शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णाचा रिक्षातच तडफडून मृत्यु; अहवाल आणा मगच करु दाखल, रुग्णालयांनी केले हात वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 15:28 IST

मानपाडा भागात राहणाऱ्या एका तरुणाची प्रकृत्ती अचानक बिघडली, त्यामुळे शुक्रवारी त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्याच्या नातेवाईंकानी धावपळ सुरु केली.

ठाणे: कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येबरोबरच मृत्युचे प्रमाणही ठाण्यात दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु प्रशासनाच्या चुकांमुळे देखील काहींना आपल्या प्राणांना नाहक मुकावे लागल्याच्या घटना एका मागून एक समोर येत आहे. 

मानपाडा भागात राहणाऱ्या एका तरुणाची प्रकृत्ती अचानक बिघडली, त्यामुळे शुक्रवारी त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्याच्या नातेवाईंकानी धावपळ सुरु केली. शहरातील तीन चार खाजगी रुग्णालयात त्याला नेण्यात आले. परंतु या रुग्णालयांनी आधी कोरोनाचा रिपोर्ट आणा मगच दाखल करु असे सांगितले. शेवटी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेता नेता या रुग्णाचा रिक्षात त्यांचा मृत्यु झाला.

घोडबंदर भागातील एका व्यक्तीला मागील काही दिवस त्रस सुरु होता. त्यामुळे त्याने 1 जुलै रोजी कोरोनाची चाचणी केली होती. परंतु जो र्पयत अहवाल येत नाही, तो र्पयत उपचार करता येणार नाहीत, असे त्याला सांगण्यात आले होते. याच कालावधीत शुक्रवारी रात्री त्याची प्रकृती जास्त खालावली. त्यामुळे, त्याच्या नातेवाईंकानी आधी त्याला रुग्णालयात नेण्यासाठी वाहनाची शोधाशोध सुरु केली. अहवाल आला असेल तरच अॅम्ब्युलेन्स दिली जाईल असेही महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे अखेर एका रिक्षावाल्याला विनंती केल्यानंतर त्या रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी धडपड सुरु झाली.

जवळ जवळ दोन तास शहरातील प्रतीथयश तीन ते चार रुग्णालयात त्याला दाखल करुन घेण्यासाठी नातेवाईकांनी विनंती केली. परंतु आधी कोरोनाचा अहवाल आणा मगच दाखल करु असे त्यांना सांगण्यात आले. अखेर त्यांनी रुग्णाला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. परंतु रुग्णालयात जाईपर्यंतच रुग्णाचा रिक्षातच तडफडून मृत्यु झाला. डॉक्टरांनी तपासले असता, त्याचा आधीच मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले.

चार दिवसानंतरही कोरोनाचा अहवाल प्राप्त नाही

सदर रुग्णाने 1 जुलै रोजी कळवा रुग्णालयात जाऊन कोरोनाची चाचणी केली होती. त्यानंतर चार दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही आणि त्याचा मृत्यु झाल्यानंतरही अहवाल मात्र प्राप्त झालेला नाही. यामध्ये आता हा प्रशासनाचासुध्दा ढिसाळपणाच म्हणावा लागणार आहे.

रुग्णाच्या नातेवाईंकानाच मृतदेह प्लास्टीकमध्ये पॅक करावा लागला. सिव्हील रुग्णालयात मृतदेह ठेवण्यात आला होता. परंतु रुग्णांच्या नातेवाईकांना 600 रुपये खर्च करुन प्लास्टीक रॅपर विकत घ्यावे लागले आणि तेथील कर्मचा:यांनी तुम्हालाचा मृतेदह पॅक करावा लागेल असे सांगितले. त्यानुसार नातेवाईकांमधील दोघांनी त्यांचा मृतदेह प्लास्टीकमध्ये पॅक केला.

अंत्यविधीसाठी लागले सहा तास ताटकळत

जवाहरबाग स्मशानभुमीतही अंत्यविधी करण्यासाठी जवळ जवळ सहा तासांचा कालावधी गेला. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर जवाहरबाग स्मशानभुमीत नेण्यात आला. परंतु तेथे आधीच वेटींगवर 10 नंबर होते. त्यामुळे तेथे देखील त्यांना जवळ जवळ 6 तास ताटकळत उभे राहावे लागले होते. मागील कित्येक दिवसापासून इतर स्मशानभुमीतही ही व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. परंतु अद्यापही त्याकडे प्रशासनाने काही लक्ष दिलेले नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे