शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, पुण्यात येऊन फडणवीसांचा दिखावा'; रवींद्र धंगेकरांचा आरोप
2
ज्या आजोबांनी बाळाची हमी दिली, त्यांचे छोटा राजनशी कनेक्शन; भावाशी संपत्तीवरून वाद, मित्रावर गोळीबार
3
'१२ वर्षांनी त्यांना जाग आली, माझ्यामुळे त्यांचे अनेक मंत्री घरी गेले'; अण्णा हजारेंचे शरद पवारांना प्रत्युत्तर
4
उपचारासाठी भारतात आलेले बांग्लादेशचे खासदार बेपत्ता; अखेरचं लोकेशन बिहारमध्ये, शोध सुरू
5
“त्यांनी चीन सीमेवर जावे अन् पाहून यावे”; हेमंत बिस्वा सरमा यांचा नाना पटोलेंवर पलटवार
6
Indigo Flight: ऐकावं ते नवल! विमानातही ट्रेनसारखा किस्सा; कन्फर्म सीटवर बसवला 'स्टँडबाय' प्रवासी, प्रकरण काय?
7
अनिर्बंध मुजोरीचा निबंध! मस्तवाल बाळ आणि संवेदनशून्य अधिकाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय असले प्रकार थांबणार नाहीत
8
राजस्थान रॉयल्स ११ दिवस खेळला नाही; RCB च्या आजच्या सामन्यावर सुनिल गावस्करांची भविष्यवाणी
9
Buddha Purnima 2024: भगवान बुद्धांची प्रिय तिथी अर्थात बुद्ध पौर्णिमा कशी साजरी करायला हवी ते जाणून घ्या!
10
मोदी, सहानुभूती अन् जातीचे गणित; विविध मुद्द्यांभोवती फिरली निवडणूक, नेत्यांची अहोरात्र मेहनत तरीही धाकधूक कायम
11
उजनी धरण बॅकवॉटर बोट दुर्घटना; बुडालेल्या सहा जणांची नावे आली समोर; शोध कार्य पुन्हा केले सुरु
12
Paytm Q4 Results: रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा 'पेटीएम'ला मोठा फटका, निव्वळ तोटा ५५० कोटींवर; महसुलातही मोठी घट
13
त्रिस्तरीय सुरक्षा भेदली, एक इसम थेट EVM ठेवलेल्या ठिकाणी पोहोचला; निलेश लंकेंचा आरोप काय?
14
नातवाला सोडविण्यासाठी आजोबांनी दिली हमी; बाल न्यायालयात १५ तासांत जामीन कसा मंजूर झाला?
15
ऑनलाइन क्रशला भेटायला २४०० किमी दूर पोहचली युवती; त्यानंतर जे घडलं तिने डोक्याला हात लावला
16
पीपीएफ आणि दर महिन्याची ५ तारीख, अचूक टायमिंग लक्षात ठेवा; 1 कोटीचा फंड जमा करू शकाल
17
पेट्रोल, डिझेल GST मध्ये? राज्यांवर बंधने? कसे असेल मोदी ३.० सरकार; प्रशांत किशोर यांनी केले ४ जूननंतरचे भाकीत
18
विशेष मुलाखत : देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी यंदाची निवडणूक अतिशय महत्त्वाची - अखिलेश यादव 
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची जबरदस्त सुरुवात; अल्ट्राटेकमध्ये तेजी, एसबीआय घसरला
20
काँग्रेस अन् भाजपने उद्योगपतींच्या फायद्याची धोरणे आखली; बसप अध्यक्षा मायावती यांचा आरोप

ग्रामस्थांचा विरोध मावळला; कचऱ्याचा प्रश्न सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:21 AM

