घातला होता. मात्र, रेपाळे यांचे नाव एफआयआरमध्ये नसल्याचे मालेकर यांनी या कार्यकर्त्यांना सांगितले. परंतु, यात कोणीही दोषी आढळले तरी संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन मालेकर यांनी या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना दिले.अशी आहे पार्श्वभूमी...सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कशिश पार्क येथील स्थानिक नगरसेविका नम्रता भोसले, रुपाली रेपाळे आणि विकास रेपाळे यांनी २३ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास सुजाता कोळमकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या सुनेला आणि पतीला शिवीगाळ आणि दमदाटी केली होती. यात त्यांच्या कुटुंबीयांना धक्काबुक्की केल्याचाही आरोप आहे. त्यावेळी विकास रेपाळेंनी या मंडळातील कार्यकर्त्यांना दमबाजीही केली होती. याच संदर्भात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात नम्रता भोसले, रुपाली रेपाळे यांच्याविरुद्ध कोळमकर कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली होती. हाच राग मनात धरुन २४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान कशिश पार्कच्या गेटवर एका टोळक्याने येणाºया जाणाºयांच्या नावांची विचारपूस केली. त्याचदरम्यान सागर आणि धनंजय हे दोघे सोसायटीच्या बाहेर पडले, त्यावेळी त्यांच्यावर सोनू पाल आणि त्याच्या सात ते आठ साथीदारांनी हा खूनी हल्ला केल्याचा आरोप आहे. कशिश पार्कमधील सागर मेटकरीवर हल्ला केल्याच्या बातम्या पेरण्यात येत आहेत. या घटनेशी आपला दुरान्वयेही संबंध नाही. आपण त्यावेळी अंधेरी येथे होतो. दाखल गुन्हयात कुठेही आपल्या नावाचा उल्लेख नाही. उलटपक्षी सागर मेटकरी आणि प्रशांत जाधव हेच गेली अनेक महिने आपल्याविरुद्ध बातम्या पेरत आहेत. शिवाय, सागरने स्वत:च वार करुन घेतल्याची आपली माहिती आहे.-विकास रेपाळे, नगरसेवक, शिवसेना 

टॅग्स :crimeगुन्हेPoliceपोलिस