फीवाढीविरोधात पालकांचे उपोषण
By Admin | Updated: May 16, 2017 00:06 IST2017-05-16T00:06:13+5:302017-05-16T00:06:13+5:30
येथील रोटरी स्कूलने सिनिअर केजीच्या प्रवेशासाठी केलेली फीवाढ ही अन्यायकारक असल्याचा आरोप करत या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी

फीवाढीविरोधात पालकांचे उपोषण
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : येथील रोटरी स्कूलने सिनिअर केजीच्या प्रवेशासाठी केलेली फीवाढ ही अन्यायकारक असल्याचा आरोप करत या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या पालकांच्या बाजूने मनसेचे माजी नगरसेवक कुणाल भोईर यांनी पुढाकार घेतला होता.
रोटरी स्कूलच्या समितीने निर्णय घेत सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी १७ हजारांवरून थेट २५ हजार इतकी फी केली. आठ हजारांची ही फीवाढ पालकांना अन्यायकारक वाटल्याने त्यांनी मनसेच्या नेतृत्वाखाली शाळेच्या मुख्याध्यापिकांची भेट घेऊन फी कमी करण्याची मागणी केली. फी कमी न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. शाळा प्रशासनाने यासंदर्भात बैठक घेऊन ही फी २५ हजारांवरून २३ हजारांवर आणली. मात्र, तरीही पालकांचे समाधान न झाल्याने त्यांनी सोमवारपासून विद्यार्थ्यांसह उपोषणाला सुरुवात केली.
उपोषणानंतर पोलिसांनी याप्रश्नी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या वेळी झालेल्या बैठकीतदेखील ही फी २२ हजार करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, तरीदेखील पालकांनी फी आणखी कमी करण्याची मागणी करत आंदोलन सुरूच ठेवले आहे. दुसरीकडे अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील अनेक शाळांनी मनमानी पद्धतीने फी वाढ केलेली आहे. मात्र, त्या शाळेतील पालकांनी अद्याप कोणतीच तक्रार केलेली नाही.
या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जगदाळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, शाळेची फीवाढ ही नियमानुसार करण्यात आलेली आहे. त्यात फेरबदल करण्याचे सर्व अधिकार शाळेच्या संचालकांना
आहे.
फीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी बैठकीचा मार्ग अवलंबणे गरजेचे आहे. सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांना आंदोलनात सामील केल्यास त्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होऊ शकतो. विषय हे चर्चेनेच सुटावे, ही आमची अपेक्षा आहे, असे त्या म्हणाल्या.
शाळेचे संचालक संजय पानसे यांना विचारले असता समितीने यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे. पालकांसोबत आम्ही पुन्हा चर्चा करण्यास तयार आहोत. आंदोलनापेक्षा चर्चेने विषय लवकर सुटतील. शाळेत सुविधा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे फी वाढ करणे गरजेचे होते. सुविधांसाठी फीवाढ केली
शाळेचे संचालक संजय पानसे यांना विचारले असता समितीने यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे. पालकांसोबत आम्ही पुन्हा चर्चा करण्यास तयार आहोत. आंदोलनापेक्षा चर्चेने विषय लवकर सुटतील. शाळेत सुविधा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे फी वाढ करणे गरजेचे होते. अंबरनाथ, बदलापूरमधील अन्य शांळांनीही फीवाढ केल्याने तेथील पालकांनीही संताप व्यक्त केला आहे. अंबरनाथमधील फादर अॅग्नेल, बदलापूरमधील कार्मिल हायस्कूल, डॉन बॉस्को अशा शाळांचा फीवाढीमध्ये समावेश आहे. येथील फीवाढ कमी न झाल्यास पालकांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल असा इशारा दिला आहे.