शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दुष्काळमुक्तीसाठी आमचाही खारीचा वाटा, ठाणे जिल्ह्यातील तरुणांचे श्रमदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 01:05 IST

राज्यावरील दुष्काळाचे सावट केवळ सरकारी यंत्रणांवर अवलंबून दूर होणार नाही. तर, त्याला समाजाची साथ लाभल्यास लोकचळवळीच्या माध्यमातून या संकटावर मात करता येऊ शकते.

- जान्हवी मोर्येडोंबिवली  - राज्यावरील दुष्काळाचे सावट केवळ सरकारी यंत्रणांवर अवलंबून दूर होणार नाही. तर, त्याला समाजाची साथ लाभल्यास लोकचळवळीच्या माध्यमातून या संकटावर मात करता येऊ शकते. त्याच उद्देशाने पाणी फाउंडेशनचे महाराष्टÑात काम सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील तरुणांनी ‘आर्यन ग्रुप’ या नावाने महाराष्टÑ दिनी फाउंडेशनच्या उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील खांडवी गावात श्रमदान करून ओढ्यामध्ये दोन बंधारे बांधून दुष्काळमुक्तीसाठी खारीचा वाटा उचलला. नोकरी सांभाळून हे तरुण ही सामाजिक बांधीलकी जपत आहेत.महाराष्टÑाची अनेक गावे दरवर्षीच दुष्काळाचे चटके सोसत आहेत. पाण्यावाचून होणारी त्यांची होरपळ दूर करण्यासाठी पाणी फाउंडेशनने लोकचळवळ उभी केली. तीन वर्षांपासून हा तरुणांचा गु्रप ‘आॅक्सिजन + पाणी’ हा उपक्रम राबवत आहे. काही गावांत त्यांना ग्रामस्थांकडून फारसे सहकार्य न मिळाल्याचा अनुभवही आला. मात्र, तरीही त्या-त्या गावातील तरुणांना घेऊ न ते हे काम करत आहेत.या वर्षी या ग्रुपने खांडवी गावाची निवड केली. त्यासाठी ३० एप्रिलला ही तरुण मंडळी लातूर एक्स्प्रेसने सोलापूर जिल्ह्यातील बारशी तालुक्यातील या गावात पोहचली. १ मे रोजी खांडवी गावात चहा-नास्ता करून ६.३० वाजता गावातील नियोजित जलसंधारण कामाकडे ही टीम वळली. तीन तास श्रमदान करून गावातील ओढ्यात या ग्रुपने दोन बंधारे बांधण्यास मदत केली. या कामात गावातील महिलांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. दैनंदिन कामाशी सांगड घालणारी गाणी गात त्या जलसंधारणाचे काम करत होत्या. त्यामुळे इतरांनाही कामाचा हुरूप येत होता. श्रमदानाच्या ठिकाणी नाश्ता झाल्यानंतर आर्यन ग्रुप या कामाला शुभेच्छा देत पुढच्या प्रवासाला निघाला. त्यानंतर या ग्रुपने गोडसेवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली. शाळेतील मुलांनी गाणी व नृत्य सादर करून मनोरंजन केले. या मुलांना दप्तराचे वाटप, तसेच शाळेला क्रीडा साहित्य, प्रथमोपचार पेटी आणि चांगल्या सवयींचा तक्ता देण्यात आला.नोकरी सांभाळून सामाजिक बांधिलकीकल्याण, डोेंबिवली, बदलापूर येथील तरुणांनी एकत्र येऊन आर्यन गु्रप तयार केला आहे. चार ते पाच सदस्यांसह सुरुवात झालेल्या ग्रुपच्या सदस्यांची संख्या ३० वर पोहचली आहे. अनेक सदस्य हे नोकरी करतात. त्यामुळे सुटीचा प्रश्न असल्याने त्यांना पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात फार योगदान देता येत नाही. त्यामुळे १ मे रोजी आम्ही त्यात सहभागी होतो आणि गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी खारीचा वाटा उचलत असल्याचे ग्रुपचे सदस्य गेणू कांबळे यांनी सांगितले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीsocial workerसमाजसेवक