शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

माहिती नष्ट केल्याने फेर मोजणीसाठी दुसरीच यंत्रे; आमदार जितेंद्र आव्हाड यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 07:46 IST

निवडणूक विभागाकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही आणि जुन्याच यंत्रणा आहेत. आपली मतदार यादी योग्य नसते.

ठाणे : फेर मतमोजणीसाठी महाविकास आघाडीच्या बहुतेक उमेदवारांनी निवडणूक विभागाकडे पैसे भरले आहेत. मात्र मतदान यंत्रातील माहितीच नष्ट केल्याने यंत्रात काहीच बिघाड नव्हता, हे दाखवण्यास दुसरी यंत्रे दाखवली जाणार असल्याचा दावा शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी केला.

आव्हाड म्हणाले की, ज्या यंत्रात मतदान झाले, ती दाखवणार नसतील आणि त्याजागी दुसरी यंत्रे दाखवणार असतील, तर फेरमतमोजणीचा उपयोग काय आहे. ज्या मतदान यंत्रात मतदान झाले, त्यातील मतदानाची माहिती नष्ट केली आहे. २०१९ ते २०२४ या कालावधीत पाच लाख नवीन मतदार नोंदणी झाली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत ४६ लाख नवीन मतदान झाले. निवडणूक विभागाकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही आणि जुन्याच यंत्रणा आहेत. आपली मतदार यादी योग्य नसते. त्यातील दुबार मतदारांबाबत तक्रारी करूनही ती वगळली जात नाहीत. पाच वर्षांत पाच लाख मतदार वाढले असताना, सहा महिन्यात ४६ लाख मतदार वाढले कसे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

n पक्षाच्या प्रतिनिधींसमोर मतयंत्रे बंद केली जातात. तेव्हाच मतांची आकडेवारी निवडणूक विभागाला प्राप्त होते. परंतु दुसऱ्या दिवसांपर्यंत निवडणूक विभागाच्या आकडेवारीत वाढ होते कशी, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला.

n यात निवडणूक विभागाचा सहभाग आहे. निवडणूक विभागाने या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत. कारण, ही उत्तरे मिळणे हा आमचा अधिकार आहे.

n असेच सुरू राहिले तर भारत हा लोकशाही देश होता, हे इतिहासात लिहिण्याची वेळ येईल, असेही ते म्हणाले. त्यामुळे हा सगळा घोटाळा असून त्याच्या शेवटपर्यंत जाऊन शोध घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.

आव्हाड यांचे परांजपे यांना प्रति आव्हान

मतदान यंत्र हॅक होत असेल, तर जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुकीला सामोरे जावे, असे खुले आव्हान अजित पवार गटाचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिले होते. त्यावर सरकारला बॅलेटवर निवडणूक घेण्यास सांगाच, राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढून एक लाख मताधिक्याने जिंकेल, असे प्रत्युत्तर आव्हाड यांनी शनिवारी दिले.

 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेस