शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
2
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
3
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
4
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
5
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
6
दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
7
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
8
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
9
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
10
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
11
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
12
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
13
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
14
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
15
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
16
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
17
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
18
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
19
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
20
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळमुक्तीसाठी आमचाही खारीचा वाटा, ठाणे जिल्ह्यातील तरुणांचे श्रमदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 01:05 IST

राज्यावरील दुष्काळाचे सावट केवळ सरकारी यंत्रणांवर अवलंबून दूर होणार नाही. तर, त्याला समाजाची साथ लाभल्यास लोकचळवळीच्या माध्यमातून या संकटावर मात करता येऊ शकते.

- जान्हवी मोर्येडोंबिवली  - राज्यावरील दुष्काळाचे सावट केवळ सरकारी यंत्रणांवर अवलंबून दूर होणार नाही. तर, त्याला समाजाची साथ लाभल्यास लोकचळवळीच्या माध्यमातून या संकटावर मात करता येऊ शकते. त्याच उद्देशाने पाणी फाउंडेशनचे महाराष्टÑात काम सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील तरुणांनी ‘आर्यन ग्रुप’ या नावाने महाराष्टÑ दिनी फाउंडेशनच्या उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील खांडवी गावात श्रमदान करून ओढ्यामध्ये दोन बंधारे बांधून दुष्काळमुक्तीसाठी खारीचा वाटा उचलला. नोकरी सांभाळून हे तरुण ही सामाजिक बांधीलकी जपत आहेत.महाराष्टÑाची अनेक गावे दरवर्षीच दुष्काळाचे चटके सोसत आहेत. पाण्यावाचून होणारी त्यांची होरपळ दूर करण्यासाठी पाणी फाउंडेशनने लोकचळवळ उभी केली. तीन वर्षांपासून हा तरुणांचा गु्रप ‘आॅक्सिजन + पाणी’ हा उपक्रम राबवत आहे. काही गावांत त्यांना ग्रामस्थांकडून फारसे सहकार्य न मिळाल्याचा अनुभवही आला. मात्र, तरीही त्या-त्या गावातील तरुणांना घेऊ न ते हे काम करत आहेत.या वर्षी या ग्रुपने खांडवी गावाची निवड केली. त्यासाठी ३० एप्रिलला ही तरुण मंडळी लातूर एक्स्प्रेसने सोलापूर जिल्ह्यातील बारशी तालुक्यातील या गावात पोहचली. १ मे रोजी खांडवी गावात चहा-नास्ता करून ६.३० वाजता गावातील नियोजित जलसंधारण कामाकडे ही टीम वळली. तीन तास श्रमदान करून गावातील ओढ्यात या ग्रुपने दोन बंधारे बांधण्यास मदत केली. या कामात गावातील महिलांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. दैनंदिन कामाशी सांगड घालणारी गाणी गात त्या जलसंधारणाचे काम करत होत्या. त्यामुळे इतरांनाही कामाचा हुरूप येत होता. श्रमदानाच्या ठिकाणी नाश्ता झाल्यानंतर आर्यन ग्रुप या कामाला शुभेच्छा देत पुढच्या प्रवासाला निघाला. त्यानंतर या ग्रुपने गोडसेवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली. शाळेतील मुलांनी गाणी व नृत्य सादर करून मनोरंजन केले. या मुलांना दप्तराचे वाटप, तसेच शाळेला क्रीडा साहित्य, प्रथमोपचार पेटी आणि चांगल्या सवयींचा तक्ता देण्यात आला.नोकरी सांभाळून सामाजिक बांधिलकीकल्याण, डोेंबिवली, बदलापूर येथील तरुणांनी एकत्र येऊन आर्यन गु्रप तयार केला आहे. चार ते पाच सदस्यांसह सुरुवात झालेल्या ग्रुपच्या सदस्यांची संख्या ३० वर पोहचली आहे. अनेक सदस्य हे नोकरी करतात. त्यामुळे सुटीचा प्रश्न असल्याने त्यांना पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात फार योगदान देता येत नाही. त्यामुळे १ मे रोजी आम्ही त्यात सहभागी होतो आणि गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी खारीचा वाटा उचलत असल्याचे ग्रुपचे सदस्य गेणू कांबळे यांनी सांगितले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीsocial workerसमाजसेवक