शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

पोलिसांनी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खूनातील सूत्रधारापर्यंत जाणे अपेक्षित आहे- मुक्ता दाभोळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 22:32 IST

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येतील केवळ मारेकऱ्यांना न पकडता मुख्य सूत्रधार तथा यातील मास्टर मार्इंडपर्यंत पोलिसांनी पोहचणे अपेक्षित असल्याचे मत अंधश्रद्ध निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोळकर यांनी ठाण्यात व्यक्त केले.

ठळक मुद्दे न्यायालयाच्या नियंत्रणामुळे तपासाला गतीतीन हत्याही रोखता आल्या असत्या...तरच यापुढच्या हत्या रोखता येतील

ठाणे: केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग तसेच पोलीस यंत्रणांनी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येतील केवळ मारेकºयांना न पकडता मुख्य सूत्रधार तथा यातील मास्टर मार्इंडपर्यंत पोहचणे अपेक्षित आहे. तेंव्हाच हा तपास पूर्ण होईल. आधीच हा तपास वेगाने झाला असता तर डॉ. दाभोळकर यांच्यानंतर झालेल्या तीन हत्याही सरकारला रोखता आल्या असत्या, अशी खंत अंधश्र्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोळकर यांनी ठाण्यात व्यक्त केली.ठाण्यातील मो. ह. विद्यालयात डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मरणाच्या औचित्याने कोकण मराठी साहित्य परिषद, युवाशक्ती, मुंबई- ठाणे आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून त्या उपस्थित होत्या. ‘विवेकवादी चळवळीत हवी तरुणांची साथ’ या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांशी मोकळेपणाने संवाद साधला. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी वरील मत व्यक्त केले. डॉ. दाभोलकर यांच्यासह एम.एम. कलबुर्गी, गोविंद पानसरे, गौरी लंकेश या चारही हत्यांमध्ये केवळ साधर्म्य नसून एकमेकांची लिंक आहे. १८ आॅगस्ट रोजी तब्बल अडीच वर्षांच्या गॅपनंतर डॉ. दाभोळकर यांच्या खूनातील पहिली अटक झाली. केवळ यातील मारेकºयांना अटक नको तर मास्टरमार्इंडपर्यंत पोलीस यंत्रणांनी जाणे अपेक्षित आहे. या संपूर्ण तपासावर उच्च न्यायालयाचे नियंत्रण आणि लक्ष होते, आहे. म्हणूनच हे आरोपी पकडले गेले. इतक्या गंभीर खूनातील मारेकरी इतके दिवस बाहेर राहणे म्हणजे काहीतरी त्याला मोठे पाठबळ आहे, त्याशिवाय तो मोकाट राहूच शकत नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. अगदी अलिकडेच डॉक्टरांच्या पाचव्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमात तुषार गांधी यांनी पुण्यात अमेरिकेचा एक प्रकार सांगितला होता. अमेरिकेतही अशाच प्रकारची हत्या झाली होती. तेथील सरकारने अशी हत्या करणाºया व्यक्ती आणि त्यांच्या संघटनेवरही गुन्हे दाखल केले. त्यानंतर दिवाळखोरीत येऊन ती संघटनाही संपली. भारत सरकारनेही जी माणसे संघटीतरित्या असा हिंसक विचार वाढवायला मदत देतायत त्यांच्याबाबतीत त्यांनी भूमीका घेतली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जोपर्यंत मुख्य सूत्रधार पकडले जात नाहीत, तोपर्यंत हा तपास पूर्ण होणार नाही, असेही त्या म्हणाल्या. यापुढे तरी तपासात दिरंगाई होणार नाही, तो वेगाने होईल, हे सरकारने पाहिजे पाहिजे, तरच यापुढेही अशा प्रकारच्या हत्या रोखण्यात येतील, असेही त्या म्हणाल्या. संघटीत गुन्हेगारीतत्पूर्वी, विवेकवादाच्या विषयावर त्यांनी व्यापक विचार मांडून तरुणांनी अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या चळवळीकडे लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. देव, धर्माला अंनिसचा विरोध नसून त्या नावाखाली चालणाºया शोषणाला विरोध असल्याचे त्या म्हणाल्या.२५ वर्षापूर्वी कोल्हापूरच्या रंकाळा तलाव इथे गणेश मूर्ती दान करण्यासाठी आवाहन केले होते. त्यावेळी पहिल्या वर्षी १०० मूर्ती कृत्रित तलावात विसर्जित झाल्या. आता हे काम अंनिसला करावे लागत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. नाशिकमध्ये दोन लाख ६० हजार मूर्त्या लोकांनी दान केल्या. हे याच चळवळीचे मोठे यश आहे.विवेकवादी माणसाचे मत निर्भय असते. पूजेच्या नावाखाली ठाणे, डोंबिवलीतही काही महिलांवर भोंदू बाबांनी कसे अत्याचार केले. याचाही त्यांनी समाचार घेतला. अंधश्रद्धेच्या नावाने होणारे शोषण थांबविण्यासाठी पोलीस किंवा अंनिसच्या कार्यकर्त्याना कळवा, असे आवाहनही त्यांनी केले. दाभोळकर यांच्या हत्येनंतर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा झाला, यात ४०० गुन्हे नोंदविले गेल्याचेही त्या म्हणाल्या. सामाजिक बहिष्कार कायदाही अंमलात आला. यात २५ केसेस दाखल झाल्या. दाभोळकरांच्या हत्येपूर्वी अंनिसच्या २१५ शाखा होत्या. त्या आता३२५ झाल्या आहेत. ही चळवळ उभी करण्यामध्ये त्यांच्या सहकाºयांचीही मेहनत कामी आली. रुढी परंपरेचेही सर्वच वाईट आहे, असे नाही. परंपरेमध्ये जे चांगले आहे, जे बुद्धीला पटते. काळाच्या कसोटीवर टिकते, तेच करावे, दाभोळकर म्हणाल्या.यावेळी वक्तृत्व स्पर्धेतील अनिकेत पाळसे, किशोर शेट्टी, नम्रता गोडांबे, लक्ष्मण कचरे, मैत्रेयी भारती, सौंदर्या कांबळे, दर्शन गायकवाड, अमन सरगर आणि अमय वायंगणकर या यशस्वी विद्यार्थ्यांचा मुक्ता दाभोळकर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :thaneठाणेAdhyatmikआध्यात्मिकSchoolशाळा