शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

ताणतणावातून पोलीस संपवताहेत जीवनयात्रा! पाच वर्षांत नऊ जणांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 06:32 IST

कौटुंबिक कलह, आजारपण असो वा प्रेमप्रकरण अशा वेगवेगळ्या कारणांतून नागरिकांच्या रक्षणासाठी उभा असणारा पोलीसही आत्महत्येचा प्रयत्न करीत आहे. मागील पाच वर्षांत ठाणे शहर, मुंबई तसेच रेल्वे पोलीस दलातील तीन महिला कर्मचाºयांसह नऊ जणांनी ठाण्यात आत्महत्या केली आहे.

- पंकज रोडेकर ठाणे : कौटुंबिक कलह, आजारपण असो वा प्रेमप्रकरण अशा वेगवेगळ्या कारणांतून नागरिकांच्या रक्षणासाठी उभा असणारा पोलीसही आत्महत्येचा प्रयत्न करीत आहे. मागील पाच वर्षांत ठाणे शहर, मुंबई तसेच रेल्वे पोलीस दलातील तीन महिला कर्मचाºयांसह नऊ जणांनी ठाण्यात आत्महत्या केली आहे.गतवर्षी बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची धामधूम संपत नाही, तोच ठाणे शहर पोलीस दलातील एका पोलीस कॉन्स्टेबलने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्या घटनेला एक वर्ष होत नाही, तोच बुधवार ६ सप्टेंबर रोजी महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार यांनी आत्महत्या केली. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील परिमंडळ-१ आणि ५ या दोन परिमंडळांत ठाणे, मुंबई आणि ठाणे लोहमार्ग पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाºयांसह ८ पोलिसांनी टोकाची भूमिका घेऊन आत्महत्या केली आहे.कुटुंबांसह हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेले मुंबई पोलीस दलातील दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त संजय बॅनर्जी यांनी त्यांच्या खाजगी रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. रस्ते अपघातात पाय गमावणारे ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस हवालदार भरत थोरात (५१) यांनी वर्तकनगर येथे स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली. शहर मुख्यालयातील पोलीस टिपू सुलतान बालेखान मुल्लाने स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली. नौपाड्याचे पोलीस अच्युत शिंदे यांनी आजाराला कंटाळून गावी आत्महत्या केली. तत्पूर्वी, कळव्यातही अर्चना हिवरे या महिला कर्मचाºयाने रॉकेल ओतून पेटवून घेतले. ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यातील वैशाली पिंगट यांनीही पोलीस ठाण्यातच ९ एमएम पिस्टलने स्वत:वर गोळी झाडून घेतली होती.शहर पोलीस आयुक्तालयाच्या नव्या मुख्यालयात रात्रपाळीला असलेल्या कॉन्स्टेबल दिलीप सिंगनवार (२८) याने एसएलआरमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. गतवर्षी गणेशोत्सवात शहर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल सागर माळूजकर यानेही गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मृत्यूशी झुंज देताना, त्याची प्राणज्योत मालवली होती.वेळीच मार्ग काढणे गरजेचेप्रत्येकाला ताणतणाव असतो. त्याचा अतिरेक झाल्याने एखादा टोकाची भूमिका घेण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी लहानातले लहान तणावाचे विषय मनात न ठेवता दुसºयांशी मनमोकळेपणाने चर्चा करून ते दूर करावेत आणि या तणावातून वेळीच मार्ग काढणे गरजेचे असल्याचे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले.

टॅग्स :Policeपोलिस