शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

प्लास्टिकबंदीची ऐशीतैशी! मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात ग्लासचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 3:46 AM

पर्यावरण संतुलन राखण्याच्या अनुषंगाने कल्याणजवळील वरप येथे पार पडलेल्या वृक्षलागवडीच्या महामोहीम कार्यक्रमाच्या सभामंडपातच प्लास्टिकच्या ग्लासांचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर झाल्याने प्लास्टिकबंदीची ऐशीतैशी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने झाल्याचे पाहावयास मिळाले.

कल्याण : पर्यावरण संतुलन राखण्याच्या अनुषंगाने कल्याणजवळील वरप येथे पार पडलेल्या वृक्षलागवडीच्या महामोहीम कार्यक्रमाच्या सभामंडपातच प्लास्टिकच्या ग्लासांचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर झाल्याने प्लास्टिकबंदीची ऐशीतैशी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने झाल्याचे पाहावयास मिळाले.१३ कोटी वृक्षारोपण महामोहिमेच्या राज्यस्तरीय शुभारंभाचा कार्यक्रम रविवारी कल्याणजवळील वरप येथील राधास्वामी सत्संग आश्रमामागील वनविभागाच्या जागेवर पार पडला. हा कार्यक्रम राज्य सरकारचा तसेच मोहिमेच्या उद्घाटनाचा असल्याने कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह वनमंत्री, पालकमंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार आदींनी आवर्जून उपस्थिती लावली होती. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानंतर उभारण्यात आलेल्या सभामंडपात मान्यवरांची भाषणे झाली. सुरक्षेच्या कारणास्तव पाण्याची बाटलीही या मंडपात नेण्यास मज्जाव केला जात होता. परंतु, ज्याठिकाणी पाणी पिण्याची व्यवस्था करण्यात आली होती, तेथे बंदी असलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि ग्लासचा सर्रासपणे वापर सुरू होता. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातच प्लास्टिकबंदी धाब्यावर बसवली गेल्याचे दिसून आले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी नागपूरला जायचे आहे, असे सांगून १० मिनिटांचे भाषण करून ते निघाले. अन्य मान्यवरांची भाषणे झाली. परंतु, मुख्यमंत्र्यांनी सभामंडप सोडल्यानंतर काहींनी काढता पाय घेतल्याने मागील खुर्च्या रिकाम्या झाल्या.२० मिनिटांसाठी विद्यार्थी ताटकळले दोन तासवृक्षलागवडीच्या महामोहिमेचा कार्यक्रम अवघ्या १५ ते २० मिनिटांत पार पडला; मात्र त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना दोन तास ताटकळत उभे राहावे लागल्याने संताप व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले होते.कार्यक्रम सकाळी ११ चा होता, परंतु सकाळी ९ वाजल्यापासूनच विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी तिष्ठत ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सकाळी ११.१५ च्या आसपास घटनास्थळी आगमन झाले.लागलीच वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. साधारण २० मिनिटांमध्ये हा मुख्य कार्यक्रम उरकण्यात आला. परंतु, त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना दोन तास उन्हात ताटकळत उभे राहावे लागले.ऐकलीचनाही कैफियतयेथील रहिवासी असलेल्या आदिवासी-कातकरी समाजाच्या हक्काच्या जमिनीवरील वहिवाटीचा रस्ता बंद केल्याने संबंधित समाजबांधव मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कैफियत मांडणार होते; परंतु अनुचित प्रकार घडू शकतो, त्यामुळे पोलिसांनी भेट नाकारल्याचे समजते.

टॅग्स :thaneठाणे