शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मुरबाडच्या गावांची टंचाईवर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 00:30 IST

उपलब्ध जलसाठ्यांचे सुयोग्य व्यवस्थापन केले, तर पाणीटंचाई कशी दूर होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण मुरबाडमधील काही गावांकडे बघितल्यास येते.

ठाणे/मुरबाड : उपलब्ध जलसाठ्यांचे सुयोग्य व्यवस्थापन केले, तर पाणीटंचाई कशी दूर होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण मुरबाडमधील काही गावांकडे बघितल्यास येते. सध्या मे महिन्याच्या अखेरीस तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई असताना सोनगाव, सोनवळे भागांतील ओढे, नाले आणि विहिरींना मुबलक पाणी आहे. तीन वर्षांपूर्वी ठाण्यातील रोटरी समूहाने गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यावर काँक्रि टचा बंधारा बांधला आणि गावांचे भाग्यच बदलले. या बंधाºयामुळे एरव्ही फेब्रुवारी-मार्चमध्ये आटणाºया गावाबाहेरील ओढ्यात आता मे महिन्याच्या अखेरीसही ओसंडून वाहण्याइतका पाणीसाठा आहे. वाहते पाणी अडल्यामुळे भूजलसाठा वाढून गावातील विहिरीत बारमाही पाणी टिकू लागल्यामुळे महिलांची पाण्यासाठीची वणवण बंद झाली.पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडत असला, तरी फेब्रुवारी महिन्यानंतर ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. कारण, पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारे ओढे, नाले फेब्रुवारीपर्यंत आटतात. ठिकठिकाणी काँक्रिटचे बंधारे बांधून ते पाणी अडवले तर जवळच्या वस्तीला त्याचा उपयोग होऊ शकतो, हे जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिसून आले आहे. रोटरीच्या वतीने ठाणे-पालघर जिल्ह्यात ४०० अधिक काँक्रि टचे बंधारे बांधले. त्यापैकी ५४ बंधारे मुरबाड तालुक्यात असल्याची माहिती जलतज्ज्ञ हेमंत जगताप यांनी दिली. ग्रामीण भागात सुलभपणे पाणी उपलब्ध होण्यासाठी छोटे बंधारे उपयुक्त ठरत असल्याचे गेल्या १० वर्षांच्या अनुभवावरून दिसून आले आहे. बंधाऱ्यांमुळे शेतकºयांना दुबार पीक घेता येते. त्यामुळे पावसाळ्यानंतर उदरनिर्वाहासाठी शहरात स्थलांतर करावे लागत नाही. भूजलपातळी वाढून गावातील विहिरीतून अधिक काळ पाणी मिळते. गावकºयांनी श्रमदान करून दर तीन वर्षांनी बंधाºयातील गाळ काढल्यामुळे मुबलक पाणी मिळू शकते, अशी माहितीही त्यांनी दिली.>भेंडीचा शेतकºयांना आधारया भागातील शेतकरी पावसाळ्यानंतर पाण्याअभावी त्यांच्या जमिनीत कोणतेही पीक घेऊ शकत नव्हते. मात्र, आता या बंधाºयामुळे ओढ्यानाल्यांमध्ये फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यापर्यंत पाणी उपलब्ध असल्याने ग्रामस्थ कडधान्य तसेच भाजीपाला लागवड करू लागले आहेत. सोनगाव, सोनवळे परिसरातील अनेक शेतकरी पावसाळ्यानंतर सेंद्रिय पद्धतीने भेंडीलागवड करू लागले आहेत. सेंद्रिय भेंडीला बाजारात चांगली मागणी असते. नवी मुंबईतील व्यापारी गावात येऊन ही भेंडी घेऊन जातात. नुकत्याच संपलेल्या हंगामात या पंचक्र ोशीतील शेतकºयांनी सुमारे दोन कोटी रुपयांची भेंडी विकली. या पिकाने शेतकºयांना एका हंगामात एकरी एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले.>जलवाहिन्यांद्वारे पाणी : सोनगावात कूपनलिकेला चांगले पाणी आहे. त्याद्वारे गावातील पाच घरांमध्ये जलवाहिन्या टाकून नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. दिवसातील ठरावीक वेळी हे पाणी घरांना उपलब्ध करून दिले जाते. अशा प्रकारे आणखी कूपनलिका खोदून गावातील अन्य घरांमध्येही नळपाणीयोजना राबवण्यात येणार असल्याची माहिती रमेश भोईर यांनी दिली.