शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेत प्रकल्पांचा सपाटा

By admin | Updated: November 12, 2015 02:55 IST

ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती कोलमडली असल्याने त्याचे परिणाम ठाण्याच्या विकासकामांवरदेखील उमटू लागले आहेत

ठाणे : ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती कोलमडली असल्याने त्याचे परिणाम ठाण्याच्या विकासकामांवरदेखील उमटू लागले आहेत. परंतु, नागरिकांना चांगल्या सेवा देण्याबरोबरच पालिकेच्या तिजोरीवर याचा भार पडू नये म्हणून महापालिका आयुक्तांनी आपल्या पोतडीतून पीपीपी म्हणजे खाजगी लोकसहभागातून विविध प्रकल्पांचा सपाटा लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दोन महिन्यांत अशा प्रकारे १५ पैकी १० प्रकल्पांना महासभेचीही मंजुरी त्यांनी घेतली आहे. हे प्रकल्प यशस्वी होतील का, आयुक्तांनी दाखविलेले विविध प्रकल्पांचे स्वप्न, हे दिवास्वप्न तर ठरणार नाही ना, असे सवाल मात्र यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.ठाणे महापालिकेने यंदाच्या अंदाजपत्रकावर दीड महिन्यापूर्वी शिक्कामोर्तब केले. तो २३७० कोटींचा आहे. परंतु, या अंदाजपत्रकात शहरासाठी एकाही नव्या प्रकल्पाचा उल्लेख नाही, किंबहुना नव्या प्रकल्पाची घोषणा करण्यात आलेली नाही. पालिकेची खालावलेली आर्थिक परिस्थिती पाहता उत्पन्न कमी आणि खर्च अधिक होत असल्याने त्याचा ताळमेळ बसविण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि महापौरांनी शहरात विविध प्रकल्प राबविण्यासाठी पीपीपीचा आधार घेतला आहे. या प्रकल्पांमध्ये वॉटर आॅडिट, एनर्जी आॅडिट, सोलर शेती, कोपरी मलनि:सारण प्रकल्प, जैविक खतप्रकल्प, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, पाणीमीटर बसविणे, पादचारी आणि सायकलस्वारांसाठी वेगळी लेन, जेट्टी, वायफाय, ई-वेस्ट, इलेक्ट्रीक बस, वूड वेस्ट, चौक सुशोभीकरण, प्रत्येक प्रभाग समितीत एचटीपी प्लँट, बायोगॅस प्रकल्प आदी जम्बो प्रकल्पांची खैरात आयुक्तांनी दोन महिन्यांत ठाणेकरांवर केली आहे. यातील बहुतेक प्रकल्पांना महासभेत मंजुरी घेण्यात आली आहे. तर, काही प्रकल्प येत्या महासभेत पटलावर ठेवण्यात आले आहेत. यातील काही प्रकल्प पाच आणि काही सात वर्षांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहेत. यातून संबंधित संस्थेला जे काही उत्पन्न मिळणार आहे, त्यातील २५ ते ३० टक्के हिस्सा पालिकेला मिळणार आहे, परंतु हे प्रकल्प यशस्वी होतील अथवा नाहीत, याबाबत मात्र आतापासूनच साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. केवळ ठाणेकरांना चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि महापालिकेचा एकही पैसा खर्च न होता उलट उत्पन्न मिळावे, म्हणूनच हा प्रयोग राबविला जात असल्याचा दावा पालिकेने केला आहे. परंतु, ही वाट खाजगीकरणाकडे जाणारी तर नाही ना, असा सवाल मात्र यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.