बायोगॅस प्रकल्प राबविण्याचे आश्वासन

बदलापूर : कुळगाव-बदलापूर पालिकेच्या घंटागाडी कचरा टाकण्यासाठी साई वालवली गावाजवळील डम्पिंग ग्राऊंडवर जात होत्या. मात्र या ठिकाणी असलेल्या डम्पिंगचा त्रास होत असल्याचे कारण देत नवीन वडवली आणि नवीन अंबरनाथ गावातील ग्रामस्थांनी बदलापूर पालिकेच्या घंटागाड्या अडवत कचरा टाकण्यास बंदी घातली. या प्रकरणी अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यात वादावादीही झाली. मात्र मंगळवारी झालेल्या बैठकीत मुख्याधिकारी आणि माजी नगराध्यक्ष यांनी पुढाकार घेत ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच त्यांची समजूत घालून कचरा टाकण्यासाठी केलेला विरोध क्षमविण्यात यश मिळविले.नवीन अंबरनाथ गावाला लागूनच बदलापूर पालिकेचे डम्पिंग ग्राऊंड आहे. या डम्पिंगचा धूर आणि दुर्गंधीचा त्रास होत असल्याने साई ग्रामपंचायत हद्दीतील नवीन अंबरनाथ गावातील ग्रामस्थांनी घंटागाडी रोखत आंदोलन केले होते. एकही घंटागाडी डम्पिंगवर जाऊ देणार नाही अशी ठाम भूमिका या ग्रामस्थांनी घेतली होती. त्यामुळे बदलापूरमध्ये कचरा कोंडी निर्माण झाली होती. या कचराकोंडीमुळे बदलापूर पालिका प्रशासन या ग्रामस्थांबरोबर चर्चा करण्यात व्यस्त होते. सोमवारी झालेली चर्चा अपयशी ठरल्यावर पुन्हा मंगळवारी स्वता मुख्याधिकारी प्रकाश बोरसे आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी स्थानिक ग्रामस्थांसोबत चर्चा केली.डम्पिंगच्या होणाºया त्रासाची माहिती ग्रामस्थांनी अधिकाºयांना दिली. यावर पालिकेच्या मुख्याधिकाºयांनी डम्पिंगवरील कचरा कमी करण्यासाठी शहरात विविध प्रकल्प राबवित असल्याची माहिती दिली. शहरात अनेक ठिकाणी सोसायटीमध्येच कचºयावर प्रक्रिया केली जात आहे. तर उर्वरित कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी पालिका प्रशासन बागोगॅस प्रकल्प राबविणार असल्याचे स्पष्ट केले. हा प्रकल्प सुरू झाल्यावर ओल्या कचºयावर प्रक्रिया करून तो कचरा तिथेच नष्ट केला जात असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. हा कचरा नष्ट झाल्यावर डम्पिंगवर त्याचा कोणताही ताण पडणार नसल्याचे सांगण्यात आले. मात्र तरीही ग्रामस्थ पालिकेच्या या निर्णयावर समाधानी नव्हते.बोरसे यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष म्हात्रे यांनीही कचºयावरील प्रक्रिया केंद्राची माहिती ग्रामस्थांना दिली. तसेच भविष्यात त्याचा कोणताही त्रास होणार नसल्याची ग्वाही देण्यात आली. सोबत गावातील ज्या समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. गावातील विकासकामांबाबतही पालिका प्रशासन सहानुभूतीपूर्वक विचार करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या सर्व प्रक्रियेसाठी महिन्याभराची मुदतही ग्रामस्थांनी दिली आहे. महिन्याभरात समाधानकारक कामे न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.पालिका प्रशासनाची कसोटीडम्पिंगच्या त्रासाच्या विरोधात ग्रामस्थ रस्त्यावर उतरलेले असताना या गावातील मुख्य नागरी समस्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाला काय करता येईल याचा विचार आता सुरु झाला आहे. ग्रामस्थांना पालिकेच्या प्रकल्पाची कल्पना दिल्याने त्यांचा राग शांत झालेला असला तरी त्यांना देण्यात आलेले आश्वासन पूर्ण न झाल्यास त्याचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने आता डम्पिंग आणि कचरा प्रक्रिया केंद्राच्या बाबतीत आपली तत्परता दाखविण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नbadlapurबदलापूर