शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्के, उल्हासनगरमध्ये कोरोना मृत्युदरही दोन टक्क्यांपेक्षा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 12:45 AM

आयुक्तांच्या प्रयत्नांना यश : उल्हासनगरमध्ये कोरोना मृत्युदरही दोन टक्क्यांपेक्षा कमी

उल्हासनगर : शहरात कोरोना रुग्णांची संख्या सहा हजार ८०० पेक्षा जास्त झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर, मृत्युदर हा दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. गेल्या आठवड्यापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.उल्हासनगरमध्ये लॉकडाऊनकाळात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊन ती संख्या सहा हजार ८०० पेक्षा जास्त झाली. त्याचा आरोग्य सुविधेवर ताण पडला. महापालिकेच्या आरोग्य विभागाला नागरिकांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. तसेच आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्यावर केबिन आयुक्त असल्याचा आरोप झाला. मात्र, आयुक्तांनी सर्वपक्षीय नगरसेवक व महापालिका अधिकारी यांना विश्वासात घेऊन विविध उपाययोजना राबवत एक आराखडा तयार केला. अखेर, आयुक्तांच्या प्रयत्नांना यश येऊन पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांच्या संख्येला ब्रेक लागला. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्क्यांपेक्षा जास्त झाले. तसेच शहरातील मृत्युदर दोन टक्क्यांपेक्षा कमी झाला.

एकूण रुग्णांपैकी पाच हजार ५४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर, आजपर्यंत १३५ जणांचा मृत्यू झाला. एक हजार १५७ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यापैकी फक्त ८० रुग्णांना तीव्र स्वरूपाचा त्रास होत आहे. तर, २६५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असून २४७ रुग्णांना कोणताही त्रास व लक्षणे नाहीत. नागरिक घराबाहेर कमी पडल्यास कोरोनाचा संसर्ग कमी होईल, अशी प्रतिक्रिया महापौर लीलाबाई अशान यांनी दिली.कोरोना रुग्णांच्या जेवणाकडे लक्षकोरोना रुग्णांची रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी महापालिका प्रशासन रुग्णांच्या जेवणाकडे विशेष लक्ष देत असल्याची माहिती सहायक आयुक्त मनीष हिवरे यांनी दिली. दोन वेळा गरम चहा, नाश्ता, जेवण, एक वेळ अंडे, फळे, दूध असे जेवण दिले जात आहे. सकस आहार दिला जात असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे