शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

डोंबिवलीमध्ये प्लास्टिकबंदी सर्रास धाब्यावर; महापालिकेचा कारवाईचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 01:40 IST

फेरीवाले, नागरिकांकडून खुलेआम पिशव्यांचा वापर

डोंबिवली : राज्यात प्लास्टिकबंदी असतानाही शहरातील व्यापारी, फेरीवाले यांच्याकडे सर्रास प्लास्टिकच्या पिशव्या आढळून येत आहेत. प्लास्टिकच्या पिशव्या बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात महापालिका प्रशासन कमी पडत आहे. मात्र, शहरात बाहेरून येणारे फेरीवाले प्लास्टिकचा वापर जास्त करत असल्याचा अजब दावा महापालिकेचे सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी यांनी केला.

शहरातील फडके रोड, डॉ. राथ रोड, चिमणी गल्ली, मानपाडा रस्ता, नेहरू मैदान परिसर, ठाकुर्ली रेल्वेस्थानक ते हनुमान मंदिर परिसर, पश्चिमेला गुप्ते रोड, मच्छीमार्केट परिसर, फुले रस्ता, गोपी टॉकीज परिसर, जयहिंद कॉलनी परिसर, उमेश नगर, गरिबाचा वाडा आदी परिसरात बसणाºया फेरीवाल्यांकडे सर्रास प्लास्टिक पिशव्या मिळत आहेत.

महापालिका आरोग्य आणि स्वच्छता विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यंतरी प्लास्टिक बंदीविरोधात कडक मोहीम राबवली होती. त्यामुळे त्यावेळी कचरा गोळा करून तो डम्पिंगवर टाकताना अथवा बायोगॅसमध्ये कचºयाचे वर्गीकरण करताना एकूण सुमारे ३५० टन निर्माण होणाºया कचºयामध्ये सुमारे २० टन प्लास्टिकच्या कचºयाची घट झाली होती. त्यामुळे शहरात सर्वत्र प्लास्टिकबंदीचा प्रभाव दिसून यायला लागला होता. नागरिकही स्वत:हून कापडी पिशव्या वापरण्याच्या मानसिकतेत होते. परंतु, मार्च, एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून आतापर्यंत प्लास्टिकबंदी विरोधात ठोस अशी कारवाई झाली नाही.

दिवाळीपासून पुन्हा सर्रासपणे प्लास्टिक पिशव्या दिसू लागल्या आहेत. त्यामुळे कारवाईत सातत्य नसल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. तर, पर्यावरण अभ्यासक, महापालिकेचे अधिकारी यांनी राज्य सरकारने प्लास्टिकचे कारखान्यांमधील उत्पादन बंद करायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली. महापालिकेच्या पथकाकडून सकाळी, दुपारी व सायंकाळी नियमबाह्य प्लास्टिक पिशव्या ठेवणाऱ्यांवर जप्तीची कारवाई केली जाते. परंतु, कारवाई पथकाची पाठ फिरताच पुन्हा रात्री उशिरापर्यंत प्लास्टिक पिशव्यांचे वितरण केले जाते. त्यामुळे समस्या सुटत नसल्याची महापालिकेने नाराजी व्यक्त केली.

शहरात बाहेरून येणारे प्लास्टिक, पिशव्या कसे रोखावे, हा मोठा पेच आहे. पण त्यावरही अल्पावधीतच आम्ही नियंत्रण मिळवू. प्लास्टिक बंदीवरील कारवाईत सातत्य राहणार असून, त्यासंदर्भातील सूचना संबंधित स्वच्छता निरीक्षक, प्रभागक्षेत्र अधिकारी, मुकादम आदींना देण्यात आल्या आहेत. संकलित झालेले प्लास्टिक गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे.- उमाकांत गायकवाड, उपायुक्त, घनकचरा विभाग.

प्लास्टिक घेऊ येणारे बाहरेचे असोत की आतले, ही जबाबदारी अधिकाºयांची आहे. कारवाईत कामचुकारपणा नको. दोन दिवसांनी प्लास्टिकबंदीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार आहे. त्यात दोषी अधिकाºयांवर कारवाई करण्याबाबत विचारविनिमय केला जाईल. थातुरमातूर कारवाईला अर्थच नाही.- विनीता राणे, महापौर, कल्याण-डोंबिवली

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणेdombivaliडोंबिवली