शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

बुलेट ट्रेनप्रमाणेच भरपाई द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 12:18 AM

विरार-अलिबाग कॉरिडॉर : युवा मोर्चाचा असहकार्याचा इशारा

कल्याण : विरार-अलिबाग कॉरिडॉरमध्ये बाधित होणाऱ्यांना बुलेट ट्रेनसाठी संपादित केल्या जाणाºया जमिनीला दिला जातो तेवढाच मोबदला देण्याच्या मागणीसह अन्य मागण्या पूर्ण करा. अन्यथा प्रकल्पास सहकार्य केले जाणार नाही, असा इशारा सर्वपक्षीय युवा मोर्चाने दिला आहे.

युवा मोर्चाचे गजानन पाटील यांच्या शिष्टमंडळाने मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी अलीकडेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त संजय खंदारे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांतून विरार-अलिबाग कॉरिडॉर जातो. अलिबाग, पनवेल, पेण, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, पालघर, वसईतील शेतकºयांच्या जमिनी यात बाधित होत आहेत. जमिनीचा दर कमी दिला जात आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पात जो दर दिला गेला तोच दर या प्रकल्पबाधितांना मिळणे अपेक्षित आहे. प्रकल्पानजीकच्या बाधितांना बांधकाम करायचे झाल्यास शून्य समास अंतर सोडून त्यास ना हरकत दाखला मिळाला पाहिजे. विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे बांधकाम करण्यास ना हरकत दाखल्यासाठी शुल्क आकारले जाऊ नये. घराच्या बदल्यात घर दिले जावे. जमिनीच्या बदल्याच जमीन दिली जावी. प्रकल्पापासून सर्व्हिस रोडची सुविधाही असायला हवी. तसेच बाधित आणि स्थानिकांना हा रस्ता टोलफ्री असावा. घारिवली, संदप, काटई आणि कोळे गावातील पूर्वीचे नकाशे व सातबारा नंबर यात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांची घरे बाधित होत आहे. ही घरे बाधित होऊ नये यासाठी केलेला बदल रद्द करण्यात यावा. पुन्हा नव्याने नकाशे व सातबारा याचा फेरविचार करण्याची गरज आहे. त्यामुळे बाधितांचे प्रमाण कमी होऊ शकते. विरार अलिबाग कॉरीडॉर प्रकल्पास संत सावळाराम महाराज यांचे नाव दिले जावे, अशी मागणीही युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.‘तो’ मोबदला मार्गी लावाच्भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचे सहापदरीकरणातील बाधितांना मोबदला आधी देण्यात यावा यासाठी एमएसआरडीसीकडे पाठपुरावा सुरू आहे.च्मोबदला न मिळाल्यास कॉरिडॉरला गावांतील बाधित सहकार्य करणार नाहीत, असा इशारा देण्यात आला आहे.