शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

रिक्षात २ पेक्षा जास्त प्रवासी घेतल्यास कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 21:51 IST

शासनाने कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने रिक्षात २ प्रवासीच बसवण्याचे आदेश दिले आहेत . त्यामुळे भाईंदर मध्ये शेअर भाडे घेणाऱ्या रिक्षां मध्ये ३ ऐवजी २ प्रवासी घ्याचे म्हणून शेअर भाडे मात्र प्रति प्रवासी ५० टक्के पेक्षा जास्त घेतले जात आहे .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - भाईंदर मध्ये २ ऐवजी ३ ते ४ प्रवासी घेऊन भाडे मात्र वाढीव आकारणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करणार असल्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे . या शिवाय रिक्षा स्थानक जाहीर करणे , रिक्षांवर माहितीचा स्टिकर लावणे आदी मुद्द्यांवर सुद्धा चर्चा झाली . 

 

शासनाने कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने रिक्षात २ प्रवासीच बसवण्याचे आदेश दिले आहेत . त्यामुळे भाईंदर मध्ये शेअर भाडे घेणाऱ्या रिक्षां मध्ये ३ ऐवजी २ प्रवासी घ्याचे म्हणून शेअर भाडे मात्र प्रति प्रवासी ५० टक्के पेक्षा जास्त घेतले जात आहे . किमान शेअर भाडे १० रुपये होते . पण २ प्रवासी घ्यायचे म्हणून किमान शेअर भाडे १५ रुपये केलेलं आहे . त्या प्रमाणेच अंतर नुसार शेअर भाडे वाढवले आहे . उत्तन साठी तर  ३० चे ५० रुपये प्रति प्रवासी केले आहेत . 

 

एकीकडे २ प्रवासी घ्यायचे म्हणून भाडे वाढवणाऱ्या अनेक रिक्षा चालकांनी  मात्र चक्क ३ ते ४ प्रवासी भारत भाडे मात्र जास्तीचेच वसूल करून प्रवाश्यांची लूट चालवल्याच्या तक्रारी होऊ लागल्या . रात्रीच्या वेळी तर सर्रास ३ - ४ प्रवासी भरले जातात . ह्या वरून प्रवाश्यां सोबत रिक्षा चालकांचे वाद होऊ लागले . मीटर प्रमाणे भाडे नेणे बंधनकारक असताना मीटर न टाकता मनमानी भाडे सांगितले जाते . 

 

 ह्या बाबत शुक्रवारी सायंकाळी भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानका बाहेर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे , उपनिरीक्षक एम . जी . पाटील सह रिक्षा संघटनांचे पदाधिकारी , रिक्षा चालक , नगरसेवक सुरेश खंडेलवाल , ध्रुवकिशोर पाटील आदींची चर्चा झाली . 

 

ह्या वेळी काही रिक्षा चालकांनी ध्रुवकिशोर पाटील यांच्यावर राग व्यक्त करत तुम्ही जुने असून सर्वाना ओळखता तरी देखील आमच्या कडे अडचण न सांगता थेट सरसकट सर्व रिक्षा चालकांवर लूट करत असल्याचे आरोप करता हे योग्य नाही असे खडे बोल सुनावले . 

 

काही रिक्षा चालक जास्त प्रवासी घेतात हे मान्य करत त्यांच्यावर कारवाई करा आम्ही मध्ये येणार नाही असे रिक्षा संघटनांनी स्पष्ट केले . रेल्वे स्थानक जवळील सुशोभीकरणाच्या कामा मुळे होत असलेली वाहतूक कोंडी , अधिकृत रिक्षा स्थानक करून देणे , बोगस व परवाने नसलेल्या रिक्षांवर कारवाई करणे आदी मुद्दे सुद्धा चर्चेत आले . 

 

ह्यावेळी भामे यांनी स्पष्ट केले कि , २ पेक्षा जास्त प्रवासी बसवल्यास रिक्षांवर कारवाई केली जाईल . प्रत्येक रिक्षा वर त्या रिक्षा आणि चालकाच्या माहितीचा तसेच प्रवाश्याना तक्रारीसाठी वाहतूक पोलिसांचा क्रमांक असलेला स्टिकर लावण्यात येणार आहे . रेल्वे स्थानक बाहेरील सुशोभीकरणाच्या कामा मुळे रस्ता अरुंद झाला असून पालिकेला कळवले आहे . रिक्षा स्थानक बाबत पालिकेशी बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असे भामे यांनी सांगितले . 

 

दरम्यान शेअर मार्गा बरोबरच कायद्याने बंधनकारक असलेल्या मीटर पद्धतीने भाडे आकारणी सुरु करण्या बाबत आरटीओ व पोलिसां सोबत बैठक होणार आहे . शहरात मीटर पद्धती सुरु झाल्यास प्रवाश्यांना आणि रिक्षा चालकांना सुद्धा लाभ होईल. त्यामुळे मीटर प्रमाणे भाडे घेण्याची मागणी केल्याचे  नगरसेवक सुरेश खंडेलवाल म्हणाले .