शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

रद्दी साहित्यावरून पेटला वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:26 IST

मराठी साहित्य क्षेत्रातील समीक्षक चंद्रकांत पाटील यांनी अंबाजोगाई येथील मराठवाडा विभागीय साहित्य संमेलनात हल्ली प्रकाशित होणा-या पुस्तकांपैकी ८० ते ९० टक्के पुस्तके किलोच्या भावाने रद्दीत विकण्याच्या लायकीची असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले.

ठाणे : मराठी साहित्य क्षेत्रातील समीक्षक चंद्रकांत पाटील यांनी अंबाजोगाई येथील मराठवाडा विभागीय साहित्य संमेलनात हल्ली प्रकाशित होणा-या पुस्तकांपैकी ८० ते ९० टक्के पुस्तके किलोच्या भावाने रद्दीत विकण्याच्या लायकीची असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. मराठी सारस्वतात या विधानाच्या समर्थनार्थ किंवा विरोधात पडसादही उमटले नाहीत इतके आपले लेखक, साहित्यिक, समीक्षक गोठून बर्फाचे गोळे झाले आहेत. ‘लोकमत’ने मराठीमधील दोन नामांकित प्रकाशकांना या विषयावर जाणीवपूर्वक बोलते केले...समीक्षकांनी ‘मृत्युंजय’, ‘ययाती’लाही नाकं मुरडली होती-अशोक कोठावळे,(मॅजेस्टीक प्रकाशन)वाचन हे व्यक्तीनुरूप बदलत असते. समीक्षकांना वाटते तेच साहित्य असते का? तर या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’, असे आहे. प्रसिद्ध होणारी ८० ते ९० टक्के पुस्तके रद्दीत किलोच्या भावाने विकण्याच्या लायकीची असतात, असे समीक्षक, लेखक पाटील यांचे मत आहे. ८० ते ९० टक्के हे मोठे प्रमाण झाले. मग शिल्लक काय राहतं?वाचक घडवणे आवश्यक आहे आणि वाचक घडवण्यासाठी पुस्तके निर्माण व्हावी लागतात, नवनवीन साहित्य निर्माण व्हायला हवे. एक व्यक्ती असे ठरवू शकत नाही. सर्व पुस्तकांचे साहित्य निर्माण व्हावे, लोकप्रिय साहित्य निर्माण व्हावे. चेतन भगतला मराठी समीक्षकांची मान्यता मिळणारच नाही; पण त्याच्या साहित्याची तरुणांना गरज आहे. साहित्य निर्मिती न झाल्यास वाचन संस्कृती लयाला जाईल. मृत्युंजयलाही समीक्षकांची मान्यता मिळाली नव्हती. लोकप्रिय साहित्य समीक्षकाला आवडेलच असे नाही आणि समीक्षकाला आवडलेले साहित्य लोकप्रिय होईलच, असे नाही. ‘ययाती’वरही मोठी टीका झाली होती. परंतु लोकप्रिय साहित्य निर्मितीची साहित्य व्यवहाराला गरज आहे. समीक्षकांच्या दृष्टीने ते टाकाऊ असू शकते. लेखन ही स्फूर्ती असते ते आतून येत असते. मान्यवर लेखकांप्रमाणे नवोदित लेखकांचीही पुस्तके येत असतात. पाटील यांच्या विधानामुळे प्रकाशकांच्या पुस्तक निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले नाही. त्यांचे विधान त्यांच्यापुरते आहे. याने साहित्य व्यवहारावर काहीही परिणाम होणार नाही.नव्या कवी, लेखक कितीही टीका झाली तरी त्यांचे लिखाण थांबणार नाही. जे स्फुरतं तो ते लिहिणारच. समीक्षक त्याला काय म्हणतील हा नंतरचा मुद्दा आहे. बºयाच समीक्षकांनी अशी विधाने केली आहेत. तरीही नवीन लेखक नाऊमेद होणार नाहीत.प्रकाशन संस्था आपले निकष बाळगून वेगवेगळ्या प्रकारांची पुस्तके प्रकाशित करीत असतात. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा आमच्यावर फारसा परिणाम होणार नाही, तसा संबंधच नाही. प्रत्येक प्रकाशन संस्थेचे स्वत:चे लेखकही असतात.नवलेखकांना नाउमेद करू नये-- अमोल नाले, (अनघा प्रकाशन)समीक्षकांची मतं ही वेगवेगळी असू शकतात. चंद्रकांत पाटील यांनी कोणती पुस्तके वाचून हे मत बनवले मुद्दा आहे. त्यांच्या विधानाने वाद वाढू शकतात. त्यांच्याकडे कोणती पुस्तके आहेत याची पडताळणी करायला हवी. त्यांनी अंबाजोगाईला झालेल्या मराठवाडा विभागीय संमेलनात केलेले विधान हे नवीन लेखकांना नाउमेद करणारे आहे. उलटपक्षी पाटील यांनी नवीन लेखकांना उमेद देण्याची गरज आहे. नवीन लेखकांचे लेखन हे उत्तम आहे यात वाद नाही. नवीन लेखकांना पुरस्कारही मिळाले आहेत. प्रकाशक पुस्तके प्रकाशित करताना ते वाचून. पुस्तक समाजाला कसे उपयुक्त ठरेल, याचा विचार केला जातो. प्रकाशक हा पुस्तकांचे मूल्य जाणतो. निकृष्ट दर्जाच्या पुस्तकांचे प्रस्ताव येत असतात पण तो विषय फार महत्त्वाचा वाटत नाही. प्रकाशक जे छापतो ते समाजोपयोगी असते. त्यातून पुढची पिढी घडावी हा उद्देश डोळ््यासमोर असतो. चांगले वाचन असेल तर पुढची पिढीही चांगली घडते. शहर, ग्रामीण भागांतील पुस्तकांचा दर्जा अजिबात घसरलेला नाही. ग्रामीण भागांतून भरपूर लेखक तयार झाले आहेत, ते चांगले लिहितात.