शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
2
CAA, आरक्षण अन् राम मंदिराचा निर्णय..; PM नरेंद्र मोदींनी दिल्या 5 गॅरंटी
3
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
4
"रायबरेलीत कमळ फुलवा, ४०० चा आकडा आपोआप पार होईल", काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अमित शाहांचा हल्लाबोल
5
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
6
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
7
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
8
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
9
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
10
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
11
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
12
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
13
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
14
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
15
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
16
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
17
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
18
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
19
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
20
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला

स्वच्छता सर्व्हेक्षणात वरचा क्रमांक गाठण्यासाठी पालिकेला ४ हजारांचा फिडबॅक आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 6:51 PM

मीरा-भार्इंदर महापालिकेत येत्या २२ जानेवारीला स्वच्छता सर्व्हेक्षण पार पडणार असुन त्याच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक येणार आहे.

- राजू काळेभार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेत येत्या २२ जानेवारीला स्वच्छता सर्व्हेक्षण पार पडणार असुन त्याच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक येणार आहे. या सर्व्हेक्षणात पालिकेला अव्वल क्रमांक प्राप्त करण्यासाठी ४ हजार लोकांकडून स्वच्छता मोबाईल अ‍ॅपद्वारे फिडबॅक मिळण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येत असून त्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यास शहरात स्वच्छता नांदेल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.पालिकेने यंदाच्या स्वच्छता सर्व्हेक्षणात अव्वल क्रमांत प्राप्त करण्यासाठी कंबर कसली असली तरी त्याला राजकीय इच्छाशक्तींच्या अभावामुळे नागरिकांकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचा दावा केला जात आहे. पालिकेकडून लोकप्रतिनिधींचे प्रबोधन करण्यासाठी अनेकदा कार्यशाळेचे आयोजन केले. मात्र त्याला पुरेसा प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. ११ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरसावे उड्डाणपुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमात सर्व उपस्थितांना पालिकेच्या स्वच्छता मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच अप्रत्यक्षपणे सत्ताधारी भाजपाच्या लोकप्रतिनिधींना निर्देश देत स्वच्छता मोहिमेत प्रशासनाचे हात बळकट करण्याचे निर्देश दिले.गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी भाजपा व आयुक्तांमध्ये शीतयुद्ध तापू लागल्याची चर्चा सुरु आहे. त्यातूनच असहकार्याचे सूप वाजू लागल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे शहराला स्वच्छतेत अव्वल क्रमांक मिळवुन देण्याची सत्ताधा-यांची इच्छा नसल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी गतवर्षी शहराचा देशात १६५ वा क्रमांक आल्याची माहिती देत यंदाच्या सर्व्हेक्षणात मात्र ३५ व्या क्रमांकावर पालिका स्थिरावल्याचे सांगितले. हा क्रमांक पहिल्या २० क्रमांकात समाविष्ट होण्यासाठी पालिकेच्या स्वच्छता मोहिमेला यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. त्यांच्या या आवाहनाला सत्ताधारी, आयुक्तांसोबतच्या शीतयुद्धाला बाजूला सारून शहराला स्वच्छतेत सन्मान मिळवून देतील, अशी आस प्रशासनाला लागून राहिली आहे. यंदाच्या सर्व्हेक्षणात पालिका मुंबई प्रादेशिक विभागात अपेक्षित क्रमांकाच्या जवळपास पोहोचली असून, राज्यातही काही अंतर अव्वल क्रमांकापासून दूर असल्याचे सांगण्यात येत आहे. स्वच्छता मोबईल अ‍ॅप डाऊनलोड करणा-यांची संख्या २० हजारांपर्यंत पोहोचली असली तरी त्यापैकी सुमारे ४ हजार लोकांकडून स्वच्छतेचा फिडबॅक दिला जात आहे. फिडबॅक देणा-यांपैकी सुमारे ९० टक्के लोकं स्वच्छतेत समाधानी असल्याचे सांगितले जात असून, त्यात सुमारे ४ हजार फिडबॅक वाढण्याची अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.नागरिकांनी रिअल टाईमनुसारच स्वच्छता मोबाईल अ‍ॅपवर तक्रार पोस्ट करावी, असे अपेक्षित असून अनेकदा चुकीची तक्रार पोस्ट केली जाते. त्यामुळे अस्वच्छतेची निश्चित ठिकाणं सापडण्यात अडथळा निर्माण होतो. रिअल टाईलनुसार प्राप्त तक्रारीवर १२ तासांत ठोस कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत. नागरिकांनी शहर स्वच्छतेसाठी प्राधान्य दिल्यास केवळ सर्व्हेक्षणापुरते नव्हे तर शहर कायमस्वरूपी स्वच्छता राखण्यास मदतच होईल, असंही आयुक्त डॉ. नरेश गीते म्हणाले आहेत. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक