शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

पालघर: जव्हार तालुक्यात हंडाभर पाणी भरण्यासाठी महिलांची झुंबड, विहिरीवर भांडणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 05:51 IST

सागपाणी व रिठीपाडा गावात दरवर्षीप्रमाणे डिसेंबर अखेरपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र, पाणीपुरवठा विभागाकडून अद्याप टँकर सुरू झालेले नाहीत.

जव्हार : जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात दादरा नगर हवेली व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या वावर वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील सागपाणी व रिठीपाडा गावात हंडाभर पाणी भरण्यासाठी महिलांची झुंबड होताना दिसत आहे. कधीतरी येणाऱ्या एखाद्या टँकरवर महिला चढून पाणी मिळविण्यासाठी धडपडताना दिसतात.

सागपाणी व रिठीपाडा गावात दरवर्षीप्रमाणे डिसेंबर अखेरपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र, पाणीपुरवठा विभागाकडून अद्याप टँकर सुरू झालेले नाहीत. परिणामी, गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण होत आहे. 

विहिरीवर भांडणे

छोट्या पिकअपच्या आकाराचा टँकर सात-आठ दिवसांतून एकदा येतो, तेव्हा हंडाभर पाण्यासाठी महिला विहिरीवर हंड्यांची रांग लावतात. मात्र, हंडाभर पाणीही मिळत नसल्याने महिला  टँकरवर चढतात.  महिलांमध्ये पाण्यावरून भांडणेदेखील होत आहेत. 

गावकऱ्यांत रोष

पाणीटंचाई पाहता वावर वांगणी ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद बुधर व सामाजिक कार्यकर्ता सुनील जाबर यांनी गटविकास अधिकारी दत्तात्रय चित्ते यांना भेटून मोठ्या टँकरची मागणी केली होती. मात्र, अद्याप मोठ्या टँकरने पुरेसा पाणीपुरवठा सुरू झालेला नसल्याने गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला. 

महिना उलटून गेला, पाइप जोडणी झाली नाही

येथील जल जीवन मिशनचे काम अपूर्ण असल्याने संबंधित कंत्राटदाराने १०-१२ दिवसांपूर्वी स्वतःचे टँकर मागवून पाण्याची व्यवस्था करून दिली होती. 

मात्र, प्रशासनाकडून अद्याप टँकर सुविधा दिली जात नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला. काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठा अभियंता राजेश पाध्ये यांच्याशी ग्रामस्थांनी संपर्क केला असता नवीन नळपाणी योजनेचे पाइप जोडणे बाकी आहे. 

चार-पाच दिवसांत ते काम पूर्ण होईल आणि पाणी सुरळीत सुरू होईल, असे सांगितले होते. मात्र, महिना उलटला तरी पाइपजोडणी झालेली नाही.

टॅग्स :palgharपालघरwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूक