शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

ताणतणावातून पोलीस संपवताहेत जीवनयात्रा! पाच वर्षांत नऊ जणांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 06:32 IST

कौटुंबिक कलह, आजारपण असो वा प्रेमप्रकरण अशा वेगवेगळ्या कारणांतून नागरिकांच्या रक्षणासाठी उभा असणारा पोलीसही आत्महत्येचा प्रयत्न करीत आहे. मागील पाच वर्षांत ठाणे शहर, मुंबई तसेच रेल्वे पोलीस दलातील तीन महिला कर्मचाºयांसह नऊ जणांनी ठाण्यात आत्महत्या केली आहे.

- पंकज रोडेकर ठाणे : कौटुंबिक कलह, आजारपण असो वा प्रेमप्रकरण अशा वेगवेगळ्या कारणांतून नागरिकांच्या रक्षणासाठी उभा असणारा पोलीसही आत्महत्येचा प्रयत्न करीत आहे. मागील पाच वर्षांत ठाणे शहर, मुंबई तसेच रेल्वे पोलीस दलातील तीन महिला कर्मचाºयांसह नऊ जणांनी ठाण्यात आत्महत्या केली आहे.गतवर्षी बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची धामधूम संपत नाही, तोच ठाणे शहर पोलीस दलातील एका पोलीस कॉन्स्टेबलने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्या घटनेला एक वर्ष होत नाही, तोच बुधवार ६ सप्टेंबर रोजी महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार यांनी आत्महत्या केली. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील परिमंडळ-१ आणि ५ या दोन परिमंडळांत ठाणे, मुंबई आणि ठाणे लोहमार्ग पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाºयांसह ८ पोलिसांनी टोकाची भूमिका घेऊन आत्महत्या केली आहे.कुटुंबांसह हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेले मुंबई पोलीस दलातील दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त संजय बॅनर्जी यांनी त्यांच्या खाजगी रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. रस्ते अपघातात पाय गमावणारे ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस हवालदार भरत थोरात (५१) यांनी वर्तकनगर येथे स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली. शहर मुख्यालयातील पोलीस टिपू सुलतान बालेखान मुल्लाने स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली. नौपाड्याचे पोलीस अच्युत शिंदे यांनी आजाराला कंटाळून गावी आत्महत्या केली. तत्पूर्वी, कळव्यातही अर्चना हिवरे या महिला कर्मचाºयाने रॉकेल ओतून पेटवून घेतले. ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यातील वैशाली पिंगट यांनीही पोलीस ठाण्यातच ९ एमएम पिस्टलने स्वत:वर गोळी झाडून घेतली होती.शहर पोलीस आयुक्तालयाच्या नव्या मुख्यालयात रात्रपाळीला असलेल्या कॉन्स्टेबल दिलीप सिंगनवार (२८) याने एसएलआरमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. गतवर्षी गणेशोत्सवात शहर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल सागर माळूजकर यानेही गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मृत्यूशी झुंज देताना, त्याची प्राणज्योत मालवली होती.वेळीच मार्ग काढणे गरजेचेप्रत्येकाला ताणतणाव असतो. त्याचा अतिरेक झाल्याने एखादा टोकाची भूमिका घेण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी लहानातले लहान तणावाचे विषय मनात न ठेवता दुसºयांशी मनमोकळेपणाने चर्चा करून ते दूर करावेत आणि या तणावातून वेळीच मार्ग काढणे गरजेचे असल्याचे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले.

टॅग्स :Policeपोलिस