शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

खड्ड्यांनी मोडले कंबरडे; वाहतूक मंदावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 23:22 IST

दमदार पावसामुळे पुन्हा रस्त्यांची चाळण

कल्याण : शहरात पाच बळी गेल्यानंतर खडबडून जाग आलेल्या केडीएमसी प्रशासनाने रस्त्यांतील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. परंतु, मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे पुन्हा खड्ड्यांनी डोके वर काढले आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे कंबरडे मोडले आहे. त्याचबरोबर वाहतुकीचा वेग मंदावत असून ठिकठिकाणी कोंडी होत आहे. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांसाठी खड्डे डोकेदुखी ठरत असून भरपावसात ते बुजवायचे तरी कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.कल्याण शहर परिसरात यंदाच्या पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यातील दोन बळी पश्चिमेतील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या शिवाजी चौकात गेले आहेत. त्यामुळे सदोष रस्तेबांधणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पेव्हरब्लॉकमुळे काँक्रिट अथवा डांबरी रस्त्यांची पातळी समान राहत नाही. रस्त्यातील चढउतार अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. तेच नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. पेव्हरब्लॉक खचल्याने शिवाजी चौक ते महंमदअली चौक या मार्गावर खड्डे पडल्याचे पाहावयास मिळत आहे.दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मागील आठवड्यापासून दमदार पुनरागमन केले आहे. हा पाऊस रस्त्यांच्या मुळावर आला असून बुजवलेले खड्डे पुन्हा उखडले गेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, टिळकचौक, बाजारपेठ, लालचौकी, वायलेनगर, आग्रा रोड, दूधनाका, पारनाका, कासारहाट, घेलादेवजी चौक, संतोषीमाता रोड, रामबाग येथील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. डोंबिवली पूर्वेतील घरडा सर्कल ते टाटा पॉवर कंपनीदरम्यानचा न्यू कल्याण रोड, मंजुनाथ विद्यालय, टिळक चौक, ठाकुर्लीत चोळेगाव, ९० फुटी रस्ता, रेल्वे समांतर रस्ता, पंचायत विहीर, छेडा रोड, मानपाडा रोड, गांधीनगर, पश्चिमेतील महात्मा फुले रोड, सुभाष रोड, शास्त्रीनगर, भागशाळा मैदान, बावनचाळ,कोपर उड्डाणपूल परिसर आदी ठिकाणी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे.डोंबिवलीतील एमआयडीसी निवासी भागातील रहिवासीही तेथील खड्ड्यांनी पुरते बेजार झाले आहेत. खड्डेबळींनंतर केडीएमसी मुख्यालयावर मनसेने ‘चले जाव’ मोर्चा काढला होता, तर शहरात पूर्वेकडील भागात पडलेल्या खड्ड्यांची लाज वाटावी, यासाठी तेथील प्रभाग अधिकाºयांना मनसेने लाजाळूचे झाड भेट दिले होते. खड्डे वेळीच न बुजवल्यास पुढच्या वेळेस अधिकाºयांना खड्ड्यांत लोळवू, असा इशाराही मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला होता. पाच बळी गेल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महापालिका अधिकाºयांची खरडपट्टी काढली होती. त्यानंतर, खड्डे बुजवण्याची कामे हाती घेण्यात आली. बहुतांश खड्डे बुजवल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असताना पुन्हा सुरू झालेल्या दमदार पावसामुळे खड्डे पडले आहेत.गणपतीचे आगमन खड्ड्यांतूनच?गणेशोत्सव दोन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. जर पाऊस असाच सुरू राहिला, तर गणपतीचे आगमन खड्ड्यांतूनच होण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी महापालिकेला येत्या काही दिवसांत युद्धपातळीवर खड्डे बुजवावे लागणार आहेत. त्यामुळे महापालिका अधिकाºयांची डोकेदुखी वाढली आहे.

टॅग्स :Potholeखड्डेthaneठाणे