शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

पाडव्याला १५ हजार किलो श्रीखंड

By admin | Updated: March 25, 2017 01:21 IST

गुढीपाडवा आणि श्रीखंडाचे नाते अतूट आहे आणि यंदाच्या पाडव्याला ठाणेकर ते चक्क्याइतके घट्ट करतील, अशी स्थिती आहे.

ठाणे : गुढीपाडवा आणि श्रीखंडाचे नाते अतूट आहे आणि यंदाच्या पाडव्याला ठाणेकर ते चक्क्याइतके घट्ट करतील, अशी स्थिती आहे. यंदा आतापर्यंत नोंदवलेली मागणी पाहता जवळपास १२ हजार ते १५ हजार किलो श्रीखंड फस्त होईल, अशी स्थिती आहे.शिवाय घराघरात तयार होणाऱ्या मलईदार श्रीखंडासाठी साधारण सात हजार किलो चक्क्याची मागणी नोंदवली गेल्याचे विविध प्रथितयश विकेत्यांनी सांगितले. दिवाळीला जशी फराळाच्या पदार्थांसोबत मिठाईची मोठ्या प्रमाणात खरेदी होते, तसेच गुढीपाडव्याला श्रीखंडाच्या खरेदीला उधाण येते. या दिवशी ग्राहकांना वेगवेगळ्या चवींचे श्रीखंड उपलब्ध करून देण्यासाठी विक्रेत्यांत चढाओढ लागते. एरव्ही दुकानात गेले की श्रीखंड, आम्रखंड हे दोन प्रकार उपलब्ध असतात. पूर्वी फक्त चारोळ््या घातलेले श्रीखंड मिळत असे. आता फळांपासून सुक्यामेव्यापर्यंत अनेक पदार्थांचा त्यात समावेश असतो. त्याचेही फ्यूजन केलेले असते. त्यामुळे श्रीखंड हा पदार्थही पारंपरिक उरलेला नाही.पाडव्याशी जोडले गेलेले श्रीखंडाचे नाते पाहता, मागणीचा विचार करता त्यात भरपूर प्रयोग केलेले पाहायला, चाखायला मिळतात. केशर आणि वेलचीयुक्त श्रीखंड (साधारण २८० रु. किलो), फ्रेशफ्रुट श्रीखंड, ड्रायफ्रुट श्रीखंड, स्ट्रॉबेरी, मिरची, रासबेरी, चिकू, संत्री, मोसंबी असे प्रकार पाडव्यानिमित्त चोखंदळ ग्राहकांची पसंती मिळवतात. श्रीखंडात विविध प्रकार असले तरी केशरी श्रीखंड आणि आम्रखंडाला सर्वाधिक मागणी असते. पोटभर श्रीखंड खाणारे या दोन प्रकारांना पसंती देतात, तर इतर प्रकारांच्या श्रीखंडांची चवीपुरती खरेदी होत असल्याचे विक्रेते संजय पुराणिक यांनी सांगितले. इतर प्रकारांचे श्रीखंड पाव किलो खरेदी केले जात असेल, तर केशरयुक्त आणि आम्रखंड यांची खरेदी किलो किलोत होते. ग्राहकांना चवीत बदल हवा असल्याचे मत टीप टॉपचे रोहितभाई शहा यांनीही मांडले.रेडीमेड श्रीखंडाबरोबरच घरी श्रीखंड बनवण्यासाठी चक्का खरेदीची परंपराही कायम आहे. यंदा पाडव्यानिमित्त सात हजार किलो चक्क्याची खरेदी होणार आहे. पूर्वी चक्का खरेदी भरपूर प्रमाणात होत असे. पण आता वेळ नसल्याने थेट श्रीखंड खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. श्रीखंडाच्या खरेदीला आदल्या दिवशीपासून सुरूवात होते, ती थेट पाडव्याच्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत म्हणजे पंगती बसेपर्यंत सुरू असते, असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. (प्रतिनिधी)