शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

...अन्यथा महापालिकेच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन; शहर कॉंग्रेसचा इशारा

By अजित मांडके | Updated: June 1, 2023 15:53 IST

येत्या १० दिवसात या समस्या सोडविण्यात याव्यात अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरुन पाहणी दौरा करुन पालिकेचे पितळ उघडे पाडू आणि महापालिकेच्या विरोधात हल्ला बोल आंदोलन करु असा इशाराही त्यांनी यावेळी दिला

ठाणे : ठाणे महापालिकेने शहरातील विविध कामांबाबत ३१ मे ची डेड लाईन दिली होती. मात्र महापालिकेकडून दिशाभुल करणारी माहिती दिली जात असल्याचा आरोप ठाणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. येत्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असतांना नाले सफाईची कामे ५० टक्केच झाले असून सार्वजनिक शौचालयांची अवस्था दयनीय आहे. तर रस्त्यांची कामे देखील अर्धवट आहेत. गटार, पायवाटांची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ठाणेकरांचे हाल होणार असल्याचा दावाही त्यांनी केला. परंतु यावर तोडगा निघाला नाही तर पुढील आठवड्यात महापालिकेवर हल्ला बोल आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

शहर कॉंग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन शिंदे आणि राहुल पिंगळे हे देखील उपस्थित होते. यावेळी चव्हाण यांनी शहरातील विविध प्रभागातील नालेसफाई आणि शौचालयांची कशी अवस्था आहे, याचे फोटोद्वारे पुरावेच सादर करुन एक प्रकारे महापालिकेने आव्हान दिले आहे. येत्या काही दिवसात पावसाळा सुरु होणार आहे. परंतु शहरात सुरु असलेली रस्त्यांची कामे अवघी ५० टक्के झाली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आयुक्त ३१ मे पूूर्वी कामे पूर्ण करणार असल्याचा दावा केला होता. परंतु त्यांचा दावा फोल ठरला असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे आहे ती कामे थांबून रस्ते सुस्थितीत कसे राहितील याचा विचार पालिकेने करावा असेही त्यांनी सांगितले. नाले सफाईची कामे पूर्ण करावीत, शौचालयांची अवस्था दयनीय असून कुठे दरवाजे नाहीत, कडी कोयंडा नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे जो निधी आणलेला आहे, तो शौचालये, गटार पायवाटांकडे वळवावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

येत्या १० दिवसात या समस्या सोडविण्यात याव्यात अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरुन पाहणी दौरा करुन पालिकेचे पितळ उघडे पाडू आणि महापालिकेच्या विरोधात हल्ला बोल आंदोलन करु असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. महापालिका आयुक्तांनी रामदास पाध्येंचा बोलका बाहुला होऊ नये अशी विनंती देखील चव्हाण यांनी केली. अनाधिकृत बांधकामांवर कितीही शेरे मारले तरी देखील शहरात ही बांधकामे आजही सुरुच असल्याचा आरोपही त्यांनी केला. सर्वांची कामे आयुक्तांनी करावीत, सत्ताधाºयांची कामे अधिक करीत असतांना जनतेची कामे देखील करावीत अशी सुचनाही त्यांनी केली. रोगराई बाबत उपाय योजना करण्यात याव्यात अशी मागणही त्यांनी केली.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाcongressकाँग्रेस