शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

रुग्णाचा रिक्षातच तडफडून मृत्यु; अहवाल आणा मगच करु दाखल, रुग्णालयांनी केले हात वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 15:28 IST

मानपाडा भागात राहणाऱ्या एका तरुणाची प्रकृत्ती अचानक बिघडली, त्यामुळे शुक्रवारी त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्याच्या नातेवाईंकानी धावपळ सुरु केली.

ठाणे: कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येबरोबरच मृत्युचे प्रमाणही ठाण्यात दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु प्रशासनाच्या चुकांमुळे देखील काहींना आपल्या प्राणांना नाहक मुकावे लागल्याच्या घटना एका मागून एक समोर येत आहे. 

मानपाडा भागात राहणाऱ्या एका तरुणाची प्रकृत्ती अचानक बिघडली, त्यामुळे शुक्रवारी त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्याच्या नातेवाईंकानी धावपळ सुरु केली. शहरातील तीन चार खाजगी रुग्णालयात त्याला नेण्यात आले. परंतु या रुग्णालयांनी आधी कोरोनाचा रिपोर्ट आणा मगच दाखल करु असे सांगितले. शेवटी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेता नेता या रुग्णाचा रिक्षात त्यांचा मृत्यु झाला.

घोडबंदर भागातील एका व्यक्तीला मागील काही दिवस त्रस सुरु होता. त्यामुळे त्याने 1 जुलै रोजी कोरोनाची चाचणी केली होती. परंतु जो र्पयत अहवाल येत नाही, तो र्पयत उपचार करता येणार नाहीत, असे त्याला सांगण्यात आले होते. याच कालावधीत शुक्रवारी रात्री त्याची प्रकृती जास्त खालावली. त्यामुळे, त्याच्या नातेवाईंकानी आधी त्याला रुग्णालयात नेण्यासाठी वाहनाची शोधाशोध सुरु केली. अहवाल आला असेल तरच अॅम्ब्युलेन्स दिली जाईल असेही महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे अखेर एका रिक्षावाल्याला विनंती केल्यानंतर त्या रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी धडपड सुरु झाली.

जवळ जवळ दोन तास शहरातील प्रतीथयश तीन ते चार रुग्णालयात त्याला दाखल करुन घेण्यासाठी नातेवाईकांनी विनंती केली. परंतु आधी कोरोनाचा अहवाल आणा मगच दाखल करु असे त्यांना सांगण्यात आले. अखेर त्यांनी रुग्णाला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. परंतु रुग्णालयात जाईपर्यंतच रुग्णाचा रिक्षातच तडफडून मृत्यु झाला. डॉक्टरांनी तपासले असता, त्याचा आधीच मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले.

चार दिवसानंतरही कोरोनाचा अहवाल प्राप्त नाही

सदर रुग्णाने 1 जुलै रोजी कळवा रुग्णालयात जाऊन कोरोनाची चाचणी केली होती. त्यानंतर चार दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही आणि त्याचा मृत्यु झाल्यानंतरही अहवाल मात्र प्राप्त झालेला नाही. यामध्ये आता हा प्रशासनाचासुध्दा ढिसाळपणाच म्हणावा लागणार आहे.

रुग्णाच्या नातेवाईंकानाच मृतदेह प्लास्टीकमध्ये पॅक करावा लागला. सिव्हील रुग्णालयात मृतदेह ठेवण्यात आला होता. परंतु रुग्णांच्या नातेवाईकांना 600 रुपये खर्च करुन प्लास्टीक रॅपर विकत घ्यावे लागले आणि तेथील कर्मचा:यांनी तुम्हालाचा मृतेदह पॅक करावा लागेल असे सांगितले. त्यानुसार नातेवाईकांमधील दोघांनी त्यांचा मृतदेह प्लास्टीकमध्ये पॅक केला.

अंत्यविधीसाठी लागले सहा तास ताटकळत

जवाहरबाग स्मशानभुमीतही अंत्यविधी करण्यासाठी जवळ जवळ सहा तासांचा कालावधी गेला. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर जवाहरबाग स्मशानभुमीत नेण्यात आला. परंतु तेथे आधीच वेटींगवर 10 नंबर होते. त्यामुळे तेथे देखील त्यांना जवळ जवळ 6 तास ताटकळत उभे राहावे लागले होते. मागील कित्येक दिवसापासून इतर स्मशानभुमीतही ही व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. परंतु अद्यापही त्याकडे प्रशासनाने काही लक्ष दिलेले नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे