शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

उल्हासनगरात ऐन पावसाळ्यात कचऱ्याचे ढीग; सर्वत्र दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:47 IST

उल्हासनगर : संततधार पावसामुळे डम्पिंग ग्राऊंडच्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन कचऱ्याच्या गाड्या खाली करण्यास उशीर होत आहे. परिणामी ...

उल्हासनगर : संततधार पावसामुळे डम्पिंग ग्राऊंडच्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन कचऱ्याच्या गाड्या खाली करण्यास उशीर होत आहे. परिणामी शहरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होऊन सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचे जिणे मुश्कील झाले आहे.

उल्हासनगरातील कचरा उचलण्याचा ठेका महापालिकेने एका खासगी कंपनीला दिला असून दिवसाला ४ लाखांपेक्षा जास्त खर्च कचरा उचलण्यावर केला जातो. या व्यतिरिक्त कचरा सपाटीकरणावर कोट्यवधींचा खर्च महापालिका करते. दरम्यान, संततधार पावसाने डम्पिंग ग्राऊंडचा रस्ता चिखलमय झाला असून कचऱ्याच्या गाड्या डम्पिंगवर उंच ठिकाणी नेताना चालकांना कसरत करावी लागते. निसरड्या रस्त्यामुळे व कचऱ्याचा उंच डोंगर झाल्याने, मोठा अपघात होण्याची शक्यता कामगार संघटनेचे संदीप गायकवाड यांनी व्यक्त केली. यापूर्वी कोट्यवधीचा खर्च करून गाड्यांसाठी बनविलेला रस्ता व रॅम गेला कुठे, असा प्रश्नही त्यांनी केला.

कॅम्प नं-५ येथील खडी मशीन डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याचे डोंगर उभे राहिलेत. हा डोंगर कोसळल्यास मोठा अनर्थ घडण्याची भीती कामगार व्यक्त करत आहेत. येथील डम्पिंग हटविण्याची मागणी शिवसेनेसह स्थानिक नागरिक करत आहेत. मात्र, महापालिकेकडे पर्यायी जागाच नाही. राज्य शासनाने तीन वर्षांपूर्वी शेजारील उसाटने गाव हद्दीत एमएमआरडीएच्या ताब्यातील ३० एकर जागा कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेला हस्तांतरित केली. मात्र, स्थानिक नागरिकांसह आमदार गणपत गायकवाड यांनी विरोध केल्याने महापालिकेसमोर प्रश्नचिन्ह उभे ठाकले.

.................

कचरा उचलण्यासाठी अतिरिक्त यंत्रणा लावणार

गणेशोत्सवादरम्यान कचऱ्याच्या प्रमाणात वाढ झाली असून संततधार पावसाने डम्पिंग ग्राऊंडकडे जाणारा रस्ता चिखलमय झाला. गाड्यांमधून कचरा खाली करण्यास उशीर लागत असल्याची माहिती आरोग्य अधिकारी मनिष हिवरे यांनी दिली. शहर कचरामुक्त करण्यासाठी अतिरिक्त यंत्रणा लावणार असल्याचे हिवरे यांनी सांगितले.

.........