शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

खड्ड्यांनी मोडले कंबरडे; वाहतूक मंदावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 23:22 IST

दमदार पावसामुळे पुन्हा रस्त्यांची चाळण

कल्याण : शहरात पाच बळी गेल्यानंतर खडबडून जाग आलेल्या केडीएमसी प्रशासनाने रस्त्यांतील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. परंतु, मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे पुन्हा खड्ड्यांनी डोके वर काढले आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे कंबरडे मोडले आहे. त्याचबरोबर वाहतुकीचा वेग मंदावत असून ठिकठिकाणी कोंडी होत आहे. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांसाठी खड्डे डोकेदुखी ठरत असून भरपावसात ते बुजवायचे तरी कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.कल्याण शहर परिसरात यंदाच्या पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यातील दोन बळी पश्चिमेतील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या शिवाजी चौकात गेले आहेत. त्यामुळे सदोष रस्तेबांधणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पेव्हरब्लॉकमुळे काँक्रिट अथवा डांबरी रस्त्यांची पातळी समान राहत नाही. रस्त्यातील चढउतार अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. तेच नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. पेव्हरब्लॉक खचल्याने शिवाजी चौक ते महंमदअली चौक या मार्गावर खड्डे पडल्याचे पाहावयास मिळत आहे.दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मागील आठवड्यापासून दमदार पुनरागमन केले आहे. हा पाऊस रस्त्यांच्या मुळावर आला असून बुजवलेले खड्डे पुन्हा उखडले गेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, टिळकचौक, बाजारपेठ, लालचौकी, वायलेनगर, आग्रा रोड, दूधनाका, पारनाका, कासारहाट, घेलादेवजी चौक, संतोषीमाता रोड, रामबाग येथील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. डोंबिवली पूर्वेतील घरडा सर्कल ते टाटा पॉवर कंपनीदरम्यानचा न्यू कल्याण रोड, मंजुनाथ विद्यालय, टिळक चौक, ठाकुर्लीत चोळेगाव, ९० फुटी रस्ता, रेल्वे समांतर रस्ता, पंचायत विहीर, छेडा रोड, मानपाडा रोड, गांधीनगर, पश्चिमेतील महात्मा फुले रोड, सुभाष रोड, शास्त्रीनगर, भागशाळा मैदान, बावनचाळ,कोपर उड्डाणपूल परिसर आदी ठिकाणी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे.डोंबिवलीतील एमआयडीसी निवासी भागातील रहिवासीही तेथील खड्ड्यांनी पुरते बेजार झाले आहेत. खड्डेबळींनंतर केडीएमसी मुख्यालयावर मनसेने ‘चले जाव’ मोर्चा काढला होता, तर शहरात पूर्वेकडील भागात पडलेल्या खड्ड्यांची लाज वाटावी, यासाठी तेथील प्रभाग अधिकाºयांना मनसेने लाजाळूचे झाड भेट दिले होते. खड्डे वेळीच न बुजवल्यास पुढच्या वेळेस अधिकाºयांना खड्ड्यांत लोळवू, असा इशाराही मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला होता. पाच बळी गेल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महापालिका अधिकाºयांची खरडपट्टी काढली होती. त्यानंतर, खड्डे बुजवण्याची कामे हाती घेण्यात आली. बहुतांश खड्डे बुजवल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असताना पुन्हा सुरू झालेल्या दमदार पावसामुळे खड्डे पडले आहेत.गणपतीचे आगमन खड्ड्यांतूनच?गणेशोत्सव दोन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. जर पाऊस असाच सुरू राहिला, तर गणपतीचे आगमन खड्ड्यांतूनच होण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी महापालिकेला येत्या काही दिवसांत युद्धपातळीवर खड्डे बुजवावे लागणार आहेत. त्यामुळे महापालिका अधिकाºयांची डोकेदुखी वाढली आहे.

टॅग्स :Potholeखड्डेthaneठाणे