शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांविरोधात मानवी साखळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 11:55 IST

कोपरी पूल आणि आनंद नगर टोल नाका येथील वाहतूक कोंडीमुळे हा मार्ग वापरत असणाऱ्या प्रत्येक ठाणेकर आणि मुंबईकरांच्या जीवनावर त्याचा परिणाम होत आहे.

विशाल हळदे

ठाणे - ठाण्यातील वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांविरोधात ठाणेकरांनी एकत्र येत मंगळवारी सकाळी (4 सप्टेंबर) मानवी साखळी तयार केली. हातात फलक घेऊन ठाणेकरांच्या या समस्या सोडवण्यासाठी आनंद नगर टोल नाक्याजवळ ठाणेकर एकवटले होते. कोपरी पूल आणि आनंद नगर टोल नाका येथील वाहतूक कोंडीमुळे हा मार्ग वापरत असणाऱ्या प्रत्येक ठाणेकर आणि मुंबईकरांच्या जीवनावर त्याचा परिणाम होत आहे.

टोल नाका व कोपरी पुलामधील अंतर अंदाजे 1 -2 कि.मी. आहे आणि ऐन गर्दीच्या वेळेत हे अंतर पार करण्यासाठी 30-45 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो. या परिस्थितीत नागरिकांच्या कामाचे व इंधनांचे नुकसान होते. तसेच प्रवाशांच्या मानसिकतेवर ही परिणाम होतो. नागरिकांनी याबाबत अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या असल्या तरी सर्व समस्या तशाच आहेत.  त्यामुळेच 300 पेक्षा जास्त ठाणेकरांनी एक मानवी साखळी निर्माण करत  त्यासंदर्भात एक ठराव मांडण्याची मागणी केली आहे. 

अंदाजे 60000 वाहने दररोज हा मार्ग वापरत आहेत आणि दरवर्षी 100 कोटींपेक्षा जास्त टोल  देत आहेत. मात्र तरिही वाहतूक कोंडी आणि खड्डे या समस्येचा सामना हा करावा लागतो. या मध्ये सहभागी झालेल्या सदस्यांनी सांगितले की, मुंबई झोन मधून दर वर्षी 22 हजार कोटी रुपये थेट कर स्वरूपात दिले जातात आणि ते कोपरी पुलाच्या विस्तारामध्ये कोणताही विलंब स्वीकार करू शकत नाही. उपस्थित सदस्यांनी अशी मागणी केली की जो पर्यंत कोपरी पुलाचा विस्तार होत नाही तोपर्यंत सरकारने कुठल्याही वाहनाकडून टोल गोळा करू नये आणि ठाण्यामध्ये नोंदणीकृत सर्व वाहनांकडून टोल रद्द करावा. 

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडीPotholeखड्डे