शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

शिवसेनेतील खदखद चव्हाट्यावर, पालघरमध्ये फाटक, तर रायगडमध्ये मोरे यांना विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 3:40 AM

ठाणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर जिंकण्यासाठी मिशन २०१९ ला शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरु केली

ठाणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर जिंकण्यासाठी मिशन २०१९ ला शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरु केली असून त्यासाठी रायगडच्या संपर्कप्रमुखपदी अनुक्रमे अनंत तरे आणि संजय मोरे; तर पालघरच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदी आमदार रवींद्र फाटक यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड जाहीर होताच नाराजीला तोंड फुटले आहे. फाटक यांना पालघरमधून कट्टर शिवसैनिकांचा विरोध सुरू झाला आहे, तर आपल्या जिल्ह्यात नवा वाटेकरी आणल्याने अनंत तरे हेही नाराज असून त्यांनी वरपर्यंत दाद मागितल्याची चर्चा आहे.त्यातही मिशन २०१९ च्या नावाखाली नेमकी जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातीलच दोन नेत्यांची वर्णी लागल्याने त्यांनी आपला मतदारसंघ मजबूत करण्यासाठी ही खेळी केल्याची चर्चाही शिवसैनिकांत रंगू लागली आहे.पुढील लोकसभा, विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी शिवसेनेने आतापासूनच रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार अनंत तरे यांच्याकडून पालघर जिल्हा संपर्कप्रमुख पद काढून घेत त्यांना रायगडची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापूर्वी तरे यांनी या भागातून दोन वेळा खासदारकी आणि एकावेळेला आमदारकीची निवडणूक लढवल्याने हा भाग त्यांच्या परिचयाचा असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले आहे. पण पालघरमधील नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला जोरदार धक्का बसल्यानेच तरे यांची येथून उचलबांगडी करण्यात आल्याचे बोलले जाते. तरे यांना रायगड जिल्हाही पूर्णपणे सोपवण्यात आलेला नाही. महाड, श्रीवर्धन, पेण आणि अलिबागची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे; तर ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांचीही रायगड जिल्हा संपर्कप्रमुखपदी नेमणूक करण्यात आली आहे.त्यांच्याकडे कर्जत, खालापूर, पनवेल आणि उरणची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दोघांकडे सोपवलेल्या परिसरात शिवसेनेचा एक-एक आमदार आहे. या दोघांची निवड करुन शिवसेनेने पुन्हा एकदा निष्ठावतांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु एका जिल्हाचे दोन भाग करण्यात आल्याने त्याबाबत नाराजी आहे.मोरे हे आगामी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आपले नशीब आजमावणार असल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे; तर तरे यांना ठाण्यातून नव्हे तर पुन्हा रायगड जिल्ह्यातूनच शेकाप किंवा राष्ट्रवादीविरोधात आमदारकीची निवडणूक लढवावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच या दोघांना एकच जिल्हा विभागून देत दोघांनाही आपली प्रतिष्ठा वाढविण्याची संधी शिवसेनेच्या श्रेष्ठींनी दिल्याचे बोलले जात आहे.दुसरीकडे विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांना पालघर जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखपदी नेमत पक्षाने त्यांच्यावरही विश्वास टाकला आहे. पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडीला टक्कर देण्यासाठी त्यांची नेमणूक झाल्याची चर्चा आहे. परंतु त्यांच्या नावालाही स्थानिक नेत्यांचा विरोध सुरू झाला आहे.>ठाणे शहराकडे दुर्लक्ष?अर्थात मोरे आणि फाटक यांच्या नेमणुकीतून ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत बलाढ्य नेते एकनाथ शिंदे यांनी आपला कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघ अधिक मजबूत केल्याचे मानले जाते. हे दोन्ही नेते वागळे पट्ट्यातील असल्याने त्यांच्या निवडीवरुनही पक्षात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. पालकमंत्र्यांनी केवळ आपला मतदारसंघ मजबूत करण्यासाठी या दोघांची नावे पुढे केल्याची चर्चा सुरू आहे उरलेल्या ठाणे शहरातील नेते, तेथील निष्ठावंतांकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.