शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बेकायदा बांधकामे वाचवण्यासाठी लपाछपीचा खेळ, भार्इंदर पालिकेचा कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 04:21 IST

मीरा-भार्इंदरमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बेकायदा बांधकामांवर कारवाई टाळण्यासाठी नगररचना विभाग आणि प्रभाग अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.

मीरा रोड - मीरा-भार्इंदरमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बेकायदा बांधकामांवर कारवाई टाळण्यासाठी नगररचना विभाग आणि प्रभाग अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. नगररचना विभाग बांधकाम अनधिकृत वा अधिकृत असल्याचे स्पष्ट करत नाही. तर, प्रभाग अधिकारीही नगररचना विभागाचा अहवाल आल्यावर कारवाई करू, असे पालूपद लावत आहेत. बेकायदा बांधकामांना संरक्षण देण्यासाठी पाठशिवणीचा खेळ चालवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने या खेळात पालिकेच्या वरिष्ठ अधिकाºयांपासून काही बडे लोकप्रतिनिधीही सहभागी असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.बेकायदा बांधकामांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आयुक्त, अतिक्रमण विभाग, प्रभाग अधिकारी व नगररचना विभागाकडे होत असतात. स्थानिक लोकप्रतिनिधी, वजनदार नेत्यांपासून अधिकाºयांचा आशीर्वाद असल्याने तक्रारी होऊनही ठोस कारवाई होत नाही. तक्रारदार जास्तच पाठपुरावा करू लागला की, प्रभाग अधिकारी मग नगररचना विभागाला पत्र पाठवून माहिती विचारतात. पण, नगररचना विभाग बेकायदा बांधकामाच्या कारवाईची बाब आपल्या अखत्यारित नसल्याचे उगाळून चोथा झालेले उत्तर अतिक्रमण विभागास टोलवतात. प्रभाग अधिकारीही नगररचनेकडून माहिती आली नसल्याचे पालूपद लावतात.वास्तविक, नगररचना विभागाने माहिती देताना तक्रारीत नमूद बांधकाम अधिकृत की अनधिकृत आहे, याचा स्पष्ट अभिप्राय दिला पाहिजे. पण, तसे होत नाही. तर, प्रभाग अधिकाºयासही बांधकामधारकास नोटीस बजावणे, कागदपत्रे मागवणे, सुनावणी घेऊन निर्णय देणे, कारवाई करण्याचे अधिकार असूनही बेकायदा बांधकाम वाचवण्यासाठी नगररचना विभागाकडे बोट दाखवले जाते.वरिष्ठांकडूनही प्रभाग अधिकारी आणि नगररचना अधिकाºयांना पाठीशी घातले जाते. बेकायदा बांधकामांमध्ये आर्थिक उलाढाल होत असल्यानेच लोकप्रतिनिधींपासून अधिकारी ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गुप्ता यांनी केला आहे.काशिमीरा येथील अग्रवाल ग्रीन व्हिलेज वसाहतीमध्ये आठ बेकायदा गाळे बांधण्यात आल्याची तक्रार आॅक्टोबरपासून चार वेळा सरकारपर्यंत केली गेली. पण, प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे यांनी नगररचना विभागाचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल, अशी उत्तरे दिली. तक्रारदाराने पाठपुरावा केल्यावर बोरसे यांनी पाच महिन्यांनी म्हणजे २७ फेब्रुवारीला नोटीस बजावण्याचे काम प्रस्तावित असल्याचे लेखी उत्तरदिले. नगररचनाकार हेमंत ठाकूर यांनीही आपली जबाबदारी नसल्याचे सांगत तक्रार अर्ज अतिक्रमण विभागाकडे ढकलून दिला. सामान्य नागरिकांसाठी तर पालिका कार्यालये आणि त्यातील अधिकारी छळछावणीपेक्षा वेगळे नाहीत, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.नगररचना विभागास तक्रारीनुसार स्वयंस्पष्ट अभिप्राय देण्याची तसेच प्रभाग अधिकाºयाची बेकायदा बांधकामांवर वेळीच कारवाईची जबाबदारी आहे. याचा आढावा घेऊन अधिक मनुष्यबळ दिले जाईल. बेकायदा बांधकामे तोडण्याची कारवाई केली जाईल. - सुनील लहाने, अतिरिक्त आयुक्त

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक