शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

पालिकेत प्रकल्पांचा सपाटा

By admin | Updated: November 12, 2015 02:55 IST

ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती कोलमडली असल्याने त्याचे परिणाम ठाण्याच्या विकासकामांवरदेखील उमटू लागले आहेत

ठाणे : ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती कोलमडली असल्याने त्याचे परिणाम ठाण्याच्या विकासकामांवरदेखील उमटू लागले आहेत. परंतु, नागरिकांना चांगल्या सेवा देण्याबरोबरच पालिकेच्या तिजोरीवर याचा भार पडू नये म्हणून महापालिका आयुक्तांनी आपल्या पोतडीतून पीपीपी म्हणजे खाजगी लोकसहभागातून विविध प्रकल्पांचा सपाटा लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दोन महिन्यांत अशा प्रकारे १५ पैकी १० प्रकल्पांना महासभेचीही मंजुरी त्यांनी घेतली आहे. हे प्रकल्प यशस्वी होतील का, आयुक्तांनी दाखविलेले विविध प्रकल्पांचे स्वप्न, हे दिवास्वप्न तर ठरणार नाही ना, असे सवाल मात्र यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.ठाणे महापालिकेने यंदाच्या अंदाजपत्रकावर दीड महिन्यापूर्वी शिक्कामोर्तब केले. तो २३७० कोटींचा आहे. परंतु, या अंदाजपत्रकात शहरासाठी एकाही नव्या प्रकल्पाचा उल्लेख नाही, किंबहुना नव्या प्रकल्पाची घोषणा करण्यात आलेली नाही. पालिकेची खालावलेली आर्थिक परिस्थिती पाहता उत्पन्न कमी आणि खर्च अधिक होत असल्याने त्याचा ताळमेळ बसविण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि महापौरांनी शहरात विविध प्रकल्प राबविण्यासाठी पीपीपीचा आधार घेतला आहे. या प्रकल्पांमध्ये वॉटर आॅडिट, एनर्जी आॅडिट, सोलर शेती, कोपरी मलनि:सारण प्रकल्प, जैविक खतप्रकल्प, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, पाणीमीटर बसविणे, पादचारी आणि सायकलस्वारांसाठी वेगळी लेन, जेट्टी, वायफाय, ई-वेस्ट, इलेक्ट्रीक बस, वूड वेस्ट, चौक सुशोभीकरण, प्रत्येक प्रभाग समितीत एचटीपी प्लँट, बायोगॅस प्रकल्प आदी जम्बो प्रकल्पांची खैरात आयुक्तांनी दोन महिन्यांत ठाणेकरांवर केली आहे. यातील बहुतेक प्रकल्पांना महासभेत मंजुरी घेण्यात आली आहे. तर, काही प्रकल्प येत्या महासभेत पटलावर ठेवण्यात आले आहेत. यातील काही प्रकल्प पाच आणि काही सात वर्षांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहेत. यातून संबंधित संस्थेला जे काही उत्पन्न मिळणार आहे, त्यातील २५ ते ३० टक्के हिस्सा पालिकेला मिळणार आहे, परंतु हे प्रकल्प यशस्वी होतील अथवा नाहीत, याबाबत मात्र आतापासूनच साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. केवळ ठाणेकरांना चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि महापालिकेचा एकही पैसा खर्च न होता उलट उत्पन्न मिळावे, म्हणूनच हा प्रयोग राबविला जात असल्याचा दावा पालिकेने केला आहे. परंतु, ही वाट खाजगीकरणाकडे जाणारी तर नाही ना, असा सवाल मात्र यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.