शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

"उद्धव ठाकरे खूप चांगली व्यक्ती हे मान्य करतो,पण..."; श्रीनिवास वनगांनी सांगितले घर सोडण्याचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 13:40 IST

दोन दिवसांपासून अज्ञातवासात असलेल्या श्रीनिवास वनगा यांनी अखेर समोर येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Shrinivas Vanga :पालघर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा हे प्रचंड नाराज झाले होते. उद्धव ठाकरे या देवमाणसाची मला आज माफी मागायची आहे. एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द पाळायला पाहीजे होता असं म्हणत श्रीनिवास वनगा घरातून निघून गेले होते. त्यांचे कुटुंबीय आणि पोलीस यंत्रणा रात्रीपासून त्यांचा शोध घेत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही वनगा कुटुंबियांशी फोनवरुन संवाद साधला होता. अखेर दोन दिवसांनी श्रीनिवास वनगा हे घरी परतले आहेत. माझ्या बाबतीत चुकीची माहिती एकनाथ शिंदे यांना दिल्याने माझी उमेदवारी कापल्याचे श्रीनिवास वनगा यांनी म्हटलं आहे.

शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना पालघर विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आली आहे. उमेदवारी न मिळाल्याने श्रीनिवास वनगा आणि त्यांचे कुटुंबीय मानसिक दृष्ट्या प्रचंड अस्वस्थ झाले आहे. श्रीनिवास वनगा हे कोणाला काहीही न सांगता अज्ञात वाहनातून घरातून निघून गेले होते. त्यानंतर दोन दिवसांपासून नॉट रिचेबल होते. त्यानंतर वनगा हे घरी परतले. यावेळी टीव्ही ९ मराठीशी बोलताना वनगा यांनी प्रामाणिकतेचे राजकारणात काम नाही असं म्हटलं आहे.

"मी कुठेही गेलो नव्हतो. मी माझ्या नातेवाईंकडे जवळपास होतो.  दोन दिवस मी घराच्या आसपासच होतो. माझी सहज अपेक्षा होती की पालघर किंवा डहाणू विधानसभेमध्ये उमेदवारी मिळावी. त्यामुळे सहाजिकच नाराज होणारच आणि त्या भावनेतूनच जे काही बोलायचे ते बोललो. मी ठाकरे गटाच्या संपर्कात नव्हतो. फक्त रागाच्या भरात मी नातेवाईकांकडे निघून गेलो होतो," असं स्पष्टीकरण श्रीनिवास वनगा यांनी दिले.

"सध्या माझी कोणतीही भूमिका नाही. मी शंभूराज देसाईंसोबत बोललो आहे. फक्त एवढीच अपेक्षा होती की माझं तिकीट कापण्यासाठी ज्यांनी षडयंत्र त्यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कारवाई करतील. एकनाथ शिंदे जे सांगतील ते काम मी करेल. हे बळी घेणारे जिल्हाप्रमुख कुंदन संखे, राजेंद्र गावीत आहेत. त्यांच्यावर एकनाथ शिंदे कारवाई करतील याची मला खात्री आहे. प्रामाणिकतेचे राजकारणात काम नाही. त्यामुळे कदाचित मी पुढचा विचार मी करेन. माझ्या कुटुंबासाठी मला जगायचं आहे, असं श्रीनिवास वनगा म्हणाले.

"माझा घात एकनाथ शिंदे यांनी नाही तर त्यांना चुकीची माहिती देणाऱ्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी केला. त्यांनी माझ्याबद्दल चुकीचा माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. आजपर्यंत आमचं घराणं महायुतीमध्ये आहे. त्यामुळे आम्ही अजूनही कोणत्याही पक्षाचे काम करु शकत नाही. भाजप आणि शिवसेनेशिवाय मी कोणाचे काम करणार नाही," असं स्पष्टीकरण वनगा यांनी दिलं.

"आतातरी माझी उद्धव ठाकरेंना भेटण्याची इच्छा नाही. उद्धव ठाकरे हे खूप चांगले व्यक्ती आहेत हे मान्य करतो. पण सध्या मी त्यांच्याकडे जाण्याच्या मानसिकतेमध्ये नाही. एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय चुकला नव्हता. कारण अडीच वर्षांमध्ये काहीच काम होत नव्हतं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी १२०० कोटींचा निधी मतदारसंघात आणला आहे," असंही श्रीनिवास वनगा यांनी म्हटलं. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४palghar-acपालघरEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे