शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

खड्ड्यांनी मोडले कंबरडे; वाहतूक मंदावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 23:22 IST

दमदार पावसामुळे पुन्हा रस्त्यांची चाळण

कल्याण : शहरात पाच बळी गेल्यानंतर खडबडून जाग आलेल्या केडीएमसी प्रशासनाने रस्त्यांतील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. परंतु, मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे पुन्हा खड्ड्यांनी डोके वर काढले आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे कंबरडे मोडले आहे. त्याचबरोबर वाहतुकीचा वेग मंदावत असून ठिकठिकाणी कोंडी होत आहे. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांसाठी खड्डे डोकेदुखी ठरत असून भरपावसात ते बुजवायचे तरी कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.कल्याण शहर परिसरात यंदाच्या पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यातील दोन बळी पश्चिमेतील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या शिवाजी चौकात गेले आहेत. त्यामुळे सदोष रस्तेबांधणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पेव्हरब्लॉकमुळे काँक्रिट अथवा डांबरी रस्त्यांची पातळी समान राहत नाही. रस्त्यातील चढउतार अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. तेच नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. पेव्हरब्लॉक खचल्याने शिवाजी चौक ते महंमदअली चौक या मार्गावर खड्डे पडल्याचे पाहावयास मिळत आहे.दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मागील आठवड्यापासून दमदार पुनरागमन केले आहे. हा पाऊस रस्त्यांच्या मुळावर आला असून बुजवलेले खड्डे पुन्हा उखडले गेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, टिळकचौक, बाजारपेठ, लालचौकी, वायलेनगर, आग्रा रोड, दूधनाका, पारनाका, कासारहाट, घेलादेवजी चौक, संतोषीमाता रोड, रामबाग येथील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. डोंबिवली पूर्वेतील घरडा सर्कल ते टाटा पॉवर कंपनीदरम्यानचा न्यू कल्याण रोड, मंजुनाथ विद्यालय, टिळक चौक, ठाकुर्लीत चोळेगाव, ९० फुटी रस्ता, रेल्वे समांतर रस्ता, पंचायत विहीर, छेडा रोड, मानपाडा रोड, गांधीनगर, पश्चिमेतील महात्मा फुले रोड, सुभाष रोड, शास्त्रीनगर, भागशाळा मैदान, बावनचाळ,कोपर उड्डाणपूल परिसर आदी ठिकाणी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे.डोंबिवलीतील एमआयडीसी निवासी भागातील रहिवासीही तेथील खड्ड्यांनी पुरते बेजार झाले आहेत. खड्डेबळींनंतर केडीएमसी मुख्यालयावर मनसेने ‘चले जाव’ मोर्चा काढला होता, तर शहरात पूर्वेकडील भागात पडलेल्या खड्ड्यांची लाज वाटावी, यासाठी तेथील प्रभाग अधिकाºयांना मनसेने लाजाळूचे झाड भेट दिले होते. खड्डे वेळीच न बुजवल्यास पुढच्या वेळेस अधिकाºयांना खड्ड्यांत लोळवू, असा इशाराही मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला होता. पाच बळी गेल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महापालिका अधिकाºयांची खरडपट्टी काढली होती. त्यानंतर, खड्डे बुजवण्याची कामे हाती घेण्यात आली. बहुतांश खड्डे बुजवल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असताना पुन्हा सुरू झालेल्या दमदार पावसामुळे खड्डे पडले आहेत.गणपतीचे आगमन खड्ड्यांतूनच?गणेशोत्सव दोन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. जर पाऊस असाच सुरू राहिला, तर गणपतीचे आगमन खड्ड्यांतूनच होण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी महापालिकेला येत्या काही दिवसांत युद्धपातळीवर खड्डे बुजवावे लागणार आहेत. त्यामुळे महापालिका अधिकाºयांची डोकेदुखी वाढली आहे.

टॅग्स :Potholeखड्डेthaneठाणे