शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

ज्येष्ठ नागरिकांचे धोरण ही फसवणूक; रमेश पारखे यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 2:27 AM

आर्थिक तरतुदीला बगल दिल्याचा घेतला आक्षेप

- मुरलीधर भवारकल्याण : ज्येष्ठ नागरिकांच्या धोरणासंदर्भात आघाडी सरकारने २०१३ साली तयार केलेल्या टिप्पणीत काही फेरबदल करून ज्येष्ठ नागरिकांचे धोरण जाहीर करणारा कार्यालयीन आदेश काढला आहे. या धोरणामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणतीही आर्थिक तरतूद सुचवण्यात आलेली नाही. सरकारने जाहीर केलेले हे धोरण ज्येष्ठ नागरिकांची शुद्ध फसवणूक करणारे असल्याचा स्पष्ट आरोप ज्येष्ठ नागरिक महासंघाचे कोकण विभागीय अध्यक्ष रमेश पारखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.ज्येष्ठ नागरिक महासंघ अर्थात फेस्कॉम ही संघटना ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करते. ज्येष्ठ नागरिक संघाचा हा एक महासंघ असून त्याच्या देशात चार हजार ५०० शाखा आहे. कोकण विभागात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर हे पाच जिल्हे येतात. या विभागाचे अध्यक्ष पारखे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या धोरणाबाबत महासंघाची भूमिका ‘लोकमत’जवळ स्पष्ट केली. २०१३ साली तत्कालीन आघाडी सरकारने धोरण जाहीर करण्यासंदर्भात टिप्पणी तयार केली होती. त्याच टिप्पणीत काही फेरबदल करून सरकारने आता कार्यालयीन आदेश काढला आहे. २०१५ च्या विधिमंडळ अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यानंतर, २०१६ व २०१७ साली तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र, यासंदर्भात आदेश काढण्यास सरकारकडून चालढकल केली जात होती. ज्येष्ठ नागरिक महासंघाने प्रभावी पाठपुरावा केल्यानंतर सरकारने हे धोरण जाहीर करण्याचा कार्यालयीन आदेश काढला आहे.ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक तरतूद करण्याच्या महत्त्वाच्या मुद्यालाच या धोरणातून बगल देण्यात आली आहे. कर्जबाजारी झाल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकरी अन्नदाता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला ज्येष्ठ नागरिकांचा विरोध नाही. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीवेतन आणि विमाकवचासह विविध सवलती देण्याच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. आमदार, खासदारांना आजीवन निवृत्तीवेतन मिळते. ज्येष्ठ नागरिकांचा मात्र विचार केला जात नाही.ज्येष्ठांच्या कल्याणासाठी सरकारने अनेक आर्थिक समित्या नेमल्या. मात्र, त्यातून काहीही साध्य झाले नाही. ज्येष्ठ नागरिकांच्या आश्रमासाठी बिल्डरांनी जागा द्यावी, त्यासाठी सीएसआर फंडातून निधी खर्च केला पाहिजे. खासगी डॉक्टरांनी त्यांना उपचारात सवलती देणे गरजेचे असून ही जबाबदारी सरकारने घेणे अपेक्षित आहे. सरकारने मात्र ती खासगी मंडळीवर ढकलली आहे. सरकारने स्वत:च्या खिशाला झळ पोहोचू नये, यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक मुद्याला बगल दिली असल्याचा आरोपही पारखे यांनी केला.सरकारने ज्येष्ठ नागरिकांचे वय ६५ वरून ६० केले. महासंघाची ही मागणी एकीकडे मान्य करताना दुसरीकडे ज्येष्ठांचे आर्थिक नुकसान सरकारने केले आहे. प्रवासी भाड्यात मिळणारी ५० टक्के सवलत ज्येष्ठ नागरिकांना नाकारली आहे. सरकारने आईवडिलांचा चांगला सांभाळ करणाºया मुलांना प्राप्तिकरात सवलत दिली आहे. मात्र, आपल्या आईवडिलांचा छळ करणाºया किंवा त्यांना सांभाळण्यास नकार देणाºया मुलांची नावे जाहीर करावी, अशी महासंघाची मागणी होती. सगळीच मुले आईवडिलांशी वाईट वागत नसली, तरी वाईट वागणाºया मुलांचे निकष काय? पालकांच्या पैशांवर मुलांचा डोळा असतो. त्यामुळे आपण आईवडिलांचा चांगला सांभाळ करत आहोत, असे भासवून ते सरकारकडून प्राप्तिकरामध्ये सवलत लाटू शकतात. हे तपासण्यासाठी सरकारकडे सक्षम यंत्रणाच उपलब्ध नसल्याकडे पारखे यांनी लक्ष वेधले.सरकारच्या आर्थिक चढउताराची झळ ज्येष्ठ नागरिकांना बसते. त्यांचा आरोग्याचा खर्च वाढला आहे. राजीव गांधी आरोग्य योजनेचा लाभ ज्येष्ठांना मिळावा, अशी महासंघाची मागणी आहे. या मागणीचा सरकारने विचारच केलेला नाही. अनेक ज्येष्ठ नागरिकांना सेवानिवृत्तीवेतन मिळते. त्यांच्या ठेवीवरील व्याजावर ते जगतात. मात्र, व्याजदर कमी झाल्यास ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. ज्येष्ठांसाठी कल्याण निधीची पोकळ घोषणा सरकारने केली आहे. त्यासाठी निधीचा पत्ताच नाही. ज्येष्ठांना आर्थिक लाभ द्यायचे झाल्यास सरकारच्या तिजोरीवर ७०० कोटींचा बोजा पडेल, अशी चर्चा आहे. 

टॅग्स :thaneठाणे