शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

मुरबाडच्या गावांची टंचाईवर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 00:30 IST

उपलब्ध जलसाठ्यांचे सुयोग्य व्यवस्थापन केले, तर पाणीटंचाई कशी दूर होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण मुरबाडमधील काही गावांकडे बघितल्यास येते.

ठाणे/मुरबाड : उपलब्ध जलसाठ्यांचे सुयोग्य व्यवस्थापन केले, तर पाणीटंचाई कशी दूर होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण मुरबाडमधील काही गावांकडे बघितल्यास येते. सध्या मे महिन्याच्या अखेरीस तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई असताना सोनगाव, सोनवळे भागांतील ओढे, नाले आणि विहिरींना मुबलक पाणी आहे. तीन वर्षांपूर्वी ठाण्यातील रोटरी समूहाने गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यावर काँक्रि टचा बंधारा बांधला आणि गावांचे भाग्यच बदलले. या बंधाºयामुळे एरव्ही फेब्रुवारी-मार्चमध्ये आटणाºया गावाबाहेरील ओढ्यात आता मे महिन्याच्या अखेरीसही ओसंडून वाहण्याइतका पाणीसाठा आहे. वाहते पाणी अडल्यामुळे भूजलसाठा वाढून गावातील विहिरीत बारमाही पाणी टिकू लागल्यामुळे महिलांची पाण्यासाठीची वणवण बंद झाली.पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडत असला, तरी फेब्रुवारी महिन्यानंतर ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. कारण, पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारे ओढे, नाले फेब्रुवारीपर्यंत आटतात. ठिकठिकाणी काँक्रिटचे बंधारे बांधून ते पाणी अडवले तर जवळच्या वस्तीला त्याचा उपयोग होऊ शकतो, हे जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिसून आले आहे. रोटरीच्या वतीने ठाणे-पालघर जिल्ह्यात ४०० अधिक काँक्रि टचे बंधारे बांधले. त्यापैकी ५४ बंधारे मुरबाड तालुक्यात असल्याची माहिती जलतज्ज्ञ हेमंत जगताप यांनी दिली. ग्रामीण भागात सुलभपणे पाणी उपलब्ध होण्यासाठी छोटे बंधारे उपयुक्त ठरत असल्याचे गेल्या १० वर्षांच्या अनुभवावरून दिसून आले आहे. बंधाऱ्यांमुळे शेतकºयांना दुबार पीक घेता येते. त्यामुळे पावसाळ्यानंतर उदरनिर्वाहासाठी शहरात स्थलांतर करावे लागत नाही. भूजलपातळी वाढून गावातील विहिरीतून अधिक काळ पाणी मिळते. गावकºयांनी श्रमदान करून दर तीन वर्षांनी बंधाºयातील गाळ काढल्यामुळे मुबलक पाणी मिळू शकते, अशी माहितीही त्यांनी दिली.>भेंडीचा शेतकºयांना आधारया भागातील शेतकरी पावसाळ्यानंतर पाण्याअभावी त्यांच्या जमिनीत कोणतेही पीक घेऊ शकत नव्हते. मात्र, आता या बंधाºयामुळे ओढ्यानाल्यांमध्ये फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यापर्यंत पाणी उपलब्ध असल्याने ग्रामस्थ कडधान्य तसेच भाजीपाला लागवड करू लागले आहेत. सोनगाव, सोनवळे परिसरातील अनेक शेतकरी पावसाळ्यानंतर सेंद्रिय पद्धतीने भेंडीलागवड करू लागले आहेत. सेंद्रिय भेंडीला बाजारात चांगली मागणी असते. नवी मुंबईतील व्यापारी गावात येऊन ही भेंडी घेऊन जातात. नुकत्याच संपलेल्या हंगामात या पंचक्र ोशीतील शेतकºयांनी सुमारे दोन कोटी रुपयांची भेंडी विकली. या पिकाने शेतकºयांना एका हंगामात एकरी एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले.>जलवाहिन्यांद्वारे पाणी : सोनगावात कूपनलिकेला चांगले पाणी आहे. त्याद्वारे गावातील पाच घरांमध्ये जलवाहिन्या टाकून नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. दिवसातील ठरावीक वेळी हे पाणी घरांना उपलब्ध करून दिले जाते. अशा प्रकारे आणखी कूपनलिका खोदून गावातील अन्य घरांमध्येही नळपाणीयोजना राबवण्यात येणार असल्याची माहिती रमेश भोईर यांनी दिली.