शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

रुग्ण बरे होण्यात पालघर जिल्हा अव्वल; ९६.८६ टक्के रिकव्हरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 12:51 AM

ग्रामीण परिसरातील कोरोनाचिंतेचे वातावरण झाले कमी

- हितेन नाईकपालघर : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या बरे होण्याच्या टक्केवारीमध्ये पालघर जिल्हा (९६.८६ टक्के) राज्यात सर्व जिल्ह्यांमधून अव्वल स्थानी राहिला आहे. आरोग्य विभागाने १ डिसेंबर रोजी राज्यातील आजारी रुग्णांचा घेतलेल्या आढाव्यात ही बाब समोर आली आहे. पालघरमधील रुग्ण बरे होण्याचा दर राज्यातील ३५ जिल्ह्यांतून अधिक असल्याचे आढळून आले आहे.पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १४ हजार ९१८ जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी १४ हजार ४६८ रुग्ण बरे झाले आहेत.  जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या १५२  कोरोनाबाधित असून, त्यापैकी डहाणू तालुका २०, जव्हार ६, मोखाडा १, पालघर १०५, तलासरी ६, वसई ग्रामीण १, विक्रमगड २, वाडा ११ रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधित नागरिकांपैकी १०९ नागरिकांनी घरी विलगीकरण करून घेतले गेले. उर्वरित इतर रुग्ण विक्रमगडमधील रिव्हेरा आणि बोईसरमधील टिमा समर्पित कोरोना केंद्रांमध्ये व इतर रुग्णालयांत दाखल करण्यात आलेले आहेत. ग्रामीण भागात २९८ रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनाचा मृत्युदर (सीएफआरनुसार) २.० टक्के आहे. मृत्युदरांमध्ये वसई ग्रामीण भागातील मृत्युदर ३.६ टक्के असून, वाडा, पालघर, डहाणू, मोखाडा येथील मृत्युदर सरासरीच्या जवळपास आहे. रुग्ण बरे होण्याच्या दरामध्ये जव्हार, विक्रमगड, तलासरी आणि वाडा या तालुक्यांमधील कामगिरी समाधानकारक आहे. जिल्ह्यात ४३,५५० नागरिक बाधित संपूर्ण पालघर जिल्ह्यात वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रासह ४३ हजार ५५० नागरिकांना कोरोनाबाधा झालेली असून, त्यापैकी १ हजार १७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर या जीवघेण्या आजारावर ४१ हजार ७०६ रुग्णांनी मात केली आहे.  सध्या ६७१ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उभारलेल्या व्यवस्थेने केलेल्या कामाचे हे फलित असून, नागरिकांनी आवश्यक ती सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे.- डॉ. माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी, पालघर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या