शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

रिक्षात २ पेक्षा जास्त प्रवासी घेतल्यास कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 21:51 IST

शासनाने कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने रिक्षात २ प्रवासीच बसवण्याचे आदेश दिले आहेत . त्यामुळे भाईंदर मध्ये शेअर भाडे घेणाऱ्या रिक्षां मध्ये ३ ऐवजी २ प्रवासी घ्याचे म्हणून शेअर भाडे मात्र प्रति प्रवासी ५० टक्के पेक्षा जास्त घेतले जात आहे .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - भाईंदर मध्ये २ ऐवजी ३ ते ४ प्रवासी घेऊन भाडे मात्र वाढीव आकारणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करणार असल्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे . या शिवाय रिक्षा स्थानक जाहीर करणे , रिक्षांवर माहितीचा स्टिकर लावणे आदी मुद्द्यांवर सुद्धा चर्चा झाली . 

 

शासनाने कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने रिक्षात २ प्रवासीच बसवण्याचे आदेश दिले आहेत . त्यामुळे भाईंदर मध्ये शेअर भाडे घेणाऱ्या रिक्षां मध्ये ३ ऐवजी २ प्रवासी घ्याचे म्हणून शेअर भाडे मात्र प्रति प्रवासी ५० टक्के पेक्षा जास्त घेतले जात आहे . किमान शेअर भाडे १० रुपये होते . पण २ प्रवासी घ्यायचे म्हणून किमान शेअर भाडे १५ रुपये केलेलं आहे . त्या प्रमाणेच अंतर नुसार शेअर भाडे वाढवले आहे . उत्तन साठी तर  ३० चे ५० रुपये प्रति प्रवासी केले आहेत . 

 

एकीकडे २ प्रवासी घ्यायचे म्हणून भाडे वाढवणाऱ्या अनेक रिक्षा चालकांनी  मात्र चक्क ३ ते ४ प्रवासी भारत भाडे मात्र जास्तीचेच वसूल करून प्रवाश्यांची लूट चालवल्याच्या तक्रारी होऊ लागल्या . रात्रीच्या वेळी तर सर्रास ३ - ४ प्रवासी भरले जातात . ह्या वरून प्रवाश्यां सोबत रिक्षा चालकांचे वाद होऊ लागले . मीटर प्रमाणे भाडे नेणे बंधनकारक असताना मीटर न टाकता मनमानी भाडे सांगितले जाते . 

 

 ह्या बाबत शुक्रवारी सायंकाळी भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानका बाहेर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे , उपनिरीक्षक एम . जी . पाटील सह रिक्षा संघटनांचे पदाधिकारी , रिक्षा चालक , नगरसेवक सुरेश खंडेलवाल , ध्रुवकिशोर पाटील आदींची चर्चा झाली . 

 

ह्या वेळी काही रिक्षा चालकांनी ध्रुवकिशोर पाटील यांच्यावर राग व्यक्त करत तुम्ही जुने असून सर्वाना ओळखता तरी देखील आमच्या कडे अडचण न सांगता थेट सरसकट सर्व रिक्षा चालकांवर लूट करत असल्याचे आरोप करता हे योग्य नाही असे खडे बोल सुनावले . 

 

काही रिक्षा चालक जास्त प्रवासी घेतात हे मान्य करत त्यांच्यावर कारवाई करा आम्ही मध्ये येणार नाही असे रिक्षा संघटनांनी स्पष्ट केले . रेल्वे स्थानक जवळील सुशोभीकरणाच्या कामा मुळे होत असलेली वाहतूक कोंडी , अधिकृत रिक्षा स्थानक करून देणे , बोगस व परवाने नसलेल्या रिक्षांवर कारवाई करणे आदी मुद्दे सुद्धा चर्चेत आले . 

 

ह्यावेळी भामे यांनी स्पष्ट केले कि , २ पेक्षा जास्त प्रवासी बसवल्यास रिक्षांवर कारवाई केली जाईल . प्रत्येक रिक्षा वर त्या रिक्षा आणि चालकाच्या माहितीचा तसेच प्रवाश्याना तक्रारीसाठी वाहतूक पोलिसांचा क्रमांक असलेला स्टिकर लावण्यात येणार आहे . रेल्वे स्थानक बाहेरील सुशोभीकरणाच्या कामा मुळे रस्ता अरुंद झाला असून पालिकेला कळवले आहे . रिक्षा स्थानक बाबत पालिकेशी बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असे भामे यांनी सांगितले . 

 

दरम्यान शेअर मार्गा बरोबरच कायद्याने बंधनकारक असलेल्या मीटर पद्धतीने भाडे आकारणी सुरु करण्या बाबत आरटीओ व पोलिसां सोबत बैठक होणार आहे . शहरात मीटर पद्धती सुरु झाल्यास प्रवाश्यांना आणि रिक्षा चालकांना सुद्धा लाभ होईल. त्यामुळे मीटर प्रमाणे भाडे घेण्याची मागणी केल्याचे  नगरसेवक सुरेश खंडेलवाल म्हणाले .