शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

शाळा-महाविद्यालयांवर आता असणार पोलिसांचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 00:10 IST

अत्याचारानंतर आली जाग; पोलीस कर्मचारी राहणार तैनात

कल्याण : शाळा सुटल्यानंतर शाळेबाहेर रिक्षाची वाट पाहणाऱ्या एका सात वर्षांच्या चिमुकलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांना जाग आली आहे. कल्याण-डोंबिवलीतील शाळा आणि महाविद्यालयांच्या आवारात शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत पोलीस कर्मचारी नेमण्यात येणार आहे.पश्चिमेतील एका शाळेतील सात वर्षांची मुलगी शाळा सुटल्यानंतर बाहेर नेहमीच्या रिक्षाची वाट पाहत होती. मात्र, रिक्षा न आल्याची संधी साधत नवीन जसुजा (२४), विक्रम पुरोहित (१९) आणि अजय दोहारे (३४) यांनी शाळेसमोरच मोडकळीस आलेल्या एका रिकाम्या इमारतीत तिला नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. बाजारपेठ पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. तर, न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.मात्र, पोलिसांनी ही घटना गंभीरपणे घेतली आहे. शाळा-महाविद्यालयांच्या आवारात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. प्रत्येक ठिकाणी नेमलेल्या या पोलीस कर्मचाºयाच्या देखरेखीखाली शाळा असेल, असे नियोजन पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी केले आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालये सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेत तेथील परिसरात भरधाव व कर्कश हॉर्न वाजवत गाड्या हाकणाºया रोडरोमियोंनाही चाप बसेल, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, वेगाने गाड्या हाकणाºया अल्पवयीन चालकांना आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणीही पालकांनी केली आहे.दरम्यान, शहरातील पाडलेल्या इमारती आज भग्नावस्थेत तशाच्यातशा उभ्या आहेत. अशा इमारतींचा वापर गर्दुले, मद्यपी यांच्याकडून सुरू आहे. ‘शक्ती मिल’सारखी एखादी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? महापालिका प्रशासन की पोलीस? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.शाळांमध्ये सुरक्षारक्षक, सीसीटीव्हींचा अभावशहरातील अनेक शाळांमध्ये सुरक्षारक्षक तसेच सीसीटीव्हीदेखील नाहीत. या परिस्थितीला शाळा व्यवस्थापनाबरोबर बेजबाबदार पालकही कारणीभूत आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत सोडले म्हणजे पुढे सगळी शाळेची जबाबदारी असल्याचा समज पालकांमध्ये बळावताना दिसतोय.शाळेबरोबर पालकांचीही तितकीच जबाबदारी आहे. मात्र, त्यांना त्याचा विसर पडत चालला आहे. पण एक गोष्ट मात्र तितकीच खरी आहे की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी एकत्रितपणे काम होणे गरजेचे आहे.शाळेतील विद्यार्थ्यांना जोपर्यंत पालकांच्या ताब्यात दिले जात नाही, तोपर्यंत त्या विद्यार्थ्यांची जबाबदारी त्या शाळेची असेल, अशा सूचना शाळा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या सूचनांकडे लक्ष न देणाºया शाळा प्रशासनावर कडक कारवाई करण्यात येईल.- विवेक पानसरे, पोलीस उपायुक्त

टॅग्स :PoliceपोलिसSchoolशाळा