शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

उशिरापर्यंत सुरू राहणा-या बारचालकाला पोलिसांची मारहाण, हॉटेल व्यवस्थापनाने केली पोलीस निरीक्षकाची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 23:21 IST

उशिरापर्यंत सुरु राहणा-या बार चालकाच्या श्रीमुखात देऊन त्याला शिवीगाळ करणा-या श्रीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक सायकर यांच्याविरुद्ध हॉटेल दुर्गा आशिर्वाद (श्रेया) चे शामा शेट्टी यांनी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे केली आहे.

ठाणे : उशिरापर्यंत सुरु राहणा-या बार चालकाच्या श्रीमुखात देऊन त्याला शिवीगाळ करणा-या श्रीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक सायकर यांच्याविरुद्ध हॉटेल दुर्गा आशिर्वाद (श्रेया) चे शामा शेट्टी यांनी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे केली आहे. तुम्हाला ठार करून कोठे गायब करू ते कळणार नाही, अशी धमकी सायकर यांनी दिल्याचेही त्यांनी या तक्रारीत म्हटले आहे.पोलीस आयुक्तांसह श्रीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांना दिलेल्या तक्रारीत शेट्टी यांनी म्हटले आहे की, ६ नोव्हेंबर रोजी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास हॉटेलचे शटर अर्धे खाली ओढलेले असतांना निरीक्षक सायकर हे त्यांच्या काही कर्मचाºयांसह आत आले. कॅश काऊंटरवर बसलेला माझा भाऊ हरिष शेट्टी याला त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तुम्हाला हॉटेल १२.३० वाजेपर्यंत चालविण्याची परवानगी दिली आहे. तरीही हॉटेल अजून चालू का ठेवले आहे? असे सांगून त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली. वास्तविक राज्य शासनाच्याच एका परिपत्रकानुसार मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे आयुक्तालयाच्या परिक्षेत्रातील हॉटेल आस्थापनांमध्ये रात्री १.३० वाजेपर्यंत खाद्य पदार्थ तसेच मद्य पुरविण्याची परवानगी असल्याचा दावाही त्यांनी या परिपत्रकाचा हवाला देऊन केला आहे. १.३० वा. पर्यंत हॉटेल बंद करण्याची अनुमती असल्याचे सायकर यांना सांगूनही त्यांनी १२.३० वाजताच बंद करण्यात यावे, असा दम दिला. याबाबत त्यांना समजावजे तरी त्यांनी बाहेर येऊन आपल्याला ठार मारण्याचीही धमकी दिल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे.दरम्यान, पोलीस निरीक्षक सायकर यांनी हॉटेलचे पार्टनर हरीष यांना केलेल्या मारहाणीची सीसीटीव्हीतील फूटेज सोशल मिडीयातूनही व्हायरल झाल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.अशा घटनांमुळे हॉटेल व्यवसाय चालविणे जिकरीचे होणार असून आमच्यावर उपासमारीची वेळ येईल, असेही त्यांनी यात म्हटले आहे. याच पत्रासोबत हरीष यांना मारहाण होत असतांनाचे सीसीटीव्ही फूटेजही त्यांनी दिले आहे.

‘‘ सोमवारी पहाटे सायकर यांचे पथक गस्त घालीत असतांना त्यांना बारजवळ मोठी गर्दी दिसली. तिथे गोंधळ घालून काही मुले पळून गेली. याचीच सायकर यांनी विचारपूस केली. त्यांच्या चौकशीनंतर तिथे हाणामारीही झाली. अर्थात, सायकर यांनी जी मारहाण केली त्याबाबत तक्रार अर्ज आला आहे. त्याचीही चौकशी सुरू आहे.’’- सुलभा पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीनगर पोलीस ठाणे. 

टॅग्स :Crimeगुन्हा