शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ताणतणावातून पोलीस संपवताहेत जीवनयात्रा! पाच वर्षांत नऊ जणांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 06:32 IST

कौटुंबिक कलह, आजारपण असो वा प्रेमप्रकरण अशा वेगवेगळ्या कारणांतून नागरिकांच्या रक्षणासाठी उभा असणारा पोलीसही आत्महत्येचा प्रयत्न करीत आहे. मागील पाच वर्षांत ठाणे शहर, मुंबई तसेच रेल्वे पोलीस दलातील तीन महिला कर्मचाºयांसह नऊ जणांनी ठाण्यात आत्महत्या केली आहे.

- पंकज रोडेकर ठाणे : कौटुंबिक कलह, आजारपण असो वा प्रेमप्रकरण अशा वेगवेगळ्या कारणांतून नागरिकांच्या रक्षणासाठी उभा असणारा पोलीसही आत्महत्येचा प्रयत्न करीत आहे. मागील पाच वर्षांत ठाणे शहर, मुंबई तसेच रेल्वे पोलीस दलातील तीन महिला कर्मचाºयांसह नऊ जणांनी ठाण्यात आत्महत्या केली आहे.गतवर्षी बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची धामधूम संपत नाही, तोच ठाणे शहर पोलीस दलातील एका पोलीस कॉन्स्टेबलने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्या घटनेला एक वर्ष होत नाही, तोच बुधवार ६ सप्टेंबर रोजी महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार यांनी आत्महत्या केली. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील परिमंडळ-१ आणि ५ या दोन परिमंडळांत ठाणे, मुंबई आणि ठाणे लोहमार्ग पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाºयांसह ८ पोलिसांनी टोकाची भूमिका घेऊन आत्महत्या केली आहे.कुटुंबांसह हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेले मुंबई पोलीस दलातील दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त संजय बॅनर्जी यांनी त्यांच्या खाजगी रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. रस्ते अपघातात पाय गमावणारे ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस हवालदार भरत थोरात (५१) यांनी वर्तकनगर येथे स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली. शहर मुख्यालयातील पोलीस टिपू सुलतान बालेखान मुल्लाने स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली. नौपाड्याचे पोलीस अच्युत शिंदे यांनी आजाराला कंटाळून गावी आत्महत्या केली. तत्पूर्वी, कळव्यातही अर्चना हिवरे या महिला कर्मचाºयाने रॉकेल ओतून पेटवून घेतले. ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यातील वैशाली पिंगट यांनीही पोलीस ठाण्यातच ९ एमएम पिस्टलने स्वत:वर गोळी झाडून घेतली होती.शहर पोलीस आयुक्तालयाच्या नव्या मुख्यालयात रात्रपाळीला असलेल्या कॉन्स्टेबल दिलीप सिंगनवार (२८) याने एसएलआरमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. गतवर्षी गणेशोत्सवात शहर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल सागर माळूजकर यानेही गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मृत्यूशी झुंज देताना, त्याची प्राणज्योत मालवली होती.वेळीच मार्ग काढणे गरजेचेप्रत्येकाला ताणतणाव असतो. त्याचा अतिरेक झाल्याने एखादा टोकाची भूमिका घेण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी लहानातले लहान तणावाचे विषय मनात न ठेवता दुसºयांशी मनमोकळेपणाने चर्चा करून ते दूर करावेत आणि या तणावातून वेळीच मार्ग काढणे गरजेचे असल्याचे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले.

टॅग्स :Policeपोलिस