शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

कल्याणमध्ये ५९ वाहनांद्वारे घातली जाते गस्त! चोरट्यांवर वचक ठेवण्यासाठी १७२ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गस्तीची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 09:01 IST

प्रशांत माने कल्याण :   कल्याण परिमंडळ-३ मध्ये काही महिन्यांपासून घरफोड्या आणि वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मध्यरात्री ...

प्रशांत माने

कल्याण:  कल्याण परिमंडळ-३ मध्ये काही महिन्यांपासून घरफोड्या आणि वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मध्यरात्री चोरट्यांकडून बंद घरे लक्ष्य केली जात असताना दिवसाढवळ्याही घराचे कडी-कोयंडे उचकटून लाखोंची मालमत्ता लुटून नेली जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चोरीच्या घटनांमध्ये घट झाल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. मात्र, असे असले तरी वाढत्या घटना पाहता पोलिसांची गस्त सुरू आहे का?, अशी शंका उपस्थित होत आहे. दरम्यान, कल्याण-डोंबिवलीत ५९ वाहनांद्वारे गस्त घातली जात असून, गस्तीसाठी १७२ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याचे पोलिसांनी सांगितले.कल्याण-डोंबिवलीत घरे व दुकानांचे शटर उचकटून मुद्देमाल लंपास करणे, चोरी, दरोडा, सोनसाखळी चोरी अशा घटनांत वाढ झाली आहे. डिसेंबरमध्ये एका जवाहिऱ्याच्या दुकानात भरदिवसा शस्त्राच्या धाकाने चोरीचा प्रकार घडला होता. तर, आडीवलीत तीन दिवसांत ११ घरफोड्या झाल्या होत्या. त्यामुळे गस्तीवरच संशय व्यक्त झाला. लॉकडाऊनमध्ये गस्त मोठ्या प्रमाणात होती. त्यावेळी गुन्हे घटले होते. परंतु, आता गुन्ह्यांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे.वाहनांवर असे ठेवले जाते नियंत्रण कल्याण परिमंडळ-३ मध्ये कल्याण, डोंबिवलीतील प्रत्येकी चार पोलीस ठाणी आहेत. पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरिक्षकांसह दोन्ही शहरांतील सहायक पोलीस आयुक्त आणि परिमंडळाच्या पोलीस उपायुक्तांतर्फेही गस्त घातली जात आहे. आरएफआयडी प्रणालीद्वारे गस्त घातल्याची नोंद केली जात आहे. कल्याण परिक्षेत्रात अशी २६ यंत्र लावली आहेत. तसेच दर दोन तासांनी गस्त घातली जाते.

अनलॉकमध्ये गस्त झाली कमीकोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये पोलिसांची दिवस-रात्र गस्त दिसून येत होती. परंतु, अनलॉक सुरू झाल्यापासून गस्त कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनलॉकमध्ये एका ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन संबंधित यंत्रणांकडून केले जात असताना दुसरीकडे मात्र या नियमाकडे पुरते दुर्लक्ष केले जात आहे. गस्त कमी झाल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे बोलले जाते. कल्याण-डोंबिवलीतील प्रमुख चौकांमध्ये हे चित्र दिसून येते.

अशी होते गस्तीची नोंद‘आरएफआयडी’च्या २७ मशीनपैकी पाच मशीन महात्मा फुले चौक, बाजारपेठ, कोळसेवाडीत प्रत्येकी तीन, खडकपाडा चार, रामनगर आणि विष्णूनगर, टिळकनगर प्रत्येकी तीन आणि मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार मशीन लावली असून एकूण ७८६ टॅग आहेत. या माध्यमातून गस्ती घातल्याची नोंद होते.

चोरीचे प्रमाण घटले कल्याण परिमंडळ हद्दीत दररोज गस्त घातली जाते. गस्त परिणामकारक होतेय की नाही, यासाठी आरएफआयडी प्रणालीद्वारे नियंत्रण ठेवले जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चोरीचे प्रमाण कमी झाले आहे.- विवेक पानसरे,पोलीस उपायुक्त, परिमंडळ-३

टॅग्स :kalyanकल्याणPoliceपोलिसThiefचोरRobberyचोरी