शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षात २ पेक्षा जास्त प्रवासी घेतल्यास कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 21:51 IST

शासनाने कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने रिक्षात २ प्रवासीच बसवण्याचे आदेश दिले आहेत . त्यामुळे भाईंदर मध्ये शेअर भाडे घेणाऱ्या रिक्षां मध्ये ३ ऐवजी २ प्रवासी घ्याचे म्हणून शेअर भाडे मात्र प्रति प्रवासी ५० टक्के पेक्षा जास्त घेतले जात आहे .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - भाईंदर मध्ये २ ऐवजी ३ ते ४ प्रवासी घेऊन भाडे मात्र वाढीव आकारणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करणार असल्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे . या शिवाय रिक्षा स्थानक जाहीर करणे , रिक्षांवर माहितीचा स्टिकर लावणे आदी मुद्द्यांवर सुद्धा चर्चा झाली . 

 

शासनाने कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने रिक्षात २ प्रवासीच बसवण्याचे आदेश दिले आहेत . त्यामुळे भाईंदर मध्ये शेअर भाडे घेणाऱ्या रिक्षां मध्ये ३ ऐवजी २ प्रवासी घ्याचे म्हणून शेअर भाडे मात्र प्रति प्रवासी ५० टक्के पेक्षा जास्त घेतले जात आहे . किमान शेअर भाडे १० रुपये होते . पण २ प्रवासी घ्यायचे म्हणून किमान शेअर भाडे १५ रुपये केलेलं आहे . त्या प्रमाणेच अंतर नुसार शेअर भाडे वाढवले आहे . उत्तन साठी तर  ३० चे ५० रुपये प्रति प्रवासी केले आहेत . 

 

एकीकडे २ प्रवासी घ्यायचे म्हणून भाडे वाढवणाऱ्या अनेक रिक्षा चालकांनी  मात्र चक्क ३ ते ४ प्रवासी भारत भाडे मात्र जास्तीचेच वसूल करून प्रवाश्यांची लूट चालवल्याच्या तक्रारी होऊ लागल्या . रात्रीच्या वेळी तर सर्रास ३ - ४ प्रवासी भरले जातात . ह्या वरून प्रवाश्यां सोबत रिक्षा चालकांचे वाद होऊ लागले . मीटर प्रमाणे भाडे नेणे बंधनकारक असताना मीटर न टाकता मनमानी भाडे सांगितले जाते . 

 

 ह्या बाबत शुक्रवारी सायंकाळी भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानका बाहेर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे , उपनिरीक्षक एम . जी . पाटील सह रिक्षा संघटनांचे पदाधिकारी , रिक्षा चालक , नगरसेवक सुरेश खंडेलवाल , ध्रुवकिशोर पाटील आदींची चर्चा झाली . 

 

ह्या वेळी काही रिक्षा चालकांनी ध्रुवकिशोर पाटील यांच्यावर राग व्यक्त करत तुम्ही जुने असून सर्वाना ओळखता तरी देखील आमच्या कडे अडचण न सांगता थेट सरसकट सर्व रिक्षा चालकांवर लूट करत असल्याचे आरोप करता हे योग्य नाही असे खडे बोल सुनावले . 

 

काही रिक्षा चालक जास्त प्रवासी घेतात हे मान्य करत त्यांच्यावर कारवाई करा आम्ही मध्ये येणार नाही असे रिक्षा संघटनांनी स्पष्ट केले . रेल्वे स्थानक जवळील सुशोभीकरणाच्या कामा मुळे होत असलेली वाहतूक कोंडी , अधिकृत रिक्षा स्थानक करून देणे , बोगस व परवाने नसलेल्या रिक्षांवर कारवाई करणे आदी मुद्दे सुद्धा चर्चेत आले . 

 

ह्यावेळी भामे यांनी स्पष्ट केले कि , २ पेक्षा जास्त प्रवासी बसवल्यास रिक्षांवर कारवाई केली जाईल . प्रत्येक रिक्षा वर त्या रिक्षा आणि चालकाच्या माहितीचा तसेच प्रवाश्याना तक्रारीसाठी वाहतूक पोलिसांचा क्रमांक असलेला स्टिकर लावण्यात येणार आहे . रेल्वे स्थानक बाहेरील सुशोभीकरणाच्या कामा मुळे रस्ता अरुंद झाला असून पालिकेला कळवले आहे . रिक्षा स्थानक बाबत पालिकेशी बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असे भामे यांनी सांगितले . 

 

दरम्यान शेअर मार्गा बरोबरच कायद्याने बंधनकारक असलेल्या मीटर पद्धतीने भाडे आकारणी सुरु करण्या बाबत आरटीओ व पोलिसां सोबत बैठक होणार आहे . शहरात मीटर पद्धती सुरु झाल्यास प्रवाश्यांना आणि रिक्षा चालकांना सुद्धा लाभ होईल. त्यामुळे मीटर प्रमाणे भाडे घेण्याची मागणी केल्याचे  नगरसेवक सुरेश खंडेलवाल म्हणाले .