शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

माहिती नष्ट केल्याने फेर मोजणीसाठी दुसरीच यंत्रे; आमदार जितेंद्र आव्हाड यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 07:46 IST

निवडणूक विभागाकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही आणि जुन्याच यंत्रणा आहेत. आपली मतदार यादी योग्य नसते.

ठाणे : फेर मतमोजणीसाठी महाविकास आघाडीच्या बहुतेक उमेदवारांनी निवडणूक विभागाकडे पैसे भरले आहेत. मात्र मतदान यंत्रातील माहितीच नष्ट केल्याने यंत्रात काहीच बिघाड नव्हता, हे दाखवण्यास दुसरी यंत्रे दाखवली जाणार असल्याचा दावा शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी केला.

आव्हाड म्हणाले की, ज्या यंत्रात मतदान झाले, ती दाखवणार नसतील आणि त्याजागी दुसरी यंत्रे दाखवणार असतील, तर फेरमतमोजणीचा उपयोग काय आहे. ज्या मतदान यंत्रात मतदान झाले, त्यातील मतदानाची माहिती नष्ट केली आहे. २०१९ ते २०२४ या कालावधीत पाच लाख नवीन मतदार नोंदणी झाली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत ४६ लाख नवीन मतदान झाले. निवडणूक विभागाकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही आणि जुन्याच यंत्रणा आहेत. आपली मतदार यादी योग्य नसते. त्यातील दुबार मतदारांबाबत तक्रारी करूनही ती वगळली जात नाहीत. पाच वर्षांत पाच लाख मतदार वाढले असताना, सहा महिन्यात ४६ लाख मतदार वाढले कसे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

n पक्षाच्या प्रतिनिधींसमोर मतयंत्रे बंद केली जातात. तेव्हाच मतांची आकडेवारी निवडणूक विभागाला प्राप्त होते. परंतु दुसऱ्या दिवसांपर्यंत निवडणूक विभागाच्या आकडेवारीत वाढ होते कशी, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला.

n यात निवडणूक विभागाचा सहभाग आहे. निवडणूक विभागाने या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत. कारण, ही उत्तरे मिळणे हा आमचा अधिकार आहे.

n असेच सुरू राहिले तर भारत हा लोकशाही देश होता, हे इतिहासात लिहिण्याची वेळ येईल, असेही ते म्हणाले. त्यामुळे हा सगळा घोटाळा असून त्याच्या शेवटपर्यंत जाऊन शोध घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.

आव्हाड यांचे परांजपे यांना प्रति आव्हान

मतदान यंत्र हॅक होत असेल, तर जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुकीला सामोरे जावे, असे खुले आव्हान अजित पवार गटाचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिले होते. त्यावर सरकारला बॅलेटवर निवडणूक घेण्यास सांगाच, राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढून एक लाख मताधिक्याने जिंकेल, असे प्रत्युत्तर आव्हाड यांनी शनिवारी दिले.

 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेस