शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना पोलीस कोठडी, फेरीवाल्यांच्या सामानाची नासधूस प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 21:44 IST

 ठाणे - रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या सामानाची नासधूस करीत त्यांना पिटाळून लावणाºया महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह पाच जणांना ठाणे न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. त्यामुळे त्यांचा पोलीस कोठडीतील मुक्काम एक दिवस आणखी वाढला आहे.नौपाडा पोलिसांनी जाधव यांना सोमवारी त्यांच्या घरातून ताब्यात घेतल्यानंतर त्यांना ...

 ठाणे - रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या सामानाची नासधूस करीत त्यांना पिटाळून लावणाºया महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह पाच जणांना ठाणे न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. त्यामुळे त्यांचा पोलीस कोठडीतील मुक्काम एक दिवस आणखी वाढला आहे.नौपाडा पोलिसांनी जाधव यांना सोमवारी त्यांच्या घरातून ताब्यात घेतल्यानंतर त्यांना अत्यंत नाट्यमयरीत्या ठाणेनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांना नौपाडा किंवा ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्याची अपेक्षित असताना त्यांना अचानकपणे राबोडी पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले. सोमवारी दुपारी अवघ्या काही तासांच्या अंतराने झालेल्या घडामोडींबाबत काही पोलीस अधिकारीही अनभिज्ञ होते. नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या कार्यकर्त्यांना ठाणेनगर आणि नौपाडा दोन्ही पोलिसांनी त्यांच्या अटकेची तयारी केली. अखेर पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी यांच्या आदेशाने आधी त्यांना ठाणेनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. वरीष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी त्यांना अटक केल्यानंतर मंगळवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले.सॅटीस ब्रिजवरील विक्रेत्यांचे बाकडे तोडून त्याचे नुकसान करणे तसेच रिक्षाचालकांना हुसकावून लावल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात २१ आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यांना याप्रकरणी २५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले. दरम्यान, ही कोठडी संपताच नौपाडा पोलीस बुधवारी त्यांना ताब्यात घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेMNSमनसे