शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

खड्ड्यांनी मोडले कंबरडे; वाहतूक मंदावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 23:22 IST

दमदार पावसामुळे पुन्हा रस्त्यांची चाळण

कल्याण : शहरात पाच बळी गेल्यानंतर खडबडून जाग आलेल्या केडीएमसी प्रशासनाने रस्त्यांतील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. परंतु, मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे पुन्हा खड्ड्यांनी डोके वर काढले आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे कंबरडे मोडले आहे. त्याचबरोबर वाहतुकीचा वेग मंदावत असून ठिकठिकाणी कोंडी होत आहे. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांसाठी खड्डे डोकेदुखी ठरत असून भरपावसात ते बुजवायचे तरी कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.कल्याण शहर परिसरात यंदाच्या पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यातील दोन बळी पश्चिमेतील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या शिवाजी चौकात गेले आहेत. त्यामुळे सदोष रस्तेबांधणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पेव्हरब्लॉकमुळे काँक्रिट अथवा डांबरी रस्त्यांची पातळी समान राहत नाही. रस्त्यातील चढउतार अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. तेच नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. पेव्हरब्लॉक खचल्याने शिवाजी चौक ते महंमदअली चौक या मार्गावर खड्डे पडल्याचे पाहावयास मिळत आहे.दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मागील आठवड्यापासून दमदार पुनरागमन केले आहे. हा पाऊस रस्त्यांच्या मुळावर आला असून बुजवलेले खड्डे पुन्हा उखडले गेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, टिळकचौक, बाजारपेठ, लालचौकी, वायलेनगर, आग्रा रोड, दूधनाका, पारनाका, कासारहाट, घेलादेवजी चौक, संतोषीमाता रोड, रामबाग येथील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. डोंबिवली पूर्वेतील घरडा सर्कल ते टाटा पॉवर कंपनीदरम्यानचा न्यू कल्याण रोड, मंजुनाथ विद्यालय, टिळक चौक, ठाकुर्लीत चोळेगाव, ९० फुटी रस्ता, रेल्वे समांतर रस्ता, पंचायत विहीर, छेडा रोड, मानपाडा रोड, गांधीनगर, पश्चिमेतील महात्मा फुले रोड, सुभाष रोड, शास्त्रीनगर, भागशाळा मैदान, बावनचाळ,कोपर उड्डाणपूल परिसर आदी ठिकाणी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे.डोंबिवलीतील एमआयडीसी निवासी भागातील रहिवासीही तेथील खड्ड्यांनी पुरते बेजार झाले आहेत. खड्डेबळींनंतर केडीएमसी मुख्यालयावर मनसेने ‘चले जाव’ मोर्चा काढला होता, तर शहरात पूर्वेकडील भागात पडलेल्या खड्ड्यांची लाज वाटावी, यासाठी तेथील प्रभाग अधिकाºयांना मनसेने लाजाळूचे झाड भेट दिले होते. खड्डे वेळीच न बुजवल्यास पुढच्या वेळेस अधिकाºयांना खड्ड्यांत लोळवू, असा इशाराही मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला होता. पाच बळी गेल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महापालिका अधिकाºयांची खरडपट्टी काढली होती. त्यानंतर, खड्डे बुजवण्याची कामे हाती घेण्यात आली. बहुतांश खड्डे बुजवल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असताना पुन्हा सुरू झालेल्या दमदार पावसामुळे खड्डे पडले आहेत.गणपतीचे आगमन खड्ड्यांतूनच?गणेशोत्सव दोन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. जर पाऊस असाच सुरू राहिला, तर गणपतीचे आगमन खड्ड्यांतूनच होण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी महापालिकेला येत्या काही दिवसांत युद्धपातळीवर खड्डे बुजवावे लागणार आहेत. त्यामुळे महापालिका अधिकाºयांची डोकेदुखी वाढली आहे.

टॅग्स :Potholeखड्डेthaneठाणे