शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इअरफोन वापरणं वैष्णवीच्या जीवावर बेतलं; रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसने चिरडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 16:22 IST

Palghar Train Accident: जळगाव रेल्वे अपघाताची घटना ताजी असतानाच पालघरमधूनही दुःखद बातमी समोर आली आहे. पालघरमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला ...

Palghar Train Accident: जळगाव रेल्वे अपघाताची घटना ताजी असतानाच पालघरमधूनही दुःखद बातमी समोर आली आहे. पालघरमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला एक्सप्रेस ट्रेनने तिला चिरडले. महत्त्वाची बाब म्हणजे या विद्यार्थिनीने कानात इअरफोन घालून ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी, विद्यार्थिनीला येणाऱ्या ट्रेनचा आवाज ऐकू न आल्यामुळे हा अपघात झाला असावा, असं म्हटलं आहे. विद्यार्थिनीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.

गुरुवारी पालघरमध्ये रेल्वे रुळ ओलांडत असताना १६ वर्षीय मुलीचा ट्रेनने धडकून मृत्यू झाला. दुपारी १:१० वाजता सफाळे आणि केळवे रोड रेल्वे स्थानकांदरम्यान ही भीषण घटना घडली. मुलीने हेडफोन घातले होते ज्यामुळे तिला ट्रेन येत असल्याचे ऐकू गेले नाही एक्स्प्रेसने तिला धडक दिली. माकणेजवळ उड्डाणपूल नसल्याने स्थानिकांना धोकादायक पद्धतीने रेल्वे ओलांडावी लागत आहे. अनेक विद्यार्थी आणि इतर प्रवासी रेल्वे ट्रॅक किंवा रस्त्यांवरून जाताना कानात इअरफोन लावतात. त्यांना येणाऱ्या गाड्या किंवा वाहनांचीही जाणीव होत नाही. या घटनेची चौकशी सुरू झाली असून रेल्वे पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.

पालघर जिल्ह्यातील माकणे गावातील वैष्णवी रावल रुळ ओलांडत असताना कोचुवेली-अमृतसर सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनने तिला धडक दिली. या धडकेमुळे तिलागंभीर दुखापत झाली. त्यामुळे वैष्णवीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिला मृत घोषित करण्यात आले. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने इअरफोन लावले असल्याने तिला येणाऱ्या ट्रेनचा आवाज ऐकू आला नसेल आणि हा अपघात घडला. या घटनेनंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आणि अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आग लागल्याच्या अफवेमुळे जळगावजवळ कर्नाटक एक्स्प्रेसने रेल्वे रुळावर थांबलेल्या प्रवाशांना चिरडले. या दुर्घटनेत १३ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. एकूण १३ मृतांपैकी किमान ८ जणांची ओळख पटवण्यात आली आहे. तर कमीत कमी ५९ इतर लोक जखमी झाले, ज्यात १२ जणांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांना व्हेंटिलेशन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. 

टॅग्स :palgharपालघरIndian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघात